शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

देशाची एकता व अखंडता कायम ठेवण्याची जबाबदारी सर्वांची

By admin | Updated: November 2, 2015 00:49 IST

भाषा, राहणीमान, खानपान, संस्कृती याबाबतीत विविधता असूनही एकता असणारा भारत हा जगाच्या पाठीवर एकमेव असा देश आहे. ..

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : एकता व संकल्प दिनाचे आयोजनभंडारा : भाषा, राहणीमान, खानपान, संस्कृती याबाबतीत विविधता असूनही एकता असणारा भारत हा जगाच्या पाठीवर एकमेव असा देश आहे. देशाची ही एकता, अखंडता अबाधित राहण्यासाठी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बहुमुल्य योगदान दिले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन देशाची एकता अखंडीत राखण्याची जबाबदारी आता आपल्याला पार पाडायची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संकल्प दिनाचे आयोजन जिल्हा क्रिडा संकुल येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप झळके, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिल्लारी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, शिक्षणाधिकारी किसन शेंडे, तहसिलदार सुशांत बनसोडे उपस्थित होते. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला स्कॉऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी माल्यार्पण केले. जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप झळके यांनी एकता दौडला हिरवी झेंडी दाखवून रॅलीला प्रारंभ झाला. तत्पूर्वी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सर्व उपस्थितांना एकतेची शपथ दिली. यावेळी मार्गदर्शन करताना राजेंद्र निंबाळकर म्हणाले, देशाची एकता, अखंडता व सुरक्षितता राखण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. अशावेळी आपापसातील मतभेद व कलह देशाची सार्वभौमत्वता टिकविण्यासाठी मोठी अडचण ठरते. आपण सर्वांशी मैत्रीची भावना टिकविली पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या विकासासाठी हातभार लावण्याची आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन केले. राष्ट्रीय एकता दौडमध्ये शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, खेळाडू, शिक्षक, पोलिस तसेच शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून प्रारंभ होऊन त्रिमूर्ती चौक मार्गे- मुस्लीम लॉयब्ररी चौक- पोस्ट आॅफिस चौक यामार्गे शिवाजी क्रीडा संकुल येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी सुवर्णलता घोडेस्वार आणि संचालन क्रिडा अधिकारी अनिराम मरसकोल्हे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)