शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कोरोना जनजागृतीसाठी ‘रुटमार्च’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोरोनाची दुसरी लाट उतरणीला लागली असली तरी गाफील राहून चालणार नाही. धोका अजूनही टळला ...

ठळक मुद्देजिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाची दुसरी लाट उतरणीला लागली असली तरी गाफील राहून चालणार नाही. धोका अजूनही टळला नसून आता अधिक काळजी घेणे व सतर्क राहण्याची खरी गरज आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले असून आता भंडारा जिल्हा लेव्हल एक मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रशासन व पोलीस विभागाने ‘रुटमार्च’ काढून कोरोना नियम पाळण्याबाबत जनजागृती केली. कोरोना जनजागृतीचा हा कार्यक्रम अनोखा ठरला आहे.कोरोना जनजागृती रुटमार्चची सुरुवात ७ जून रोजी भंडारा शहरातून करण्यात आली. जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी मुख्य बाजारपेठेत रुटमार्चच्या माध्यमातून नागरिकांना नियम पाळण्याबाबत आवाहन केले. कोरोनाची दुसरी लाट कमी झाली असली तरी पूर्णपणे ओसरली नाही. त्यामुळे नियमांचे पालन करून उद्योग व्यापार करण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले होते. त्या आवाहनाला नागरिक व व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रुटमार्च जनजागृतीचा हाच पॅटर्न जिल्हाभर राबविण्यात आला. गेला आठवडाभर प्रशासन व पोलीस विभागाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रुटमार्चचे आयोजन केले. साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी, मोहाडी व तुमसर या ठिकाणी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार, मुख्याधिकारी व स्थानिक अधिकारी या रुटमार्चमध्ये सहभागी झाले होते. कोरोनाचा प्रोटोकॉल पाळणे व दुकानात गर्दी न होऊ देणे याबाबत जागृती करण्यात आली. त्यासोबतच मोठ्या गावांमध्येही रुटमार्च आयोजित करण्यात आला. कोरोनाची दुसरी लाट आरोग्याच्या दृष्टीने नुकसानकारक ठरली असून मागील तीन महिन्यांत रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. 

गाफील राहू नका      - १ जून ते १३ जून दरम्यान जिल्ह्यात कोरोनामुळे केवळ एक मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९७.८१  एवढा  आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर ०१.२२ टक्क्यांवर आला आहे. भंडारा जिल्हा आता लेव्हल एक मध्ये आला असून आजपासून अधिक प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मागील आठवड्यात जिल्हा व पोलीस प्रशासनाने केलेल्या उपाययोजना व रुटमार्चच्या माध्यमातून केलेल्या जनजागृतीचा हा परिणाम आहे. तरीसुद्धा मास्क वापरणे, वारंवार हात स्वच्छ धुणे व सुरक्षित अंतर पाळणे या नियमातून कोणतीही सूट देण्यात आली नाही. नागरिकांनी गाफील न राहता, सतर्क राहून काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी केले आहे

 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या