शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

तांदळाचे दर घसरले

By admin | Updated: December 27, 2015 00:51 IST

केंद्र सरकारने हरितक्रांती करीत तंत्रज्ञानाने शेती करण्याचे आवाहन केले. खर्चाची मर्यादा कमाल करून आयात बंद करून निर्यात काही काळ सुरु केली.

पालांदूर : केंद्र सरकारने हरितक्रांती करीत तंत्रज्ञानाने शेती करण्याचे आवाहन केले. खर्चाची मर्यादा कमाल करून आयात बंद करून निर्यात काही काळ सुरु केली. परंतु मागील वर्षापासून निर्यात थांबल्याने फाईन धान, तांदळाला योग्य बाजारपेठ नसल्याने धान, तांदळाचे दर घसरले असून चांगल्या धानाची शेती संकटात आली आहे.भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व अर्धा नागपूर जिल्ह्यात धान पिक घेत जाड व फाईन धान पिकविले जाते. सिंचीत शेतीत फाईन धान पिकविले जाते. तर कोरडवाहू शेतीत जाड धानाला कमी खर्चामुळे प्राधान्य दिले जाते. प्रक्रियेला उद्योगात जाड धानावर प्रक्रिया करून पोहे, मुरमुरा, चिवडी तयार केली जाते. महाराष्ट्रात प्रक्रिया उद्योग अत्यल्प असल्याने जाड धानाला भाव नाही. पालांदूर जवळील पाथरी, मऱ्हेगाव, लोहारा, नरव्हा, खराशी, खुनारी आदी गावातून व्यापाऱ्यांच्या मदतीने रोजच जाड धानाचे ट्रक आंध्रप्रदेशात जात असल्याचे कळले. नेट बँकेच्या सुविधेमुळे व्यवहार होत असून खासगी व्यापारी मालामाल होत असून शेतकरी मात्र जिथल्या तिथेच आहे.बारीक धानात जय श्रीराम, एचएमटी, आरपीएन ला मान्यता असून यांचा एकरी उत्पन्न जाड धान्याच्या निम्मेच असते. आज जयश्रीराम धान २००० रुपये तर तांदूळ ३३०० ते ३५०० रुपये पर्यंत मागील वर्षाला याच धानाला २८०० - ३००० रुपये प्रतिक्विंटल भाव असून ४५०० - ४८०० रुपये दराने तांदूळ विकल्या गेला. भंडाऱ्यातील तांदूळ महोत्सवातही चांगली मागणी होती. यात शेतकरी ग्राहक असा थेट व्यवहारामुळे व्यवहार पारदर्शक घडतो. हाच तांदूळ मुंबई दिल्लीला १०० ते १२० रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे. (वार्ताहर)