शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
3
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
4
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
5
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
6
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
7
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
8
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
9
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
10
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
11
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
12
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
13
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
14
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
15
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
16
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
17
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
18
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ
19
प्रेमासाठी मोलकरीण बनली चोर, ज्या घरात करायची धुणीभांडी तिथेच मारला डल्ला, त्यानंतर...  

तांदळाचे दर घसरले

By admin | Updated: December 27, 2015 00:51 IST

केंद्र सरकारने हरितक्रांती करीत तंत्रज्ञानाने शेती करण्याचे आवाहन केले. खर्चाची मर्यादा कमाल करून आयात बंद करून निर्यात काही काळ सुरु केली.

पालांदूर : केंद्र सरकारने हरितक्रांती करीत तंत्रज्ञानाने शेती करण्याचे आवाहन केले. खर्चाची मर्यादा कमाल करून आयात बंद करून निर्यात काही काळ सुरु केली. परंतु मागील वर्षापासून निर्यात थांबल्याने फाईन धान, तांदळाला योग्य बाजारपेठ नसल्याने धान, तांदळाचे दर घसरले असून चांगल्या धानाची शेती संकटात आली आहे.भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व अर्धा नागपूर जिल्ह्यात धान पिक घेत जाड व फाईन धान पिकविले जाते. सिंचीत शेतीत फाईन धान पिकविले जाते. तर कोरडवाहू शेतीत जाड धानाला कमी खर्चामुळे प्राधान्य दिले जाते. प्रक्रियेला उद्योगात जाड धानावर प्रक्रिया करून पोहे, मुरमुरा, चिवडी तयार केली जाते. महाराष्ट्रात प्रक्रिया उद्योग अत्यल्प असल्याने जाड धानाला भाव नाही. पालांदूर जवळील पाथरी, मऱ्हेगाव, लोहारा, नरव्हा, खराशी, खुनारी आदी गावातून व्यापाऱ्यांच्या मदतीने रोजच जाड धानाचे ट्रक आंध्रप्रदेशात जात असल्याचे कळले. नेट बँकेच्या सुविधेमुळे व्यवहार होत असून खासगी व्यापारी मालामाल होत असून शेतकरी मात्र जिथल्या तिथेच आहे.बारीक धानात जय श्रीराम, एचएमटी, आरपीएन ला मान्यता असून यांचा एकरी उत्पन्न जाड धान्याच्या निम्मेच असते. आज जयश्रीराम धान २००० रुपये तर तांदूळ ३३०० ते ३५०० रुपये पर्यंत मागील वर्षाला याच धानाला २८०० - ३००० रुपये प्रतिक्विंटल भाव असून ४५०० - ४८०० रुपये दराने तांदूळ विकल्या गेला. भंडाऱ्यातील तांदूळ महोत्सवातही चांगली मागणी होती. यात शेतकरी ग्राहक असा थेट व्यवहारामुळे व्यवहार पारदर्शक घडतो. हाच तांदूळ मुंबई दिल्लीला १०० ते १२० रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे. (वार्ताहर)