शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

ग्रामीण विकासाचे कामकाज थांबले

By admin | Updated: September 15, 2016 00:28 IST

ग्रामसेवकाला करण्यात आलेल्या मारहाणप्रकरणी दोषीविरुद्ध दुय्यम स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्यांना अभय देण्यात आले आहे.

शेकडो कर्मचारी संपात सहभागी : प्रकरण मांगली येथील ग्रामसेवकाला मारहाणीचेभंडारा : ग्रामसेवकाला करण्यात आलेल्या मारहाणप्रकरणी दोषीविरुद्ध दुय्यम स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्यांना अभय देण्यात आले आहे. मारहाणीत दोषींना अटक करून न्याय द्यावा, या मागणीसाठी बुधवारी कृती समितीच्या नेतृत्त्वात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या संपात जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले होते. मागील १५ दिवसापासून ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन पुकारले असल्याने ग्रामीण विकासाचे कामकाज पूर्णपणे थांबले आहे.जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, कृती संघर्ष समितीच्या माध्यमातून हा संप पुकारण्यात आला. या संपाचे नेतृत्व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस अशोक थूल, प्रभाकर कळंबे, अतूल वर्मा, मनिष वहाने, विजय ठवकर, गणेश साळुंके, अशपाक शेख, रविंद्र मेश्राम, सतिश मारबते, गोपाल कारेमोरे, रविंद्र तायडे, शिवपाल भाजीपाले यांनी केले. पवनी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या मांगली येथील दत्ता जाधव या ग्रामसेवकाला ही मारहाण करण्यात आली. तंटामुक्त समितीची सभा सुरू असताना तेथे संतप्त ग्रामस्थांनी तैनात पोलिसांसह ग्रामसेवक व सरपंचांना ही मारहाण करण्यात आलेली आहे. यावेळी सभेचे छायाचित्राणासाठी असलेला कॅमेरा नागरिकांनी फोडला. एवढ्यावरच ते न थांबता त्यांनी सभेचे इतिवृत्त लिहीत असलेल्या रजिस्टरला हिसकावून घेत त्याला फाडण्यात आले. नागरिकांच्या संतापाला सामोरे जाण्याऐवजी तैनातीवरील पोलिसांनी जीव मुठीत घेवून तेथून पळ काढल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणाची माहिती सदर ग्रामसेवक जाधव यांनी भ्रमणध्वनीवर पवनी पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी यांना दिली. मात्र, त्यांनी प्रशासनाकडून ग्रामसेवक जाधव यांना संरक्षण देण्याऐवजी वेळ मारून नेण्याचा प्रकार केल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे.याप्रकरणात मारहाण करणारे आरोपी मोकाट असून त्यांना अटक करावी, अशी मागणी ग्रामसेवक संघटनेनी केली. मात्र, कोणावरही अटकेची कारवाई करण्यात आलेली नसून यात दोषींना पाठिशी घालीत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. त्यामुळे मागील १५ दिवसांपासून ग्रामसेवक संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले आहे. याचा निषेध करण्यासाठी आज बुधवारला जिल्हा परिषद व सर्व पंचायत समितीमधील वर्ग-३ व वर्ग-४ च्या सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या संपात ग्रामीण विभागाच्या ग्रामसेवक, आरोग्य, अभियंता, लिपिक व शिपाई यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)पदाधिकारी पडले एकाकीया संपात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे वर्ग-३ व वर्ग-४ चे कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे वर्ग-२ व वर्ग-४ चे अधिकारी व जिल्हा परिषद तथा पंचायत समितीचे पदाधिकारी हेही त्यांच्या कक्षात दिसून आले. मात्र, नेहमी ‘बेल’ मारल्यावर दिमतीला धावून येणारे त्यांचे अधिनस्थ कर्मचारी त्यांच्या दिमतीला आज नव्हते. त्यामुळे त्यांना स्वत:चे काम स्वत:च करावे लागल्याची नामुष्की ओढवल्याचे चित्र जिल्हा परिषदमध्ये दिसून आले. एसपी म्हणतात... नो वर्क, नो पेमेंटआरोपींना अटक करण्याच्या मागणीला घेऊन कामबंद व संप पुकारण्यात आला. आज कर्मचारी संपावर असल्याने ग्रामविकास विभागाचे कामकाज प्रभावीत झाले. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लाखनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात ग्रामसेवकांचे कामबंद असल्याने त्यांना ‘नो वर्क, नो पेमेंट’ नुसार कारवाई करण्याचे सुचित केले. या पत्राची प्रत कर्मचाऱ्यांच्या हाती लागल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप पसरला आहे. गृहविभगाचे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधीक्षकांनी ग्रामविकासात ढवळाढवळ करण्याच्या या अफलातून प्रकाराने कर्मचाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.