लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्याच्या सातही तालुक्यातील ८९८ गावांपैकी ४५४ गावे बाधित झाले असल्याचा कृषी अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये ८०८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १० हजार ५२९ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पंचनामे अद्याप पूर्ण झाले नसून या संपूर्ण आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. आता मुख्यमंत्र्यांनी निधी देण्याची घोषणा केल्याने नुकसान भरपाई मिळणार आहे.जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. कृषी विभाग, तहसील विभाग आणि त्रिसदस्यीय समितीने केलेल्या पंचनाम्यात वेगवेगळे आकडे आलेले आहेत. आणि अजूनही पंचनामे सुरू असल्याने या सर्व आकड्यात बदल होणार आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार भंडारा तालुक्यामध्ये १४१ गाव, पवनी तालुक्यामध्ये ६२ गावे, मोहाडी तालुक्यामध्ये १२ गावे, साकोली तालुक्यामध्ये ६७ गावे, लाखनी तालुक्यामध्ये ९४ गावे आणि लाखांदूर तालुक्यामध्ये ६३ गावे बाधित झालेली आहेत.तहसीलदार यांच्या अहवालानुसार १० हजार ५२९ शेतकºयांचे पीक या पावसामुळे खराब झाले आहेत. तर, त्रिसमितीच्या सदस्यांनी केलेल्या प्रत्यक्ष पंचनाम्यानुसार एकूण ९ हजार ४४३ शेतकरी बाधित झाले असून त्यात ३० टक्क्यांच्या आत ३३0५ शेतकरी आणि ३० टक्क्यांच्या वर ६१३८ शेतकरी बाधित झालेले आहेत. अजूनही १४८० शेतकºयांचे शेतीचे पंचनामे करणे बाकी असल्याने या आकडेवारीमध्ये बदल होणार आहे. भंडारा जिल्ह्यात मुख्यत्वे धानाची शेती केली जाते. त्यामुळे, परतीच्या पावसात धानाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता शेतकºयांना मदतीची प्रतीक्षा आहे.
परतीच्या पावसाची नुकसानभरपाई मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:01 IST
जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. कृषी विभाग, तहसील विभाग आणि त्रिसदस्यीय समितीने केलेल्या पंचनाम्यात वेगवेगळे आकडे आलेले आहेत. आणि अजूनही पंचनामे सुरू असल्याने या सर्व आकड्यात बदल होणार आहे.
परतीच्या पावसाची नुकसानभरपाई मिळणार
ठळक मुद्दे४५४ गावे बाधित : आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता