शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

सेवानिवृत्तांचे पेन्शन थांबले

By admin | Updated: March 30, 2017 00:30 IST

संगणकात बिघाडाचे कारण सांगुन गत महिन्यापासून जिल्ह्यातील आठशे पेंशनर्सची पेंशन थांबवून सेवानिवृत्त झालेल्यांना ....

बँकेकडून अन्याय : उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवरराहुल भुतांगे तुमसर संगणकात बिघाडाचे कारण सांगुन गत महिन्यापासून जिल्ह्यातील आठशे पेंशनर्सची पेंशन थांबवून सेवानिवृत्त झालेल्यांना तसेच जेष्ठ नागरिकांना प्रताडीत करण्याचा प्रकार राष्ट्रीयकृत बँकेनी सुरु केला आहे. परिणामी जेष्ठ नागरिकांच्या औषधोपचार व उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.सर्व राष्ट्रीयकृत बँकानी सेवा निवृत्त तसेच ज्येष्ठ नागरिकांना विशेष सहकार्य करने बंधनकारक आहे ते वयोवृध्द असल्याने त्यांना चालणे, फिरणे, रांगे उभे राहणे जरा कठीनच आहे. परंतु त्यांनाही महिन्यातून एकदा बँकेचे चकारा माराव्याच लागतात. कारण ही तसेच आहे. ते म्हणजे पेंशश्नची उचल करण्याकरिता सेवानिवृत्त व ज्येष्ठ नागरिकांची पेंशन ही राष्ट्रीयकृत बँकेतच जमा होते. तिथुन त्यांना पैसेही मिळतात. परंतू त्याच बरोबर त्यांना त्रासही तितकाच दिल्या जातो. आधीच घरच्या समस्यांचा निपटारा करत करत त्यांच कंबरडे मोडले. त्यात बँकवाल्यांनी अधिकची भर घातली. व जानेवारी २०१७ पासून जीवन प्रमाणपत्र दिल्यावरही पेंशन बँक खात्यात जमा केली नाही. याबाबद विचारणा केल्यास सिस्टम प्रॉब्लेम एकमेव कारण सांगितले जाते किंवा मग सेंट्रलाईज पेंशन प्रोसेसिंग सेंटर मुंबईकडे विचारा असे सांगितल्या जाते. इनकम टॅक्स मध्ये येत नसतांना बँकेमार्फत अव्वाच्या सव्वा टीडीएस कापले जात आहेत. ज्येष्ठ नागरिकांकरिता सरकारने तीन लाख रुपयाची सुट ईनकम टॅक्समध्ये दिली आहे. जर पेंशनच्या स्वरुपात ३ लाख १५ हजार रुपये मिळत असतील तर १५ हजार रुपयावर टॅक्स लावायला पाहिजे. मात्र बँक तसे न करता ६५ हजार रुपये टि.डी.एस. कपात करते. हे अन्यायकारक आहे. जिल्ह्यातील बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, स्टेट बँक आदी राष्ट्रीयकृत बँकेचा सेवानिवृत्त लोकांच्या खात्यात पीपीओच्या आधारावर पेंशन फिक्शेसन न करता त्यांना पाहिजे ती पेंशन दिल्या जात नाही. त्याचबरोबर पेंशन धारकांना न विचारणा त्यांच्या खात्यातून परस्पर पैसे कपात करणे, केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत सातवा वेतन आयोग चे फिक्शेसन करुन पेशंनही दिल्या जात नाही. त्यामुळे पेंशनर्स वैतागले असून केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडव्यावात व तीन महिन्यापासून रखडलेली पेंशन त्वरीत पाठवून त्यांच्या औषधोपचार व उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवून सन्मानाने जगू देण्याची विनंतीही केंद्र शासनाला पाठविलेल्या निवेदनात पेन्शनर्सनी केली आहे.