लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील काही मुख्य व अंतर्गत रस्त्यांची अवस्था फारशी चांगली नाही. त्यातही बायपास रस्त्याची अवस्था बिकट झाली असतांना त्या रस्त्याचे नुतनीकरण करण्याऐवजी डागडुजी केली जात आहे. भंडारा शहरातील खांबतलाव चौक ते शास्त्री चौक मार्गाची ही डागडुजी केली जात आहे.रस्त्याच्या बाबतीत भंडारा शहर तेवढे नशीबवान नाही. जिल्हा परिषद चौक ते शितलामाता मंदिरपर्यंतचा रस्ता भंडारा - रामटेक महामार्ग अंतर्गत विकसीत करण्यात आला आहे. या मार्गाचे विस्तारीकरण झाले आहे. यापुढील टप्प्यात खात रोड ते रामटेकपर्यंतच्या रस्ता विस्तारीकरणाचे कार्य पूर्ण झाले आहे. मात्र शितलामाता मंदिर ते खांबतलाव चौकापर्यंतचा रस्ता बांधकामाला अजूनही सुरुवात झाली नाही. त्यातच खांबतलाव चौक ते शास्त्रीनगर चौकापर्यंतच्या रस्त्याची डागडुजी करण्याच्या कामाला प्रांरभ करण्यात आला आहे.या रस्त्यावर लहान मोठे असंख्य खड्डे आहेत. भंडाराहून तुमसरला जाण्यासाठी याच मार्गाचा उपयोग होत असतो. विशेष म्हणजे आंतरराज्य मार्गावरील वाहतूकही याच रस्त्याने होत असते.परिणामी या रस्त्याचे नुतनीकरणासह विस्तारीकरण होणे अत्यंत गरजेचे असतांना त्यावर फक्त डागडुजी केली जात आहे.डागडुजीत लाखोंची उलाढालसार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दरवर्षी अनेक रस्त्यांची डागडुजी केली जाते. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही उपलब्ध करुन दिला जातो. नविन रस्ता डांबरीकरणाचा करायला निधी मोठ्या प्रमाणात लागतो. मात्र डागडुजीत निधी अधिक दाखवून साहित्य मात्र कमी लागत असते. परिणामी रस्त्याच्या डागडुजीत कंत्राटदाराला चांगलाच फायदा होतो. परिणामी रस्त्याचे नविन बांधकामाचे टेंडर मिळविण्यापेक्षा डागडुजीचे काम करण्यात अनेकजण रस दाखवितात. परंतु ज्या रस्त्याचे नुतनीकरण आवश्यक असतांनाही त्यावर डांबराचा लेप लावून रहदारीसाठी रस्ता मोकळा केला जातो. मात्र अल्पावधीतच डांबर उखडून पुन्हा खड्डेमय मार्गाने प्रवाशांना रहदारी करावी लागत असते.
नूतनीकरणाऐवजी रस्त्याची डागडुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST
रस्त्याच्या बाबतीत भंडारा शहर तेवढे नशीबवान नाही. जिल्हा परिषद चौक ते शितलामाता मंदिरपर्यंतचा रस्ता भंडारा - रामटेक महामार्ग अंतर्गत विकसीत करण्यात आला आहे. या मार्गाचे विस्तारीकरण झाले आहे. यापुढील टप्प्यात खात रोड ते रामटेकपर्यंतच्या रस्ता विस्तारीकरणाचे कार्य पूर्ण झाले आहे. मात्र शितलामाता मंदिर ते खांबतलाव चौकापर्यंतचा रस्ता बांधकामाला अजूनही सुरुवात झाली नाही.
नूतनीकरणाऐवजी रस्त्याची डागडुजी
ठळक मुद्देभंडारातील प्रकार : दुरुस्ती केल्यानंतरही नागरिकांना त्रास