शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

नाग नदीच्या काठावरील ५० गावांत ‘आरओ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2016 00:29 IST

गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या प्रभावक्षेत्रात येणाऱ्या आणि नागपूर शहरातून वाहणाऱ्या नाग नदीच्या काठावरील बहुतांश गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : पंचायत विभागाकडून प्रभावित गावांची यादी बनविण्याचे काम सुरूभंडारा : गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या प्रभावक्षेत्रात येणाऱ्या आणि नागपूर शहरातून वाहणाऱ्या नाग नदीच्या काठावरील बहुतांश गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या नदी काठावर वसलेल्या भंडारा जिल्ह्यातील सुमारे ५० गावांमध्ये शुद्ध पेयजलाचा पुरवठा करण्यासाठी आरओ (रिव्हर्स आॅस्मोसिस) प्लाँट लावण्यात येणार आहे. दूषित पाण्याच्या समस्येचा सामना करणाऱ्या या गावात अशा प्रकारचा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी अंतिम निर्णय झालेला नाही. परंतु, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी अलिकडेच अधिकाऱयंची बैठक बोलावून दूषित पाण्यामुळे प्रभावित गावाच्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रत्येक गावात आरओ प्लाँटसारखे उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहे. जिल्हाधिकारी डॉ.चौधरी यांच्या निर्देशानंतर, जिल्हा परिषदेचे पंचायत विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ही माहिती गोळा करीत आहेत. सूत्रानुसार, नागनदी काठावरील गावात आरओ प्लाँट बसविण्यात यावे, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका टाकण्यात आली होती. यात नाग नदीवर अवलंबून असलेल्या नळयोजनेच्या माध्यमातून या गावामध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या मुद्याकडे ध्यानाकर्षण करण्यात आले. १ सप्टेंबर रोजी या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. अहिरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) एस. एच. आडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता देशमुख व भूजल सर्व्हेक्षण व विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दूषित पाणी पुरवठ्यामुळे प्रभावित गावे, गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचे प्रभावक्षेत्रात येणारी गावे आणि नाग नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या स्वतंत्र नळयोजनेच्या गावाची वेगवेगळी यादी तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ही यादी संकलित करण्यात गुंतले सून हे काम ८ सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. नाग नदीच्या जलप्रदुषणामुळे प्रभावित नळयोजना ठरवून या गावात लोकसंख्येच्या आधारावर विविध क्षमतेचे आरओ प्लाँट लावण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)