शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
4
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
5
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
6
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
7
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
8
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
9
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
10
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
11
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
12
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
13
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
14
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
15
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
16
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
17
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
18
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
19
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
20
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ

ग्रामीण भागात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:44 IST

मोहाडी :- भंडारा जिल्हा अनलॉक प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात आल्याने दुकानांना वेळ सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची ...

मोहाडी :- भंडारा जिल्हा अनलॉक प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात आल्याने दुकानांना वेळ सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र ग्रामीण भागाकडे कोणताच अधिकारी लक्ष देत नसल्याने तेथील बाजार व दुकाने मास्क व सोशल डिस्टनसिंगचे नियम न पाळता सायंकाळपर्यंत सुरू असतात. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रूग्ण ग्रामीण भागत आढळल्यानंतरही नागरिक बेफिकिर दिसत आहेत.

कोरोनाने शहरी भागासोबतच ग्रामीण भागात सुध्दा कहर केला. अनेक लोकांचे बळी गेले. अनेक परिवाराला घरची कमावती व्यक्ती किंवा प्रियजन गमवावा लागला. हे दुःख आजही त्यांना सलत आहे. परंतु आता कोरोनाची लाट ओसरत चालली आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा बेफिकिर झाले आहेत. गत वर्षी सुद्धा असेच झाले व कोरोनाची महाभयंकर लाट आली. रुग्ण जास्त व बेड, ऑक्सिनज सिलिंडर कमी अशी परिस्थिती उदभवली. बेड न मिळाल्याने अनेकांनी घरीच प्राण सोडले. तर काहींनी लाखो रुपयांचा उपचार केला. जनतेच्या डोळ्यासमोर हे वास्तव असतांनाही पुन्हा आता लोक सैरभैर होत आहेत.

मास्क, सेनेटायझर, सोशल डिस्टनसिंग चा वापर करणे विसरले आहेत. शहरी भागात आठवडी बाजार बंद असला तरी ग्रामीण भागातील काही गावात आठवडी बाजाराला सुरवात झाली. तेथे गर्दी होत आहे. ग्रामीण भागातील काही मोठ्या गावातील सर्व प्रकारची दुकाने नियम धाब्यावर बसवून सायंकाळपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. कोरोनाने विस्कळीत झालेली ग्रामीण अर्थव्यवस्था आता पूर्वपदावर येत असताना जनतेची छोटीशी चूकही मोठी हाऊ शकते. शासनाने घालून दिलेले नियम जनतेने काटेकोरपणे पाळणे हाच एकमेव उपाय आहे. तालुका प्रशासनानेही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.