शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी १० टक्के बेड आरक्षित ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:38 IST

भंडारा : कोरोना आपत्कालीन परिस्थितीत अनेक सरकारी अधिकारी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावत ...

भंडारा : कोरोना आपत्कालीन परिस्थितीत अनेक सरकारी अधिकारी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावत आहेत. अशातच अनेक विभागांतील शासकीय, अधिकारी कर्मचारी यांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. मात्र अनेक दवाखान्यात फिरूनही बेड उपलब्ध होत नाही. पर्यायाने त्यांना उपचारासाठी जिल्हास्तरावर अथवा नागपूरला धावपळ करावी लागते. मात्र त्या ठिकाणीही बेड, ऑक्सिजन मिळवण्यासाठी कुटुंबीयांना मोठा संघर्ष करावा लागतो. अशातच अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटना टाळण्यासाठी कर्तव्य निभावणाऱ्या कृषी विभाग, महसूल, वनविभाग, पोलीस विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना कोविड रुग्णालयांमध्ये १० टक्के बेड आरक्षित ठेवावे, अशी मागणी जिल्ह्यातील शासकीय, अधिकारी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. याकडे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना संदर्भातील कर्तव्य निभावताना अनेक ठिकाणी लेखी आदेश न देता तोंडी कर्तव्याचे काही ठिकाणी सांगण्यात येत आहे. दुुर्दैवाने कोविड कर्तव्य बजावताना एखाद्या कर्मचार्‍याला जीव गमवावा लागला तर शासनाने जाहीर केलेली ५० लाख रुपयांची कोविड सुरक्षा विमा कवच रक्कम त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मिळणार नाही. त्यानंतर मदतीसाठी मोठा संघर्ष करावा लागतो. शासकीय कार्यालयाचे वारंवार उंबरठे झिजवूनही कुटुंबीयांना मदतीचा लाभ मिळत नाही, यासाठी कोविड कर्तव्य निभावणाऱ्या कर्मचाऱ्यांना लेखी आदेश देऊनच कर्तव्यावर पाठविण्यात यावे, अशीही मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. यापूर्वी कोरोना संकटात जीव धोक्यात घालून काम करताना जिल्ह्यातील ग्रामसेवक, कृषी कर्मचारी, रोजगारसेवक, पोलीस कर्मचारी यांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र त्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांना शासकीय मदतीसाठी मात्र अद्यापही प्रतीक्षा करावी लागत असल्याचे वास्तव आहे.

बॉक्स

सर्वाधिक मृत्यू कृषी कर्मचाऱ्यांचे

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्यापासून गेत वर्षभरापासून कृषी कर्मचारी आपले कर्तव्य निभावत आहेत. मात्र तरीदेखील कृषी कर्मचाऱ्यांना कोरोना लसीसाठी आजही प्रतीक्षाच करावी लागत आहे. एकीकडे शेतकऱ्यांना मार्गदर्शन, शासनाच्या विविध विभागांशी समन्वय ठेवून कर्तव्य निभावताना जिल्ह्यात आजपर्यंत ७ ते ८ कृषी कर्मचाऱ्यांना महिनाभरात आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. यामध्ये दोन कृषी पर्यवेक्षक, दोन कृषी सहायक तर एका वाहनचालकाचा, भंडारा तालुक्यातील एक अनुरेखक व तुमसर, मोहाडी तालुक्यातील एक कृषी पर्यवेक्षक, तर एका कृषी सहायकाचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वीच अवघ्या ३५ वर्षीय एका कृषी सहायकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मात्र तरी आजही सर्व कृषी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस मिळालेले नाही ही खऱ्या अर्थाने शोकांतिकाच म्हणावी लागेल.