शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
6
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
7
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
8
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
9
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
10
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
11
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
12
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
13
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
14
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
15
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
16
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
17
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
18
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
19
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
20
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग

आॅनलाईन कर्जमाफीच्या नोंदणीसाठी शेतकºयांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 23:03 IST

राज्य शासनाने शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी आॅनलाईन अर्जाची नोंदणी करण्याची अट लागू केली आहे.

ठळक मुद्देवयोवृद्ध व लखवाग्रस्त शेतकºयांची फजिती : अर्ध्याधिक शेतकरी विविध आजाराने ग्रस्त

रंजित चिंचखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : राज्य शासनाने शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी आॅनलाईन अर्जाची नोंदणी करण्याची अट लागू केली आहे. परंतु अर्धे अधिक शेतकरी वयोवृद्ध आणि विविध आजाराने ग्रस्त असल्याने पित्यासोबत पाल्याचीही डोकेदुखी वाढली आहे. गावातच आॅनलाईन अर्ज स्वीकारण्याची सोय उपलब्ध करून देण्याची ओरड सुरु झाली आहे.राज्य शासनाने शेतकºयांना कर्जमाफी देताना आॅनलाईन अर्जाची नोंदणी करण्याची अट लागू केली आहे. अर्ज अपडेट करण्यासाठी तालुकास्तरावर काही महा आॅनलाईन केंद्रांना मंजुरी दिली आहे. कर्ज घेणाºया शेतकºयांची संख्या मोठी असल्याने आॅनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरु झाली आहे. गावापासून ३० ते ३० कि.मी. अंतरावर ही महाआॅनलाईन केंद्र असल्याने वयोवृद्ध शेतकºयांची फजीती होत आहे. तरुण शेतकºयांची संख्या नगण्य आहे. वयोवृद्ध शेतकºयांचे नावावर शेती असल्याने वाढत्या वयानुसार शरीर थकले आहे. याशिवाय वयोवृद्ध शेतकरी अनेक आजाराने पीडित आहेत. बहुतांश शेतकरी अंथरुणाला खिळली आहे. सिहोरा परिसरात बहुतांश शेतकºायंनी ७० वर्षाचा पल्ला गाठला आहे. म्हातारवयात या शेतकºयांना कर्जमाफीच्या अर्जाची नोंदणी करण्याची जबाबदारी त्यांचे पाल्यावर आली आहे. आॅनलाईन अर्जाची नोंदणी करताना पतीपत्नी या शेतकºयाची आवश्यकता आहे. घरातील अपत्य वयोवृद्ध माता पिण्यांना कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी महाआॅनलाईन केंद्रावर घेऊन जात आहेत. दिवसभर या केंद्रावर प्रतीक्षा करण्याची पाळी येत असल्याने पाल्यांचा रोजगार बुडत आहे. महा आॅनलाईन केंद्रावर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वय वाढत असल्याने अनेक शेतकरी लखवा आजाराने ग्रस्त आहे. अनेकाच्या डोळ्यांना दिसत नाही. यामुळे अर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी जाताना या शेतकºयांची कसरत होत आहे. या शेतकºयांना वंचित राहण्याची पाळी आली आहे. दरम्यान गावात ग्रामपंचायतमध्ये डाटा आॅपरेटर कार्यरत आहेत. गावातच आॅनलाईन भरण्याची मंजुरी देण्यात आली नाही. यामुळे शेतकºयांचे नाकी नऊ येत आहे. लांब पल्ल्याचे अंतर गाठण्यासाठी गावात सोयीचा अभाव आहे. लखवा अजाराने पीडित कर्जबाजारी शेतकरी आॅनलाईन अर्जाची नोंदणी करण्यासाठी तालुक्याचे ठिकाण गाठणार नाही. या शेतकºयांना घरपोच तथा गावात सोय उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे प्रयत्न नाही. यामुळे अंथरुणावर असणारे शेतकरी टेंशनमध्ये आली आहे. शेती आणि कर्जाची नोंद तरुण अपत्याचे नावावर नाही. वयोवृद्ध शेतकºयांचे नावावर आहे. यामुळे अपत्य अडचणीत आले आहे. ग्राम पंचायतमध्ये डाटा आॅपरेटर मार्फत कर्ज माफीचे अर्ज नोंदणी करण्याची ओरड गावात सुरु झाली आहे. कर्जमाफीचे लाभ घेण्यासाठी शासनाने डाटा आॅपरेटरांना गावातच शेतकºयांचे अर्जाची नोंदणी करण्याचे अधिकार आणि आदेश देण्यात यावे अशी ओरड गावात सुरु झाली आहे.शासनाने कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज नोंदणीसाठी काही केंद्रांना मंजुरी दिली आहे. परंतु शेतकरी वयोवृद्ध व आजाराने पीडित असल्याने अर्जाची नोंदणी त्रासदायक आहे. गावातील डाटा आॅपरेटरवर शासनाचा भरवसा नाही काय? यांना अधिकार व आदेश देण्याची गरज आहे.-मोतीलाल ठवकर, जिल्हाध्यक्ष भारतीय किसान संघ, सिंदपुरी