शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची सोडवणूक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:25 IST

गत मार्च २०२० पासून देश पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने इतर कर्मचारी संघटना वगळता लिपिकवर्गीय जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने मागण्यांचे ...

गत मार्च २०२० पासून देश पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने इतर कर्मचारी संघटना वगळता लिपिकवर्गीय जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने मागण्यांचे पत्र देऊनही सभेकरिता पाचारण करण्यात आले नाही. लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे सन २०१५-२०१६ पासून गोपनीय अहवालाची दुय्यम प्रत संबंधित लिपिक कर्मचाऱ्यांना प्राप्त झाली नाही. कालबद्ध पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना लाभ मंजूर करणे, आश्वासित प्रगती योजनेचा पहिला, दुसरा व तिसरा लाभ मंजूर करण्याची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. निलंबन प्रकरणे नियमित करणे. पदभरतीवर बंदी असल्याने, तसेच पदोन्नतीची पदे भरण्याची प्रकिया प्रलंबित असल्याने अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मानसिकता बिघडून अनेक कर्मचारी निलंबनाचे बळी पडले आहेत. जे कर्मचारी तीन महिने वा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून निलंबित आहेत त्यांच्या प्रकरणाचा आढावा घेऊन सेवेत पुनर्स्थापित करण्यात यावे, नियत वयोमानाने सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विभागीय चौकशीचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यावी, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची गंभीरता लक्षात घेऊन संघटनेला चर्चेसाठी वेळ द्यावा, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. चर्चेदरम्यान संघटनेचे विभागीय अध्यक्ष केशरीलाल गायधने, कार्याध्यक्ष मनीष वाहाणे, जिल्हा परिषद युनियन अध्यक्ष महेश इखार, सचिव यशवंत दुणेदार, कोषाध्यक्ष विजय सार्वे, कार्यकारी सचिव सुधाकर चोपकर, मुख्यालय अध्यक्ष नीतेश गावंडे, मुख्यालय सचिव प्रमोद मानकर, कोषाध्यक्ष नितीन कनोजकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बॉक्स

सर्व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या दोन वर्षांपासून प्रलंबित

जिल्हा परिषदेत २५ ते ३० वर्षे सेवा करूनही कर्मचारी वर्गाच्या पदोन्नत्या होत नाही. त्यामुळे कर्मचारी वर्गाला नैराश्याची मानसिकता तयार होत आहे. बरेच कर्मचारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत सेवानिवृत्त पण होऊन गेलेत. परंतु, त्यांच्या पदोन्नत्या करण्यात प्रशासन कमी पडल्याची कर्मचारी वर्गात खंत व्यक्त होत आहे. कर्मचारी वर्गाकडून काम करण्याची अपेक्षा ठेवावी, पण त्यांचा जीवनमान सुधारण्याचा प्रशासन प्रयत्न करताना दिसून येत नाही. एकाच पदावर २५ वर्षे सेवा करताना पदोन्नत्या का करण्यात येत नाही, हा संशोधनाचा विषय आहे.