शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

उमरवाडा वैनगंगेत गिळंकृत होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 23:42 IST

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जीवनदायिनी वैनगंगा नदीकाठ एकेकाळी सुपीक जमिनीसाठी ओळखला जात होता. मागील ८ ते १० वर्षात उमरवाडा गावासह परिसरातील चार ते पाच गावाच्या दिशेने नदी पात्र झपाट्याने पुढे सरकत आहे. आतापर्यंत सुमारे ९२ हेक्टर सुपीक शेती नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. शासन व प्रशासनाने वेळीच दखल घेतली ...

ठळक मुद्देउमरवाडा, बोरी, कोष्टी येथील ९२ हेक्टर शेती नदीपात्रात गेली

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जीवनदायिनी वैनगंगा नदीकाठ एकेकाळी सुपीक जमिनीसाठी ओळखला जात होता. मागील ८ ते १० वर्षात उमरवाडा गावासह परिसरातील चार ते पाच गावाच्या दिशेने नदी पात्र झपाट्याने पुढे सरकत आहे. आतापर्यंत सुमारे ९२ हेक्टर सुपीक शेती नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. शासन व प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर अख्खे गाव गिळंकृत होण्याची भिती आहे.भंडारा व गोंदिया जिल्ह्यांच्या सीमेवरून वैनगंगा नदी वाहते. तुमसर तालुक्यातील उमरवाडा गावाजवळून वैनगंगेचे पात्र आहे. मागील ८ ते १० वर्षात उमरवाडा नदी काठावरील अनेक शेतकºयांच्या सुमारे ३० ते ३१ हेक्टर शेती नदी पात्रात गिळंकृत झाली आहे.उमराडासह, बोरी, कोष्टी येथील ९२ हेक्टर शेती नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. अतिशय सुपिक शेती म्हणून या गावातील शेती ओळखली जाते. दरवर्षी पावसाळ्यात नदीला पूर आला तर शेती नदी पात्रात समाविष्ट होण्याचा क्रम सुरूच आहे. अनेक लहान मोठ्या शेतकºयांच्या शेती नदीने गिळंकृत केल्या आहेत.रोशन मेश्राम यांची उमरवाडा येथील नदीकाठावरील सुमारे ४.५० एकरशेती नदीपात्रात समाविष्ट झाली आहे. शासनाकडून आतापर्यंत कोणतीच दखल घेण्यात आली नाही. नदी पात्र दरवर्षी गावाच्या दिशेने सरकत असल्याने गावाला येथे धोका निर्माण झाला आहे.शासन दरबारी ४२ हेक्टर शेती नदी पात्रात समाविष्ट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. उमरवाडा व धाटकुरोडा येथील रेतीघाट शासनाने यापुर्वी लिलाव केले होते. बेसुमार रेती उपसा तिथे करण्यात आला. त्याचा फटका येथे बसल्याची माहिती आहे. सन २००२ व २००३ मध्ये येथे रेतीघाट लिलाव करण्यात आला होता.उमरवाडा, बोरी, कोष्टी, बाम्हणी येथील शेती नदी पात्रात गेल्याची माहिती शासनाला माजी आमदार अनिल बावणकर यांनी केली होती. तेव्हा तत्कालीन जिल्हाधिकारी सच्चिन्द्रप्रताप सिंग तथा तत्कालीन कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उमरवाडा,बोरी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. रेतीघाट लिलाव प्रक्रिया तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी येथे स्थगित केली होती. उमरवाडासह इतर नदी काठावरील १८ विहिरी नदीपात्रात समाविष्ट झाल्या आहेत हे विशेष.दुष्काळाचा फटकातुमसर तालुक्यात १९४८, १९४३ व १९४४ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. तुमसर शहराला कोष्टी पंपगृहातून पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे नदी पात्रात तात्पूरती पाण्याकरिता वळणमार्ग करण्यात आला होता. पावसाळ्यात या वळणमार्गाने पाण्याचा प्रवाह्य बदलल्याची माहिती वयोवृद्धांनी दिली. शेकडो नागरिकांनी तेव्हा लोकसहभागातून हा वळणमार्ग तयार केला होता.उमरवाडासह बोरी, कोष्टी व बाम्हणी गावाकडे नदी पात्र सरकत असून शेकडो एकर शेती नदीपात्रात जाणे सुरूच आहे. शासनाने दखल घेऊन उपाययोजना करावी.-रोशन मेश्राम, शेतकरी उमरवाडा.वैनगंगा नदीपात्र दिवसेंदिवस गावाकडे सरकत आहे. शेती गेलेल्या शेतकºयांनाम मोबदला शासनाने द्यावा. गावांचे संरक्षण करण्याच्या उपाययोजना शासनाने राबवावी. वैज्ञानिक उपाययोजना काय करता येईल याकरिता जिल्हाधिकाºयांनी शासनाला कळविण्याची गरज आहे.-के. के. पंचबुद्धे, जि.प. सदस्य देव्हाडी.