शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

परतीच्या पावसाचा धानाला फटका : कडपा ओल्या, ढगाळ वातावरणाने कापणीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 14:00 IST

दिवाळी तोंडावर असल्याने शेतकरी धान काढणीची लगबग करीत आहे. मात्र, गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काढणीला ब्रेक लागला होता. त्यातच रविवारी आणि सोमवारी जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस बरसला.

भंडारा : निसर्गाचे दृष्टचक्र शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागले असून, आता हाताशी आलेले धान परतीच्या पावसात उद्ध्वस्त होत आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत कोसळणाऱ्या या पावसाचा फटका उभ्या धान पिकाला बसत आहे. अनेक शेतात पाणी साचले असून, कापलेल्या धानाचा कडपाही ओला होत आहे.

भंडारा जिल्ह्यात हलक्या प्रतीचे धान काढणीला आले असून, दिवाळी तोंडावर असल्याने शेतकरी धान काढणीची लगबग करीत आहे. मात्र, गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काढणीला ब्रेक लागला होता. त्यातच रविवारी आणि सोमवारी जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे शेतात उभा असलेले धान पीक ओले झाले, तर अनेक शेतात शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून कडपा बांधून ठेवल्या होत्या. पावसाचे पाणी साचल्याने धान कडपा ओल्या झाल्या आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

हाता-तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्ग हिरावून नेत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. सुरुवातीला पावसाने दगा दिला. त्यानंतर पाऊस बरसला. मात्र, त्याच काळात तुडतुड्यासह विविध किडींचे आक्रमण झाले. गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात धान काढणीचा हंगाम सुरू झाला होता. परंतु, आता ढगाळ वातावरण आणि काही भागात पाऊस बरसत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. धान ओले झाल्यास धान पाखर होऊन बेचव होते. त्याला बाजारात कोणतीही किंमत येत नाही. निसर्गापुढे जिल्ह्यातील शेतकरी हतबल दिसत आहेत.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

जिल्ह्यात यावर्षी एक लाख ९० हजार हेक्टरवर धानाची राेवणी झाली होती. यात सर्वाधिक धान हलक्या प्रतीचे म्हणजे कमी दिवसात काढणीला येणारे आहे. गत १५ दिवसांपासून हे धान पीक काढणीला आले आहे. अनेक शेतात कापणीचे काम सुरू आहे. परंतु, अशातच परतीचा पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अनेक शेतकरी धानाच्या कडपा एकत्र करून त्या ताडपत्रीने झाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत आहे. पवनी, भंडारा, लाखनी, तुमसर, मोहाडी, साकोली तालुक्याला पावसाचा फटका बसत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी