शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

सालई-नेरला रस्ता चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 01:06 IST

राज्यात महामार्गाचे जाळे विस्तारत असून खेडोपाडी रस्ते तयार करण्याचा दावा शासनाकडून केला जात आहे. मात्र याला अपवाद ठरतो आहे तो मोहाडी तालुक्यातील सालई ते नेरला (आंधळगाव) रस्ता. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही गावकऱ्यांना चांल्या रस्त्याची सुविधा मिळत नसल्याने गावकऱ्यांना भर पावसात चिखलातून खडतर प्रवास करावा लागतो आहे.

ठळक मुद्देरुग्णांचा प्रवास बैलबंडीने : सात दशकांपासून ग्रामस्थ रस्त्याच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कजांब (लोहारा) : राज्यात महामार्गाचे जाळे विस्तारत असून खेडोपाडी रस्ते तयार करण्याचा दावा शासनाकडून केला जात आहे. मात्र याला अपवाद ठरतो आहे तो मोहाडी तालुक्यातील सालई ते नेरला (आंधळगाव) रस्ता. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही गावकऱ्यांना चांल्या रस्त्याची सुविधा मिळत नसल्याने गावकऱ्यांना भर पावसात चिखलातून खडतर प्रवास करावा लागतो आहे.सालई ते नेरला रस्त्याचे आतापर्यत साधे खडीकरणसुध्दा करण्यात आलेले नाही. सालई खुर्द ते नेरला मुख्य रस्त्याची अवस्था चिखलाने माखलेल्या शेतशिवारातील पांदन रस्त्यांपेक्षाही वाईट झाली आहे.प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाºया गावकºयांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी प्रशासनाने तात्काळ रस्ता दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रा. प. सदस्य नितीन लिल्हारे यांनी दिला आहे.सालई खुर्द हा रस्ता आंधळगाव ला जोडणारा मुख्य रस्ता असून आंधळगाव शहर असल्याने गावकºयांना प्राथमिक गरजांसाठी आंधळगावला सतत येजा करावी लागते. गावातील अनेकजन कृषि साहित्य, पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, बँक, आठवडी बाजार, किराणा बाजार, जनरल स्टोअर्स, मेडिकल, शाळेसाठी विद्यार्थ्यी आंधळगावला येत असतात.रस्त्याने जाणाºया नागरिकांना चिखलातून मार्ग काढणे मुश्कीलीचे झाले आहे. सालई खुर्द ते नेरला (आंधळगाव) हा मार्ग दळणवळणासाठी सुलभ नाही, रस्त्यात खड्डे, रस्ता तुटलेला, पावसाळ्यात चिखलाने माखलेला त्यामुळे या रस्त्याचे रहदारी बंद आहे.परिसरातील लोकांना आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तात्काळ सालई नेरला रस्त्याचे विषय मार्गी लावावा अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा ग्रा.प. सदस्य नितीन लिल्हारे, ईश्वर दमाहे, मुन्ना अटराहे, नरेश नागपुरे, यशवंत अटराहे, गुलशन अटराहे, ताराचंद लिल्हारे, अनिल ठाकरे, सरसू ठाकरे, बाबूलाल ठाकरे, शिवा पटले, सहसराम अटराहे, शिवदास लिल्हारे, प्रल्हाद निमकर, विलास पटले, लक्ष्मण लिल्हारे, शंकपाल दमाहे व गावकºयांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक