शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा शिस्तीचा भाग व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह तथा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. उदघाटन प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी विलास ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मनिष कोठारी, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा व एसटी महामंडळाचे गजानन नागुलवार उपस्थित होते.

ठळक मुद्देअरविंद साळवे : भंडारा येथे रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अधिकार व हक्कांबाबत नागरिक मोठ्या प्रमाणात जागृत असतात, ते असायलाही हवेत. मात्र आपल्या कर्तव्याबाबत आपण फारसे गंभीर दिसत नाही. कायद्याचे कसोशीने पालन करणे हे सुद्धा आपले मूलभूत कर्तव्यच आहे. मोटर वाहन कायदा हा आपल्याच भल्यासाठी असून रस्ता सुरक्षा आपल्या जगण्याचा व शिस्तीचा भाग व्हावा असे प्रतिसादन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी केले.राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह तथा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. उदघाटन प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी विलास ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मनिष कोठारी, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा व एसटी महामंडळाचे गजानन नागुलवार उपस्थित होते.अतिशय लहान वयात आईवडील आपल्या पाल्यांच्या हाती वाहन देतात ही बाब चुकीची असल्याचे नमूद करून अरविंद साळवे म्हणाले, आपल्या जिल्ह्यात वाहनांच्या तुलनेत परवानाधारक कमी आहेत यावरून अनेक जण विना परवाना वाहन चालवित आहेत हे सिद्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. विनापरवाना वाहन चालविणे बेकायदेशीर तर आहेच सोबतच अपघाताला निमंत्रण देणारे आहे, असे ते म्हणाले. मोटर वाहन कायदा हा आपल्या भल्यासाठी असून दुचाकी चालवितांना हेल्मेट व चार चाकी चालविताना सीट बेल्ट आवश्य लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.रस्ता सुरक्षा हे एका दिवसाचे अभियान नसून नियमित आचरणात आणावी अशी जीवन सुरक्षा प्रक्रिया असल्याचे अरविंद साळवे यांनी सांगितले.निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते व गजानन नागुलवार यांची यावेळी भाषणे झाली.राज्य परिवहन महामंडळात विना अपघात २५ व त्याहून अधिक वर्ष सेवा करणाऱ्या वाहकांचा या यावेळी सत्कार करण्यात आला.  यावेळी उपस्थितांचे आभार वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांनी मानले. सदर कार्यक्रमाला विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यात अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशा स्थितीत रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे.कायद्याचे पालन कराकायदे पाळण्याबाबत आपण फार गंभीर राहत नसल्याचे नमूद करून मनीषा कोठारी म्हणाले, कायद्याचा आदर करायला पाहिजे. नागरिक म्हणून आपल्या हक्काबाबत जागृत तर असावेच सोबतच कर्तव्याची सुद्धा जाणिव ठेवावी. रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम पाळण्याची नागरिक म्हणून आपली जबाबदारी अधिक असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी अन्य कायद्याबाबतीत ही माहिती दिली. व सुरक्षित वाहन चालविण्याचा सल्ला दिला.

टॅग्स :Socialसामाजिक