शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी १० टक्के बेड आरक्षित ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:38 IST

भंडारा : कोरोना आपत्कालीन परिस्थितीत अनेक सरकारी अधिकारी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावत ...

भंडारा : कोरोना आपत्कालीन परिस्थितीत अनेक सरकारी अधिकारी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावत आहेत. अशातच अनेक विभागांतील शासकीय, अधिकारी कर्मचारी यांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. मात्र अनेक दवाखान्यात फिरूनही बेड उपलब्ध होत नाही. पर्यायाने त्यांना उपचारासाठी जिल्हास्तरावर अथवा नागपूरला धावपळ करावी लागते. मात्र त्या ठिकाणीही बेड, ऑक्सिजन मिळवण्यासाठी कुटुंबीयांना मोठा संघर्ष करावा लागतो. अशातच अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटना टाळण्यासाठी कर्तव्य निभावणाऱ्या कृषी विभाग, महसूल, वनविभाग, पोलीस विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना कोविड रुग्णालयांमध्ये १० टक्के बेड आरक्षित ठेवावे, अशी मागणी जिल्ह्यातील शासकीय, अधिकारी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. याकडे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना संदर्भातील कर्तव्य निभावताना अनेक ठिकाणी लेखी आदेश न देता तोंडी कर्तव्याचे काही ठिकाणी सांगण्यात येत आहे. दुुर्दैवाने कोविड कर्तव्य बजावताना एखाद्या कर्मचार्‍याला जीव गमवावा लागला तर शासनाने जाहीर केलेली ५० लाख रुपयांची कोविड सुरक्षा विमा कवच रक्कम त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मिळणार नाही. त्यानंतर मदतीसाठी मोठा संघर्ष करावा लागतो. शासकीय कार्यालयाचे वारंवार उंबरठे झिजवूनही कुटुंबीयांना मदतीचा लाभ मिळत नाही, यासाठी कोविड कर्तव्य निभावणाऱ्या कर्मचाऱ्यांना लेखी आदेश देऊनच कर्तव्यावर पाठविण्यात यावे, अशीही मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. यापूर्वी कोरोना संकटात जीव धोक्यात घालून काम करताना जिल्ह्यातील ग्रामसेवक, कृषी कर्मचारी, रोजगारसेवक, पोलीस कर्मचारी यांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र त्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांना शासकीय मदतीसाठी मात्र अद्यापही प्रतीक्षा करावी लागत असल्याचे वास्तव आहे.

बॉक्स

सर्वाधिक मृत्यू कृषी कर्मचाऱ्यांचे

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्यापासून गेत वर्षभरापासून कृषी कर्मचारी आपले कर्तव्य निभावत आहेत. मात्र तरीदेखील कृषी कर्मचाऱ्यांना कोरोना लसीसाठी आजही प्रतीक्षाच करावी लागत आहे. एकीकडे शेतकऱ्यांना मार्गदर्शन, शासनाच्या विविध विभागांशी समन्वय ठेवून कर्तव्य निभावताना जिल्ह्यात आजपर्यंत ७ ते ८ कृषी कर्मचाऱ्यांना महिनाभरात आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. यामध्ये दोन कृषी पर्यवेक्षक, दोन कृषी सहायक तर एका वाहनचालकाचा, भंडारा तालुक्यातील एक अनुरेखक व तुमसर, मोहाडी तालुक्यातील एक कृषी पर्यवेक्षक, तर एका कृषी सहायकाचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वीच अवघ्या ३५ वर्षीय एका कृषी सहायकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मात्र तरी आजही सर्व कृषी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस मिळालेले नाही ही खऱ्या अर्थाने शोकांतिकाच म्हणावी लागेल.