शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी पवनीच्या पुतळ्यात सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:32 IST

कोट्यवधी दिनदुबळ्या बहुजनांचे आदरस्थान असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थि आजही पवनी शहरात बाबासाहेबांच्या संगमवरील पुतळ्यात सुरक्षित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र अस्थि असणारा हा महाराष्ट्रातील एकमेव पुतळा आहे.

ठळक मुद्देआज डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती : महाराष्ट्रातील एकमेव पुतळा

लक्ष्मीकांत तागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : कोट्यवधी दिनदुबळ्या बहुजनांचे आदरस्थान असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थि आजही पवनी शहरात बाबासाहेबांच्या संगमवरील पुतळ्यात सुरक्षित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र अस्थि असणारा हा महाराष्ट्रातील एकमेव पुतळा आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महानिर्वाण झाले. पवनी येथील नागरिक सध्याच्या डॉ. आंबेडकर चौकात एकत्र आले. तेथे एका व्यापाऱ्याच्या घरासमोरून रेडियोवरून ही दु:खत बातमी ऐकली. अनेकजण धायमोकलून रडू लागले. जवळच राघो गजभिये यांच्या घरासमोर श्रावण मयुर गुरूजी यांनी शोक सभा घेतली.त्यावेळेस शुक्रवारी वॉर्डातील पिठूजी राऊत यांचे चांगले प्रस्थ होते. या वॉर्डातील डॉ. रविंद्र राऊत, विजय रामटेके, सुखदेव मानवटकर नागपूर येथे शिक्षण घेत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाणाची माहिती होताच हे तीनही युवक नागपूरवरून मुंबईला गेले. सरळ दादर चैत्य भूमीवर गेले. त्या ठिकाणी राखेला वंदन करून राख माथ्याला लावली. पण सुखदेव मानवटकर यांनी राखेत हात टाकताच त्यांच्या हाताला अस्थिचा एक तुकडा लागला. हा तुकडा चुपचाप पॅन्टच्या खिशात ठेवला. नंतर ही गोष्ट मित्रांना सांगितली. ही अस्थी त्यांनी पवनी येथे येवून पिठूजी राऊत यांच्याकडे सोपविली. ती त्यांनी आपल्याकडे सुरक्षीत ठेवली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर पवनी शहरात बाबासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्ते एकत्र आले. शहराच्या मध्यवर्ती भागात बाबासाहेबांचा पुतळा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुतळ्याकरिता लोकवर्गणी गोळा करण्यात आली. काही जणांनी आपल्या घरावरचे टीन विकून वर्गणी दिली.प्रत्येकाने पुतळ्यासाठी यथाशक्ती वर्गणी दिली. राघोजी गजभिये यांनी जागा दान दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा जयपूरवरून आणण्याचे निश्चित झाले. जयपूर येथील कलावंतांनी संगमरमरात बाबासाहेबांचा देखणा पुतळा तयार केला. आता हा पुतळा पवनीच्या वैभवात भर घालीत आहे. बाबासाहेबांच्या पवित्र अस्थि या पुतळ्यात असल्याने प्रत्येकजण येथे नतमस्तक होवून बाबासाहेबांना अभिवादन करतात.बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांनी केले होते अनावरणडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जयपूरवरून आणलेला पुतळा पवनी येथील मुख्य चौकात बसविण्यात आला. त्यावेळी बाबासाहेबांच्या अस्थीचा अर्धा भाग या पुतळ्यात ठेवण्यात आला व अर्धा भाग पुठूजी यांनी आपल्याकडे सुरक्षित ठेवला. बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण २६ नोव्हेंबर १९६२ रोजी राज्यसभेचे तत्कालीन उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले. आज हा पुतळा पवनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उभा आहे. बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी असणारा हा महाराष्ट्रातील एकमेव पुतळा आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर