शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

तांदूळ तस्करीचे नेटवर्क गावापासून तेलंगणापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:41 IST

साकाेली तालुक्यात २२ लाख ५० हजार रुपयांची वाटमारी झाली आणि तेथून तांदूळ तस्करीचे बिंग फुटले. भाताचे काेठार म्हणून ओळखल्या ...

साकाेली तालुक्यात २२ लाख ५० हजार रुपयांची वाटमारी झाली आणि तेथून तांदूळ तस्करीचे बिंग फुटले. भाताचे काेठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा आणि गाेंदिया जिल्ह्यांतच तांदळाची चाेरटी आयात केली जाते. यामागचे खरे अर्थकारण आता हळूहळू पुढे येऊ लागले आहे. रेशनच्या धान्याची काळ्याबाजारात माेठ्या प्रमाणात विक्री केली जाते. लाभार्थ्यांना अत्यल्प दरात धान्याचा पुरवठा हाेताे. त्यात तांदळाचाही समावेश आहे. अनेकजण हा तांदूळ विकतात; परंतु यापेक्षाही अनेक रेशन दुकानदारही तांदळाच्या काळाबाजारात सहभागी आहेत. आलेला माल नाममात्र वितरित करून उर्वरित तांदूळ तस्करांच्या घशात घातला जाताे. भंडारा जिल्ह्यातील वाटमारीने तांदूळ तस्करी पुढे आली. मात्र याचे सर्व धागेदाेरे तेलंगणातून अण्णांच्या हाती आहे. विदर्भातून गेलेला तांदूळ पुन्हा राईस मिलर्सच्या माध्यमातून शासनाच्या गाेदामापर्यंत पाेहाेचविला जाताे. भंडारा जिल्ह्यात राेज साधारणत: २० ते २५ तांदळाचे ट्रक तेलंगणातून बिनधास्त येतात. वाटेत काेणतीही अडचण आली की, पैशाच्या बळावर ती साेडविली जाते. त्यामुळे आतापर्यंत हा प्रकार बिनबाेभाटपणे सुरू आहे. काेणताही अधिकारी यात कारवाई करताना दिसत नाही. उलट तांदळाची आयात करण्यास मनाई नसल्याचे सांगतात. मात्र आयात हाेणारा तांदूळ नेमका काेणता आहे, ताे कुठे जाताे याचा कुणीही शाेध घेत नाही. व्यापाऱ्यांचा तांदूळ असेल तर आयात-निर्यातीचा प्रश्नच नाही; परंतु चाेरट्या मार्गाने हा तांदूळ पुन्हा शासनाच्या गाेदामाकडे जात असेल तर त्याकडे कारवाई का नाही, अशा प्रश्न केला जात आहे.

शासकीय यंत्रणेतील अनेकजण या तांदूळ तस्करीत सहभागी असून त्यामुळे काेणतीही कारवाई हाेत नाही. साकाेली येथे गुन्हा दाखल असून पाेलिसांनी तांदूळ तस्करीच्या दिशेने तपास सुरू केला. तेव्हा त्यांच्यावर दबाव येत असल्याची माहिती आहे. यासाेबतच अण्णासाेबत अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचीही चर्चा साकाेलीत आहे.

बाॅक्स

कापसाची बाजारपेठ, तस्करीचे मुख्य केंद्र

तेलंगणा राज्यातील अदिलाबाद हे कापसाच्या व्यापाऱ्यासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. एकाधिकार याेजना असताना माेठ्या प्रमाणात कापूस चाेरट्या मार्गाने विदर्भातून अदिलाबादला जात हाेता. आता अदिलाबाद हे तांदूळ तस्करीचे केंद्र झाले आहे. विदर्भातील तांदूळ खरेदी करून त्या ठिकाणी साठविला जाताे आणि संधी मिळताच पुन्हा ताे भंडारा-गाेंदिया जिल्ह्यांच्या माध्यमातून शासनाच्या गाेदामात पाेहाेचताे. यात काेट्यवधी रुपयांची उलाढाल हाेत आहे.

बाॅक्स

तस्करांचे नेटवर्क गावागावांत

तांदूळ खरेदी करणाऱ्या तस्करांचे नेटवर्क गावागावांत आहे. गरजवंतांकडून तांदूळ खरेदी करण्यासाेबतच स्वस्त धान्य दुकानदारांनाही या तस्करांनी गळाला लावले आहे. अगदी कमी किमतीत तांदूळ खरेदी करून ताे पुन्हा शासनाच्या गाेदामापर्यंत पाेहाेचविण्याची किमया ही तस्कर मंडळी लीलया पार पाडतात.