शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

उमरवाडा वैनगंगेत गिळंकृत होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 23:42 IST

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जीवनदायिनी वैनगंगा नदीकाठ एकेकाळी सुपीक जमिनीसाठी ओळखला जात होता. मागील ८ ते १० वर्षात उमरवाडा गावासह परिसरातील चार ते पाच गावाच्या दिशेने नदी पात्र झपाट्याने पुढे सरकत आहे. आतापर्यंत सुमारे ९२ हेक्टर सुपीक शेती नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. शासन व प्रशासनाने वेळीच दखल घेतली ...

ठळक मुद्देउमरवाडा, बोरी, कोष्टी येथील ९२ हेक्टर शेती नदीपात्रात गेली

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जीवनदायिनी वैनगंगा नदीकाठ एकेकाळी सुपीक जमिनीसाठी ओळखला जात होता. मागील ८ ते १० वर्षात उमरवाडा गावासह परिसरातील चार ते पाच गावाच्या दिशेने नदी पात्र झपाट्याने पुढे सरकत आहे. आतापर्यंत सुमारे ९२ हेक्टर सुपीक शेती नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. शासन व प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर अख्खे गाव गिळंकृत होण्याची भिती आहे.भंडारा व गोंदिया जिल्ह्यांच्या सीमेवरून वैनगंगा नदी वाहते. तुमसर तालुक्यातील उमरवाडा गावाजवळून वैनगंगेचे पात्र आहे. मागील ८ ते १० वर्षात उमरवाडा नदी काठावरील अनेक शेतकºयांच्या सुमारे ३० ते ३१ हेक्टर शेती नदी पात्रात गिळंकृत झाली आहे.उमराडासह, बोरी, कोष्टी येथील ९२ हेक्टर शेती नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. अतिशय सुपिक शेती म्हणून या गावातील शेती ओळखली जाते. दरवर्षी पावसाळ्यात नदीला पूर आला तर शेती नदी पात्रात समाविष्ट होण्याचा क्रम सुरूच आहे. अनेक लहान मोठ्या शेतकºयांच्या शेती नदीने गिळंकृत केल्या आहेत.रोशन मेश्राम यांची उमरवाडा येथील नदीकाठावरील सुमारे ४.५० एकरशेती नदीपात्रात समाविष्ट झाली आहे. शासनाकडून आतापर्यंत कोणतीच दखल घेण्यात आली नाही. नदी पात्र दरवर्षी गावाच्या दिशेने सरकत असल्याने गावाला येथे धोका निर्माण झाला आहे.शासन दरबारी ४२ हेक्टर शेती नदी पात्रात समाविष्ट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. उमरवाडा व धाटकुरोडा येथील रेतीघाट शासनाने यापुर्वी लिलाव केले होते. बेसुमार रेती उपसा तिथे करण्यात आला. त्याचा फटका येथे बसल्याची माहिती आहे. सन २००२ व २००३ मध्ये येथे रेतीघाट लिलाव करण्यात आला होता.उमरवाडा, बोरी, कोष्टी, बाम्हणी येथील शेती नदी पात्रात गेल्याची माहिती शासनाला माजी आमदार अनिल बावणकर यांनी केली होती. तेव्हा तत्कालीन जिल्हाधिकारी सच्चिन्द्रप्रताप सिंग तथा तत्कालीन कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उमरवाडा,बोरी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. रेतीघाट लिलाव प्रक्रिया तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी येथे स्थगित केली होती. उमरवाडासह इतर नदी काठावरील १८ विहिरी नदीपात्रात समाविष्ट झाल्या आहेत हे विशेष.दुष्काळाचा फटकातुमसर तालुक्यात १९४८, १९४३ व १९४४ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. तुमसर शहराला कोष्टी पंपगृहातून पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे नदी पात्रात तात्पूरती पाण्याकरिता वळणमार्ग करण्यात आला होता. पावसाळ्यात या वळणमार्गाने पाण्याचा प्रवाह्य बदलल्याची माहिती वयोवृद्धांनी दिली. शेकडो नागरिकांनी तेव्हा लोकसहभागातून हा वळणमार्ग तयार केला होता.उमरवाडासह बोरी, कोष्टी व बाम्हणी गावाकडे नदी पात्र सरकत असून शेकडो एकर शेती नदीपात्रात जाणे सुरूच आहे. शासनाने दखल घेऊन उपाययोजना करावी.-रोशन मेश्राम, शेतकरी उमरवाडा.वैनगंगा नदीपात्र दिवसेंदिवस गावाकडे सरकत आहे. शेती गेलेल्या शेतकºयांनाम मोबदला शासनाने द्यावा. गावांचे संरक्षण करण्याच्या उपाययोजना शासनाने राबवावी. वैज्ञानिक उपाययोजना काय करता येईल याकरिता जिल्हाधिकाºयांनी शासनाला कळविण्याची गरज आहे.-के. के. पंचबुद्धे, जि.प. सदस्य देव्हाडी.