शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

वसतिगृहांचे अनुदान रखडले

By admin | Updated: August 27, 2015 00:58 IST

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागांतर्गत जिल्ह्यात ६२ खासगी मागासवर्गीय वसतिगृह चालविले जातात.

चार वर्षांपासूनचा प्रकार : मुख्यमंत्र्यांचे आश्वासनही ठरले फोलभंडारा : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागांतर्गत जिल्ह्यात ६२ खासगी मागासवर्गीय वसतिगृह चालविले जातात. या वसतिगृहांना गत चार वर्षांपासून अनुदान मिळालेले नाही. परिणामी येथे कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन अडले आहे. प्रतिकूल परिस्थितीत वसतिगृह चालविताना संचालकांच्या नाकीनऊ आले आहे. वसतिगृह संचालकांनी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना याबाबत निवेदन दिले.त्यांना निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी आठवड्याभरात ही समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही अनुदान न मिळाल्याने हे आश्वासन फोल ठरले आहे. भंडारा जिल्ह्यातील खासगी मागासवर्गीय वसतीगृहात सुमारे ४ हजार विद्यार्थी वास्तव्यास आहेत. विद्यार्थ्यांमागे प्रत्येकी ९३० रुपये शासनातर्फे दिले जातात. यात १५ रुपयांत एका वेळच्या जेवणावर खर्च होतात. कार्यरत कर्मचाऱ्यांना पाच ते आठ हजार मानधन दिले जाते. अत्यंत बिकट स्थितीत खासगी वसतिगृहांचा कारभार सुरु आहे. त्यात भरीस भर म्हणून शासनाने अनुदान वाटप अनियमितता केली आहे. भाड्यापोटी मिळणारी रक्कम चार वर्षांपासून मिळाली नाही. काही वसतिगृहांचे अनुदान रखडले आहे. पाच महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहे. भाडे थकविल्यामुळे घरमालकांनी वसतिगृहाची इमारत खाली करण्यासाठी नोटीससुध्दा बजावली आहे. विरीत स्थितीत वसतिगृह चालविताना संचालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. समाजकल्याण विभागात चार महिन्यांपासून अनुदानाचे ३० लाख रुपये पडून आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी व समाजकल्याण अधिकारीसुध्दा याबाबत गंभीर नाहीत, असा आरोप वसतिगृह संचालक तथा कर्मचारी संघटनेने केली आहे. प्रलंबित अनुदानाचा प्रश्न मार्गी न लागल्यास वसतिगृह बंद ठेवून विद्यार्थ्यांसह साखळी उपोषण सुरु करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. (नगर प्रतिनिधी)