शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

कृषिपंपाची १.७७ कोटींची थकबाकी

By admin | Updated: December 7, 2014 22:45 IST

शेतकऱ्याकडे असलेल्या कृषी पंपाच्या वीज वापराची थकबाकी वसूल करण्याकरिता महावितरणच्या वतीने कृषी संजीवनी योजना सुरु करण्यात आली. ही योजना अमलात आली. तो काळ

पालोरा (चौ.) : शेतकऱ्याकडे असलेल्या कृषी पंपाच्या वीज वापराची थकबाकी वसूल करण्याकरिता महावितरणच्या वतीने कृषी संजीवनी योजना सुरु करण्यात आली. ही योजना अमलात आली. तो काळ शेतकऱ्यांचा हंगामाचा होता. शेतीच्या पेरणीकरिता पैसे लागत असल्यामुळे या योजनेकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून कोसो दूर राहिले. पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांकडे कृषी पंपाची वीज थकबाकी १ कोटी ७७ लाख ९ हजार ९१३ रुपये शिल्लक आहेत. यात तालुक्यात ६,३७६ शेतकऱ्यांचे कृषी पंप आहेत. यापैकी २ हजार ३७३ शेतकऱ्यांनी ८३ लाख ४ हजार ९६२ रुपये भरून कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेतला आहे. आता शेतकऱ्यांकडे महावितरणाचे ८० लाख ४७ हजार ९३३ रुपये थकबाकी आहे. ही योजना जरी शेतकऱ्यांसाठी जीवनदायीनी ठरत असली तरीही या योजनेची अल्प मुदत असल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेपासून मुकावे लागले.ज्या प्रसंगी ही योजना राबविण्यात आली त्या काळात शेतकऱ्यांकडे पैसा नव्हता, आता शेतकऱ्यांचे उत्पन्न हातात आले आहे. अशा प्रसंगी कृषी संजीवनी योजनेची मुदत संपल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलेला आहे. वीज महावितरण कंपनीने या योजनेची मुदत वाढविण्याची मागणी, तालुक्यातील आझाद शेतकरी संघटनेनी केली आहे.पवनी तालुक्यातील शेतकरी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दुष्काळग्रस्त परिस्थितीने संकटात सापडलेला आहे. हा तालुका तांदळाचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. या भागात पाण्याचे स्त्रोत जास्त प्रमाणात असल्यामुळे कृषी मोटर पंप जास्त प्रमाणात आहेत. शेतकऱ्यांकडे कृषी पंपाचे कोट्यवधी रुपयेथकबाकी आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकरी वीज देयक भरू शकत नाही. दुसरीकडे भारनियमनामुळे दमछाक होत आहे. परिणामत: वीज वितरण कंपनीविरुद्ध संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. शेतकऱ्याकडची मोटरपंपाची थकबाकी वीज वितरण कंपनीला डोकेदुखी जरी ठरली असली तरी मात्र कृषी संजीवनी योजनेने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विजेची थकबाकी वसूल करण्यासाठी कृषी संजीवनी योजना अमलात आली मात्र अनेक शेतकऱ्यांनीया योजनेचा लाभ घेवून सुद्धा वीज देयक लागूनच येत असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहकच त्रास सहन करावा लागत आहे. या योजनेची मुदत सं्ल्यामुळे आता वीज बिल कसे भरावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या योजनेची मुदत वाढविण्याची अत्यंत गरज आहे. संबंधित वीज वितरण कंपनीने कृषी संजीवनी योजनेची मुदत वाढविण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)