शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्यांचे धिंडवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 05:00 IST

राष्ट्रीय महामार्गासह राज्य आणि जिल्हा मार्गही आहे. या मार्गावरून अहोरात्र वाहतूक सुरू असते; परंतु राज्य आणि जिल्हा मार्गांची अवस्था गत काही वर्षांपासून दयनीय झाली आहे. रेतीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांबाबत तर विचारायची सोय नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्यावरून ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. यामुळे रस्ते ठिकठिकाणी उखडले आहेत. बांधकाम विभाग रस्त्यांची डागडुजी करते.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दरवर्षी पावसाळा आला की, रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर येतो. ठिकठिकाणचे रस्ते उखडतात. रस्त्यावरून चालणे कठीण होते. पावसामुळे रस्ते खड्येमय झाल्याची बोंब ठोकली जाते. मात्र, रस्त्यांचे खरे धिंडवडे ओव्हरलोड वाहतुकीने त्यातही रेतीच्या वाहनांमुळे निघत आहेत. ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आरटीओची असली तरी खड्डेमय रस्त्यांच्या डागडुजीचा फटका सार्वजनिक बांधकाम विभागाला बसतो. भंडारा जिल्ह्यात रस्त्याचे जाळे सर्वदूर पसरले आहेत. राष्ट्रीय महामार्गासह राज्य आणि जिल्हा मार्गही आहे. या मार्गावरून अहोरात्र वाहतूक सुरू असते; परंतु राज्य आणि जिल्हा मार्गांची अवस्था गत काही वर्षांपासून दयनीय झाली आहे. रेतीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांबाबत तर विचारायची सोय नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्यावरून ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. यामुळे रस्ते ठिकठिकाणी उखडले आहेत. बांधकाम विभाग रस्त्यांची डागडुजी करते. मात्र, काही दिवसांतच परिस्थिती ‘जैसे थे’ होते. पावसाळ्याच्या काळात तर हमखास रस्ते उखडतात. रस्ते उखडले की पावसाळ्याचे कारण पुढे करून त्यावर पांघरूण घातले जाते. मात्र, ओव्हरलोड वाहतुकीचा कुणीही उल्लेख करीत नाही. ३० ते ४० टन वजन घेऊन वाहने धावत असतात. यामुळे रस्ते पूर्णत: नादुरुस्त होत आहेत. ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी परिवहन विभागाची आहे. राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची आरटीओकडून नियमित तपासणी केली जाते; परंतु राज्य आणि जिल्हा मार्गावर धावणाऱ्या वाहनांची कधीच तपासणी होत नाही. आरटीओची जबाबदारी असली तरी रस्ता दुरुस्तीचा भुर्दंड मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला सहन करावा लागतो. नागरिकांच्या रोषाचाही सामना याच विभागाला करावा लागतो. भंडारा जिल्ह्यातून करचखेडा-करडी, विरली-लाखांदूर, तुमसर-रोहा, मोहाडी-रोहा, बपेरा-तुमसर, भंडारा-वरठी, तुमसर-गोंदिया यासह अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. रस्त्याच्या डागडुजीबाबत नागरिक नेहमी आक्रमक असतात; परंतु डागडुजी केल्यानंतरही रस्त्याची अवस्था कायम असते. 

तुमसर-मोहाडीत सर्वाधिक रस्ते नादुरुस्त- भंडारा जिल्ह्यातील सर्वाधिक नादुरुस्त रस्ते तुमसर आणि मोहाडी तालुक्यात आहेत. या तालुक्यात असलेल्या रेतीघाटावर जाणारे रस्ते खाचखडग्यांनी भरलेले आहेत. गावातून जाणाऱ्या राज्य आणि जिल्हा मार्गांची अवस्थाही दयनीय आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचून वाहनांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यासोबतच अपघाताची मालिकाही कायम असते.

 

टॅग्स :RainपाऊसTrafficवाहतूक कोंडी