शहरं
Join us  
Trending Stories
1
Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
2
चीनमध्ये अरुणाचल प्रदेशातील महिलेसोबत असभ्य वर्तन, आता भारतानेही दिले सडेतोड प्रत्युत्तर
3
जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मोठा फेरबदल! लॅरी पेज दुसऱ्या क्रमांकावर; 'ही' व्यक्ती टॉप-१० मधून बाहेर!
4
Pakistan attack Afghanistan: पाकिस्तानी लष्कराचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला, लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू
5
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
6
"त्यांचं अचूक टायमिंग..", धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा 'इक्कीस'; सुहासिनी मुळेंनी सांगितली आठवण
7
Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला छोटी रक्कम जमा करा; ५ वर्षात बनेल १४ लाखांचा फंड
8
मोहम्मद पैगंबरांच्या केसासाठी १० लाखांचे दागिने गमावले, माहीममधील कुटुंबाची भामट्याकडून फसवणूक
9
मंथली एक्सपायरीवर शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी २६ हजारांच्या पार; IT Stocks मध्ये घसरण, मेटल शेअर्स वधारले
10
T20 World Cup 2026 Schedule : कधी अन् कुठं रंगणार IND vs PAK यांच्यातील सामना? मोठी माहिती आली समोर
11
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंचा भारत दौरा पुन्हा लांबणीवर! कारण काय? 
12
IND vs SA: गुवाहाटी कसोटीत भारताचा विजय अशक्य का? आतापर्यंत एकदाच गाठलाय ३००+ स्कोर!
13
धर्मेंद्र यांचे चाहते सनी-बॉबी देओलवर नाराज, म्हणाले- आयुष्यात त्यांचे सिनेमे पाहणार नाही !
14
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
15
'यमला पगला दीवाना' टायटल मीच धर्मेंद्र यांना दिलेलं..., सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा
16
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
17
बिग बॉस मराठी ६ लवकरच...! अखेर झाली घोषणा, कोण असणार होस्ट? प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
18
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
19
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
20
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची सोडवणूक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:25 IST

गत मार्च २०२० पासून देश पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने इतर कर्मचारी संघटना वगळता लिपिकवर्गीय जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने मागण्यांचे ...

गत मार्च २०२० पासून देश पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने इतर कर्मचारी संघटना वगळता लिपिकवर्गीय जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने मागण्यांचे पत्र देऊनही सभेकरिता पाचारण करण्यात आले नाही. लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे सन २०१५-२०१६ पासून गोपनीय अहवालाची दुय्यम प्रत संबंधित लिपिक कर्मचाऱ्यांना प्राप्त झाली नाही. कालबद्ध पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना लाभ मंजूर करणे, आश्वासित प्रगती योजनेचा पहिला, दुसरा व तिसरा लाभ मंजूर करण्याची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. निलंबन प्रकरणे नियमित करणे. पदभरतीवर बंदी असल्याने, तसेच पदोन्नतीची पदे भरण्याची प्रकिया प्रलंबित असल्याने अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मानसिकता बिघडून अनेक कर्मचारी निलंबनाचे बळी पडले आहेत. जे कर्मचारी तीन महिने वा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून निलंबित आहेत त्यांच्या प्रकरणाचा आढावा घेऊन सेवेत पुनर्स्थापित करण्यात यावे, नियत वयोमानाने सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विभागीय चौकशीचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यावी, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची गंभीरता लक्षात घेऊन संघटनेला चर्चेसाठी वेळ द्यावा, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. चर्चेदरम्यान संघटनेचे विभागीय अध्यक्ष केशरीलाल गायधने, कार्याध्यक्ष मनीष वाहाणे, जिल्हा परिषद युनियन अध्यक्ष महेश इखार, सचिव यशवंत दुणेदार, कोषाध्यक्ष विजय सार्वे, कार्यकारी सचिव सुधाकर चोपकर, मुख्यालय अध्यक्ष नीतेश गावंडे, मुख्यालय सचिव प्रमोद मानकर, कोषाध्यक्ष नितीन कनोजकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बॉक्स

सर्व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या दोन वर्षांपासून प्रलंबित

जिल्हा परिषदेत २५ ते ३० वर्षे सेवा करूनही कर्मचारी वर्गाच्या पदोन्नत्या होत नाही. त्यामुळे कर्मचारी वर्गाला नैराश्याची मानसिकता तयार होत आहे. बरेच कर्मचारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत सेवानिवृत्त पण होऊन गेलेत. परंतु, त्यांच्या पदोन्नत्या करण्यात प्रशासन कमी पडल्याची कर्मचारी वर्गात खंत व्यक्त होत आहे. कर्मचारी वर्गाकडून काम करण्याची अपेक्षा ठेवावी, पण त्यांचा जीवनमान सुधारण्याचा प्रशासन प्रयत्न करताना दिसून येत नाही. एकाच पदावर २५ वर्षे सेवा करताना पदोन्नत्या का करण्यात येत नाही, हा संशोधनाचा विषय आहे.