शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

देशाची एकता व अखंडता कायम ठेवण्याची जबाबदारी सर्वांची

By admin | Updated: November 2, 2015 00:49 IST

भाषा, राहणीमान, खानपान, संस्कृती याबाबतीत विविधता असूनही एकता असणारा भारत हा जगाच्या पाठीवर एकमेव असा देश आहे. ..

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : एकता व संकल्प दिनाचे आयोजनभंडारा : भाषा, राहणीमान, खानपान, संस्कृती याबाबतीत विविधता असूनही एकता असणारा भारत हा जगाच्या पाठीवर एकमेव असा देश आहे. देशाची ही एकता, अखंडता अबाधित राहण्यासाठी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बहुमुल्य योगदान दिले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन देशाची एकता अखंडीत राखण्याची जबाबदारी आता आपल्याला पार पाडायची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संकल्प दिनाचे आयोजन जिल्हा क्रिडा संकुल येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप झळके, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिल्लारी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, शिक्षणाधिकारी किसन शेंडे, तहसिलदार सुशांत बनसोडे उपस्थित होते. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला स्कॉऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी माल्यार्पण केले. जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप झळके यांनी एकता दौडला हिरवी झेंडी दाखवून रॅलीला प्रारंभ झाला. तत्पूर्वी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सर्व उपस्थितांना एकतेची शपथ दिली. यावेळी मार्गदर्शन करताना राजेंद्र निंबाळकर म्हणाले, देशाची एकता, अखंडता व सुरक्षितता राखण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. अशावेळी आपापसातील मतभेद व कलह देशाची सार्वभौमत्वता टिकविण्यासाठी मोठी अडचण ठरते. आपण सर्वांशी मैत्रीची भावना टिकविली पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या विकासासाठी हातभार लावण्याची आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन केले. राष्ट्रीय एकता दौडमध्ये शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, खेळाडू, शिक्षक, पोलिस तसेच शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून प्रारंभ होऊन त्रिमूर्ती चौक मार्गे- मुस्लीम लॉयब्ररी चौक- पोस्ट आॅफिस चौक यामार्गे शिवाजी क्रीडा संकुल येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी सुवर्णलता घोडेस्वार आणि संचालन क्रिडा अधिकारी अनिराम मरसकोल्हे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)