शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:44 IST

मोहाडी :- भंडारा जिल्हा अनलॉक प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात आल्याने दुकानांना वेळ सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची ...

मोहाडी :- भंडारा जिल्हा अनलॉक प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात आल्याने दुकानांना वेळ सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र ग्रामीण भागाकडे कोणताच अधिकारी लक्ष देत नसल्याने तेथील बाजार व दुकाने मास्क व सोशल डिस्टनसिंगचे नियम न पाळता सायंकाळपर्यंत सुरू असतात. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रूग्ण ग्रामीण भागत आढळल्यानंतरही नागरिक बेफिकिर दिसत आहेत.

कोरोनाने शहरी भागासोबतच ग्रामीण भागात सुध्दा कहर केला. अनेक लोकांचे बळी गेले. अनेक परिवाराला घरची कमावती व्यक्ती किंवा प्रियजन गमवावा लागला. हे दुःख आजही त्यांना सलत आहे. परंतु आता कोरोनाची लाट ओसरत चालली आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा बेफिकिर झाले आहेत. गत वर्षी सुद्धा असेच झाले व कोरोनाची महाभयंकर लाट आली. रुग्ण जास्त व बेड, ऑक्सिनज सिलिंडर कमी अशी परिस्थिती उदभवली. बेड न मिळाल्याने अनेकांनी घरीच प्राण सोडले. तर काहींनी लाखो रुपयांचा उपचार केला. जनतेच्या डोळ्यासमोर हे वास्तव असतांनाही पुन्हा आता लोक सैरभैर होत आहेत.

मास्क, सेनेटायझर, सोशल डिस्टनसिंग चा वापर करणे विसरले आहेत. शहरी भागात आठवडी बाजार बंद असला तरी ग्रामीण भागातील काही गावात आठवडी बाजाराला सुरवात झाली. तेथे गर्दी होत आहे. ग्रामीण भागातील काही मोठ्या गावातील सर्व प्रकारची दुकाने नियम धाब्यावर बसवून सायंकाळपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. कोरोनाने विस्कळीत झालेली ग्रामीण अर्थव्यवस्था आता पूर्वपदावर येत असताना जनतेची छोटीशी चूकही मोठी हाऊ शकते. शासनाने घालून दिलेले नियम जनतेने काटेकोरपणे पाळणे हाच एकमेव उपाय आहे. तालुका प्रशासनानेही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.