शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

वादळाने उडाले घरांचे छत, लाखोंचे नुकसान

By admin | Updated: May 29, 2015 00:54 IST

अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने सुकडी (डाकराम) व बुचाटोला येथील अनेक घरांचे छत उडाले.

सुकडी (डाकराम) : अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने सुकडी (डाकराम) व बुचाटोला येथील अनेक घरांचे छत उडाले. चक्रीवादळासह आलेल्या पावसाने काही झोपड्या सुद्धा धराशाही झाल्या. मात्र जीवित हाणी टळली. रविवारी ५ वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या चक्रीवादळ व पावसाने मोठेच थैमान घातले. तिरोडा तालुक्यातील सुकडी (डाकराम) व बुचाटोला येथील काही घरांवरील टिनाचे छत पूर्णपणे उडाले. चक्रधर स्वामी मंदिर परिसरातील घरांचे टिनाचे छत उडाले यात अनिल अंबर गेडाम , श्रीधर उके, फुलन केवल मरस्कोल्हे, भूरे, प्रभा बरवे, मालन मुलताम तसेच बुचाटोला येथील जीवन गणू हाडगे यांचा घरांचा समावेश आहे. सुकडी डाकराम गावातील घरांवरील छत उडाल्यामुळे जवळपास १ ते दीड लाख रुपयांचे नुकसाान झाले आहे. बुचाटोला येथील जीवन हाडगे यांचे टिनाचे छत उडाले. टिव्ही फुटली व पंखा तुटला त्यामुळे अंदाजे २० ते २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. सदर माहिती ग्रामपंचायत सदस्य परमानंद सोमा गभणे यांनी तलाठी एल.एम. पराते यांना दुरध्वनीवरून सांगितले. सोमवार (दि.२७) रोजी सकाळी तलाठी एल.एम.पराते, ग्रामपंचायत सदस्य परमानंद गभणे, कोतवाल गोस्वामी व गावातील काही लोकांनी पंचनामा करुन तसा अहवाल तहसीलदार तिरोडा यांना पाठविला आहे. अचानक आलेल्या चक्रीवादळ व पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत नुकसान ग्रस्तांना त्वरित देण्यात यावे. त्यामुळे त्यांच्या राहण्याची समस्या सुटेल अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. सडक अर्जुनी : सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी येथे वादळी वाऱ्याने काही लोकांच्या घरावरील टिनाचे पत्रे उडाले. खोडशिवणी येथील रहिवासी केवलराम मस्के यांच्या राहत्या घरावरील सिमेंटची पत्रे आणि कवेलू उडाले. त्यामुळे त्यांचे जवळपास १ लाख रुपयांचे नुकसान झाले. तलाठी, पोलीस पाटील यांनी पाहणी करून पंचनामा तयार करून तहसीलदारांकडे पाठविला आहे. सोबतच गावातील शामराव इलमकर आणि दिनदयाल पांडे यांच्या घरांचेही वादळाने नुकसान झाले आहे. अनेक आम्रवृक्ष खाली पडले. तर लागलेले आंबेसुद्धा पूर्णत: झडले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आंबे विक्रीतून होणारा फायदा यंदा घेता येणार आहे. नुकसानग्रस्तांना शासनाने त्वरित भरपाई देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)