शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
3
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
4
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
5
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
6
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
7
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
8
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
9
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
10
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
11
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
12
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
13
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
14
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
15
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
16
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी पवनीच्या पुतळ्यात सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:32 IST

कोट्यवधी दिनदुबळ्या बहुजनांचे आदरस्थान असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थि आजही पवनी शहरात बाबासाहेबांच्या संगमवरील पुतळ्यात सुरक्षित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र अस्थि असणारा हा महाराष्ट्रातील एकमेव पुतळा आहे.

ठळक मुद्देआज डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती : महाराष्ट्रातील एकमेव पुतळा

लक्ष्मीकांत तागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : कोट्यवधी दिनदुबळ्या बहुजनांचे आदरस्थान असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थि आजही पवनी शहरात बाबासाहेबांच्या संगमवरील पुतळ्यात सुरक्षित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र अस्थि असणारा हा महाराष्ट्रातील एकमेव पुतळा आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महानिर्वाण झाले. पवनी येथील नागरिक सध्याच्या डॉ. आंबेडकर चौकात एकत्र आले. तेथे एका व्यापाऱ्याच्या घरासमोरून रेडियोवरून ही दु:खत बातमी ऐकली. अनेकजण धायमोकलून रडू लागले. जवळच राघो गजभिये यांच्या घरासमोर श्रावण मयुर गुरूजी यांनी शोक सभा घेतली.त्यावेळेस शुक्रवारी वॉर्डातील पिठूजी राऊत यांचे चांगले प्रस्थ होते. या वॉर्डातील डॉ. रविंद्र राऊत, विजय रामटेके, सुखदेव मानवटकर नागपूर येथे शिक्षण घेत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाणाची माहिती होताच हे तीनही युवक नागपूरवरून मुंबईला गेले. सरळ दादर चैत्य भूमीवर गेले. त्या ठिकाणी राखेला वंदन करून राख माथ्याला लावली. पण सुखदेव मानवटकर यांनी राखेत हात टाकताच त्यांच्या हाताला अस्थिचा एक तुकडा लागला. हा तुकडा चुपचाप पॅन्टच्या खिशात ठेवला. नंतर ही गोष्ट मित्रांना सांगितली. ही अस्थी त्यांनी पवनी येथे येवून पिठूजी राऊत यांच्याकडे सोपविली. ती त्यांनी आपल्याकडे सुरक्षीत ठेवली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर पवनी शहरात बाबासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्ते एकत्र आले. शहराच्या मध्यवर्ती भागात बाबासाहेबांचा पुतळा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुतळ्याकरिता लोकवर्गणी गोळा करण्यात आली. काही जणांनी आपल्या घरावरचे टीन विकून वर्गणी दिली.प्रत्येकाने पुतळ्यासाठी यथाशक्ती वर्गणी दिली. राघोजी गजभिये यांनी जागा दान दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा जयपूरवरून आणण्याचे निश्चित झाले. जयपूर येथील कलावंतांनी संगमरमरात बाबासाहेबांचा देखणा पुतळा तयार केला. आता हा पुतळा पवनीच्या वैभवात भर घालीत आहे. बाबासाहेबांच्या पवित्र अस्थि या पुतळ्यात असल्याने प्रत्येकजण येथे नतमस्तक होवून बाबासाहेबांना अभिवादन करतात.बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांनी केले होते अनावरणडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जयपूरवरून आणलेला पुतळा पवनी येथील मुख्य चौकात बसविण्यात आला. त्यावेळी बाबासाहेबांच्या अस्थीचा अर्धा भाग या पुतळ्यात ठेवण्यात आला व अर्धा भाग पुठूजी यांनी आपल्याकडे सुरक्षित ठेवला. बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण २६ नोव्हेंबर १९६२ रोजी राज्यसभेचे तत्कालीन उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले. आज हा पुतळा पवनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उभा आहे. बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी असणारा हा महाराष्ट्रातील एकमेव पुतळा आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर