शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

कांदा, बटाट्यावरच काही दिवस भागवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 05:00 IST

भाजीपाला महागला तर काही दिवस कडधान्य खाऊन काम चालवून घ्यावे असे नियोजन केले जात होते. मात्र आता कडधान्यांचे दरही आवाक्याबाहेर झाले असून त्यात भाजीपाला एवढा महागला आहे की, सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करताना घाम फुटत आहे.  विशेष म्हणजे, आता उन्हाळ्यात पालेभाज्या बाजारातून गायब होणार असल्याने त्यांचे दर चांगलेच भडकले असून त्यांच्यापासून सर्वसामान्य माणूस चार हात लांबच राहत आहे. मात्र अन्य भाज्याही वधारल्या असून त्यांचे दर ऐकताच ते घेण्याची हिम्मत सर्वसामान्यांची होत नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  वरण, भात, भाजी व पोळी ही जेवणाची क्रमावली असून दोनच्या वेळच्या जेवणात ताटात हे पदार्थ असलेला माणूस जगातला सर्वात सुखी माणूसच ठरणार. कारण, या दोन वेळच्या जेवणासाठी अवघ्या जगावर मानवजातीची धावपळ सुरू आहे. ताटातून यातील एक जरी पदार्थ चुकला तरी तो दिवस चांगला जात नाही. मात्र आजघडीला देशाला झपाटलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांना दोन वेळच्या जेवणासाठी धडपड करूनही ते कठीण होत चालले आहे. सर्वच वस्तूंचे दर भडकले असून किराणा माल असो की भाजीपाला त्यांचे भाव ऐकून धडकी भरू लागते.भाजीपाला महागला तर काही दिवस कडधान्य खाऊन काम चालवून घ्यावे असे नियोजन केले जात होते. मात्र आता कडधान्यांचे दरही आवाक्याबाहेर झाले असून त्यात भाजीपाला एवढा महागला आहे की, सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करताना घाम फुटत आहे. विशेष म्हणजे, आता उन्हाळ्यात पालेभाज्या बाजारातून गायब होणार असल्याने त्यांचे दर चांगलेच भडकले असून त्यांच्यापासून सर्वसामान्य माणूस चार हात लांबच राहत आहे. मात्र अन्य भाज्याही वधारल्या असून त्यांचे दर ऐकताच ते घेण्याची हिम्मत सर्वसामान्यांची होत नाही. यामुळेच आता भाजीपाल्याचे दर उतरत पर्यंत जेवणात कांदा-बटाटा किंवा टमाटरची चटणी याशिवाय पर्याय उरलेला नाही. परिणामी आता ताटातून भाजीपाला दिसेनासा झाला असून कांदा-बटाट्याची भाजी दिसून येत आहे. 

कोठेही जा हेच दर 

- भाजीपाला चांगलाच भडकला हे दर शहरांपुरतेच मर्यादित नसून कोठेही जा हेच दर दिसून येत आहेत. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातून येणारे कित्येक जण भाजीपाला शहरातील बाजारातून खरेदी करून नेतात. दरवाढीने गृहीणींचे अंदाजपत्रक बिघडले आहे.

 लिंबू ३०० रुपयांवर 

मध्यंतरी ६०-७० रूपये किलो वर असलेले लिंबू आता ३०० रूपये किलो दराने विकले जात आहे. काही दिवसांपूर्वीच असलेल्या नवरात्रीमध्येही नागरिकांना लिंबू मिळाले नाही अशी परिस्थिती आहे. दर भडकल्यामुळे आंबट लिंबू कडू झाला आहे..

भाव आणखी वाढणार

उन्हाळ्यात कित्येक भाज्यांचे उत्पादन होत नाही. शिवाय जो भाजीपाला येतो तो बहुतांश बाहेरून येतो. म्हणजेच, कमी उत्पादन व त्यात बाहेरून येत असल्याने लागणारे भाडे यामुळे भाजीपाल्याचे दर आणखी वाढणार यात शंका नाही.

 

टॅग्स :vegetableभाज्या