शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा धानाला फटका : कडपा ओल्या, ढगाळ वातावरणाने कापणीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 14:00 IST

दिवाळी तोंडावर असल्याने शेतकरी धान काढणीची लगबग करीत आहे. मात्र, गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काढणीला ब्रेक लागला होता. त्यातच रविवारी आणि सोमवारी जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस बरसला.

भंडारा : निसर्गाचे दृष्टचक्र शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागले असून, आता हाताशी आलेले धान परतीच्या पावसात उद्ध्वस्त होत आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत कोसळणाऱ्या या पावसाचा फटका उभ्या धान पिकाला बसत आहे. अनेक शेतात पाणी साचले असून, कापलेल्या धानाचा कडपाही ओला होत आहे.

भंडारा जिल्ह्यात हलक्या प्रतीचे धान काढणीला आले असून, दिवाळी तोंडावर असल्याने शेतकरी धान काढणीची लगबग करीत आहे. मात्र, गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काढणीला ब्रेक लागला होता. त्यातच रविवारी आणि सोमवारी जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे शेतात उभा असलेले धान पीक ओले झाले, तर अनेक शेतात शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून कडपा बांधून ठेवल्या होत्या. पावसाचे पाणी साचल्याने धान कडपा ओल्या झाल्या आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

हाता-तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्ग हिरावून नेत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. सुरुवातीला पावसाने दगा दिला. त्यानंतर पाऊस बरसला. मात्र, त्याच काळात तुडतुड्यासह विविध किडींचे आक्रमण झाले. गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात धान काढणीचा हंगाम सुरू झाला होता. परंतु, आता ढगाळ वातावरण आणि काही भागात पाऊस बरसत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. धान ओले झाल्यास धान पाखर होऊन बेचव होते. त्याला बाजारात कोणतीही किंमत येत नाही. निसर्गापुढे जिल्ह्यातील शेतकरी हतबल दिसत आहेत.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

जिल्ह्यात यावर्षी एक लाख ९० हजार हेक्टरवर धानाची राेवणी झाली होती. यात सर्वाधिक धान हलक्या प्रतीचे म्हणजे कमी दिवसात काढणीला येणारे आहे. गत १५ दिवसांपासून हे धान पीक काढणीला आले आहे. अनेक शेतात कापणीचे काम सुरू आहे. परंतु, अशातच परतीचा पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अनेक शेतकरी धानाच्या कडपा एकत्र करून त्या ताडपत्रीने झाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत आहे. पवनी, भंडारा, लाखनी, तुमसर, मोहाडी, साकोली तालुक्याला पावसाचा फटका बसत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी