शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

आरक्षणाने मिळाला महिलेला सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:55 IST

प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या कर्तृत्वाने यशाची उंच शिखर गाठत आहेत. आरक्षणाने राजकारणात मोठ्या प्रमाणात महिला समोर येत आहेत.

ठळक मुद्दे६८ वर्षांची प्रतीक्षा संपली : प्रथम नागरिकाचा मान

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या कर्तृत्वाने यशाची उंच शिखर गाठत आहेत. आरक्षणाने राजकारणात मोठ्या प्रमाणात महिला समोर येत आहेत. तथापि, मोहगाव देवी येथे गावच्या राजकारणी धुरा सांभाळण्याचा सन्मान तब्बल ६८ वर्षानंतर महिलाच्या हाती आली आहे. असा ऐतिहासिक सन्मान सत्यफुला लेंडे यांना प्राप्त झाला आहे.पुरूष संस्कृतीच्या फेºयात महिलांचा घर अन् मुल याच वर्तृळात राहावे लागत होते. घराबाहेरचे विश्व महिलांना बघता येत नव्हते, तशी पुरूष संस्कृती मान्यताही देत नव्हती. गावखेड्यात तर पुरूष संस्कृतीने महिला बंदिस्तच होत्या. अलिकडच्या काळात मुली शिकायला बाहेर जावू लागल्या. उच्च शिक्षण घेवू लागल्या. विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करू लागल्या. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला तालुक्याला जावू लागल्या, लहान उद्योग करीतच त्या महिलांना राजकारण येण्यासाठी आरक्षणाचे बळ मिळाले.त्या मोहगावदेवीच्या विसाव्या तर पहिल्या महिला सरपंच बनण्याचा मान त्यांना मिळाला आहे. मोहगाव देवी येथील ग्रामपंचायतची स्थापना ५ आॅक्टोबर १९४९ रोजी झाली. त्या गावचे पहिले सरपंच तुळशिराम लांबट, गोपाळराव लांबट, पुन्हा तुळशिराम लांबट, बिजाराम लेंडे, रामकृष्ण खडके, मारोती बालपांडे, महादेव लेंडे, चांगो साखरवाडे, कुंडलिक लेंडे, अनिल काळे, दिनकर लांबट, कुडलिक लोंडे, अनिल काळे, ग्यानिराम साखरवाडे, दिनकर लांबट, अनिल काळे, पुंडलिक लेंडे, शालिक पंधरे प्रभारी, राजेश लेंडे यानंतर सत्यफुला लेंडे यांना ५ आॅक्टोबर १९४९ नंतर मोहगाव देवीच्या प्रथम नागरिक बनण्याचा सन्मान मिळाला. त्यांनी १२ नोव्हेंबर रोजी सरपंच पदाचा कार्यभार सांभाळला.मावळते सरपंच राजेश लेंडे हे सत्यफूला लेंडे यांचे पती होत. महिलांना स्वयंरोजगार, मग्रारोहयोचे गाव, सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. गावचा विकास हाच संकल्प असल्याचे सरपंच सत्यफूला लेंडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.