शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण केंद्राचे पुनरुज्जीवन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2017 00:19 IST

राज्यातील ग्रामीण भागातील दिर्घकालीन गरजांचा व आरोग्याचा विचार करुन ग्रामीण जनतेस पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी....

गणेशपूरला ५७ लाखांचा निधी मंजूर : मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचे अर्थसहाय्य, नागरिकांना मिळणार शुद्ध पिण्याचे पाणीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील ग्रामीण भागातील दिर्घकालीन गरजांचा व आरोग्याचा विचार करुन ग्रामीण जनतेस पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेतून गणेशपूर ग्रामपंचायतच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या पुनरुज्जीवनासाठी ५६ लाख ८१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून येत्या काही दिवसातच गणेशपूरवासीयांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. वैनगंगा नदीचे दूषित पाणी नागरिकांना नळाद्वारे पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने बाजू लावून धरली होती. १७ एप्रिलच्या अंकात ‘दोन लाख नागरिकांच्या हातात विषाचा प्याला’ या आशयाचे वृत्त प्रकाशित होताच, याची दखल घेत जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने याचा पाठपुरावा केला. याबाबत मुंबई येथे १८ एप्रिलला तातडीची बैठक बोलविण्यात आली. या बैठकीत गणेशपूर येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या पुनरुज्जीवनासाठी तातडीने ५६ लाख ८१ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला. याबाबत राज्यशासनाने ३ मे ला अधिसूचना जारी केली आहे. यामुळे येत्या कालावधीत मागील काही वर्षांपासून रखडलेले गणेशपूर येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम आता मार्गी लागणार आहे. या कामासाठी जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, ग्रामपंचायत गणेशपूर, पाणीपुरवठा विभाग भंडारा यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याची फलश्रृती शासनाने गणेशपूर येथील जलशुध्दीकरण केंद्राला निधी देवून नागरिकांना पिण्याच्या पाण्याबाबत दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे. प्रशासनाच्या कार्यतत्परतेवर केंद्राचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.जि.प. कडे राहणार अधिकारपाणीपुरवठ्याच्या योजना यापुर्वी ग्रामपंचायतच्या अधिकारात राहत होत्या. मात्र त्यांच्याकडून योग्य अंमलबजावणी होत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनात आली. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेची अंमलबजावणी योग्यरीत्या व्हावी यासाठी आता या योजनांचे अधिकार जिल्हा परिषद प्रशासनाकडे राहणार आहे. जि.प. सभेत उचलला मुद्दागणेशपूर येथे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने स्वजलधारा, महाजनधारा अंतर्गत पाणीपूरवठ्याची योजना तयार केली. त्या योजनेचे २० टक्के काम शिल्लक असून ते पूर्ण करण्यासाठी निधी देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी जि.प. सर्व साधारण सभेत लावुन धरली होती. यानंतर जलशुद्धीकरण योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करण्याबाबत पाहणी करुन अंदाजपत्रक तयार करण्यात आले. यानुसार प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविण्यात आला होता. त्याअनुषंगाने हा निधी उपलब्ध झाला आहे. ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाचा पाठपुरावागणेशपूर ग्रामवासीयांना शुध्द पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जलशुध्दीकरण यंत्राचे रखडलेले काम पुर्ण करण्यासाठी शासनाने निधी द्यावा अशी मागणी गणेशपूर ग्रामपंचायतीने अनेकदा शासनाकडे लावून धरली. या अनुषंगाने जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने ही याचा सतत पाठपुरावा केल्याने हा निधी उपलब्ध झाला आहे.नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करुन देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. या अनुषंगाने सर्वांना शुध्द पिण्याचे पाणी मिळावे यासाठी सतत पाठपुरावा करण्यात आला. प्रशासनाने याची दखल घेवून निधी उपलब्ध करुन दिला. येत्या कालावधीत जलशुध्दीकरण यंत्राचे रखडलेले काम पूर्ण होवून नागरिकांना शुध्द पिण्यासाठी पाणी मिळेल.- जया सोनकुसरे,जिल्हा परिषद सदस्य, भंडारा