शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ढगाळ वातावरणाने रबी पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 06:00 IST

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपासून ढगाळ वातावरण होते. रविवारी भंडारात तुरळक पावसाच्या सरी बरसल्या. तूर पिकांसह हरभरा, चणा व अन्य कठाण पिकांना याचा फटका बसला. ढगाळ वातावरण हे अळी निर्माणीसाठी पोषक ठरत असते. फुलोºयानंतर बिजाईच्या उत्पादनात अळीचे निर्माण होत असल्याने त्याचा फटका उत्पादन क्षमतेवर होत असतो.

ठळक मुद्देटेंशन वाढले : भाजीपाला पिकांवरही सक्रांत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उन्हाळी धानासह अन्य रबी पिकांना फटका बसला आहे. विशेष म्हणजे भाजीपाला पिकांवरही संक्रांत आली आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपासून ढगाळ वातावरण होते. रविवारी भंडारात तुरळक पावसाच्या सरी बरसल्या. तूर पिकांसह हरभरा, चणा व अन्य कठाण पिकांना याचा फटका बसला. ढगाळ वातावरण हे अळी निर्माणीसाठी पोषक ठरत असते. फुलोºयानंतर बिजाईच्या उत्पादनात अळीचे निर्माण होत असल्याने त्याचा फटका उत्पादन क्षमतेवर होत असतो. याचा सर्वाधिक प्रादूर्भाव तूर पिकावर दिसून आला. आठ दिवसांपूर्वी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे होत्याचे नव्हते झाले होते. त्यानंतर पुन्हा उन्ह तापल्याने मिळेल त्या मार्गाने शेतकऱ्यांनी ओला झालेला धान वाळवायला सुरुवात केली होती. मात्र मंगळवारपासून बारदाना संपल्यामुळे धान खरेदी ठप्प झाली. त्यातच वाळलेला धानही पावसामुळे ओला झाल्यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला.पाखर झालेला धान केंद्रात घ्यायला तयार नसल्याने दाद कुणाकडे मागायची अशी स्थिती बळीराजापुढे निर्माण झाली. यापूर्वी धानाचे हमीभाव वाळल्यानंतरही जुन्याच दराने धानाची खरेदी सुरु होती. मात्र या संदर्भात आवाज उठविल्यानंतर नवीन दराने धानाची विक्री होऊ लागली. मात्र बारदानाच नसल्याने ती खरेदीही ठप्प झाली. दरम्यान पुन्हा एकदा ढगाळ वातावरणाने बळीराजाचे टेंशन वाढविले असून भाजीपाला पिकांचेही नुकसान झाल्याचेही प्राथमिक माहिती आहे.

टॅग्स :weatherहवामानagricultureशेती