शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

ढगाळ वातावरणाने रबी पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 06:00 IST

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपासून ढगाळ वातावरण होते. रविवारी भंडारात तुरळक पावसाच्या सरी बरसल्या. तूर पिकांसह हरभरा, चणा व अन्य कठाण पिकांना याचा फटका बसला. ढगाळ वातावरण हे अळी निर्माणीसाठी पोषक ठरत असते. फुलोºयानंतर बिजाईच्या उत्पादनात अळीचे निर्माण होत असल्याने त्याचा फटका उत्पादन क्षमतेवर होत असतो.

ठळक मुद्देटेंशन वाढले : भाजीपाला पिकांवरही सक्रांत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उन्हाळी धानासह अन्य रबी पिकांना फटका बसला आहे. विशेष म्हणजे भाजीपाला पिकांवरही संक्रांत आली आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपासून ढगाळ वातावरण होते. रविवारी भंडारात तुरळक पावसाच्या सरी बरसल्या. तूर पिकांसह हरभरा, चणा व अन्य कठाण पिकांना याचा फटका बसला. ढगाळ वातावरण हे अळी निर्माणीसाठी पोषक ठरत असते. फुलोºयानंतर बिजाईच्या उत्पादनात अळीचे निर्माण होत असल्याने त्याचा फटका उत्पादन क्षमतेवर होत असतो. याचा सर्वाधिक प्रादूर्भाव तूर पिकावर दिसून आला. आठ दिवसांपूर्वी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे होत्याचे नव्हते झाले होते. त्यानंतर पुन्हा उन्ह तापल्याने मिळेल त्या मार्गाने शेतकऱ्यांनी ओला झालेला धान वाळवायला सुरुवात केली होती. मात्र मंगळवारपासून बारदाना संपल्यामुळे धान खरेदी ठप्प झाली. त्यातच वाळलेला धानही पावसामुळे ओला झाल्यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला.पाखर झालेला धान केंद्रात घ्यायला तयार नसल्याने दाद कुणाकडे मागायची अशी स्थिती बळीराजापुढे निर्माण झाली. यापूर्वी धानाचे हमीभाव वाळल्यानंतरही जुन्याच दराने धानाची खरेदी सुरु होती. मात्र या संदर्भात आवाज उठविल्यानंतर नवीन दराने धानाची विक्री होऊ लागली. मात्र बारदानाच नसल्याने ती खरेदीही ठप्प झाली. दरम्यान पुन्हा एकदा ढगाळ वातावरणाने बळीराजाचे टेंशन वाढविले असून भाजीपाला पिकांचेही नुकसान झाल्याचेही प्राथमिक माहिती आहे.

टॅग्स :weatherहवामानagricultureशेती