शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

नाग नदीच्या काठावरील ५० गावांत ‘आरओ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2016 00:29 IST

गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या प्रभावक्षेत्रात येणाऱ्या आणि नागपूर शहरातून वाहणाऱ्या नाग नदीच्या काठावरील बहुतांश गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : पंचायत विभागाकडून प्रभावित गावांची यादी बनविण्याचे काम सुरूभंडारा : गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या प्रभावक्षेत्रात येणाऱ्या आणि नागपूर शहरातून वाहणाऱ्या नाग नदीच्या काठावरील बहुतांश गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या नदी काठावर वसलेल्या भंडारा जिल्ह्यातील सुमारे ५० गावांमध्ये शुद्ध पेयजलाचा पुरवठा करण्यासाठी आरओ (रिव्हर्स आॅस्मोसिस) प्लाँट लावण्यात येणार आहे. दूषित पाण्याच्या समस्येचा सामना करणाऱ्या या गावात अशा प्रकारचा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी अंतिम निर्णय झालेला नाही. परंतु, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी अलिकडेच अधिकाऱयंची बैठक बोलावून दूषित पाण्यामुळे प्रभावित गावाच्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रत्येक गावात आरओ प्लाँटसारखे उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहे. जिल्हाधिकारी डॉ.चौधरी यांच्या निर्देशानंतर, जिल्हा परिषदेचे पंचायत विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ही माहिती गोळा करीत आहेत. सूत्रानुसार, नागनदी काठावरील गावात आरओ प्लाँट बसविण्यात यावे, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका टाकण्यात आली होती. यात नाग नदीवर अवलंबून असलेल्या नळयोजनेच्या माध्यमातून या गावामध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या मुद्याकडे ध्यानाकर्षण करण्यात आले. १ सप्टेंबर रोजी या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. अहिरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) एस. एच. आडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता देशमुख व भूजल सर्व्हेक्षण व विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दूषित पाणी पुरवठ्यामुळे प्रभावित गावे, गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचे प्रभावक्षेत्रात येणारी गावे आणि नाग नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या स्वतंत्र नळयोजनेच्या गावाची वेगवेगळी यादी तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ही यादी संकलित करण्यात गुंतले सून हे काम ८ सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. नाग नदीच्या जलप्रदुषणामुळे प्रभावित नळयोजना ठरवून या गावात लोकसंख्येच्या आधारावर विविध क्षमतेचे आरओ प्लाँट लावण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)