शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी १० टक्के बेड आरक्षित ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:38 IST

भंडारा : कोरोना आपत्कालीन परिस्थितीत अनेक सरकारी अधिकारी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावत ...

भंडारा : कोरोना आपत्कालीन परिस्थितीत अनेक सरकारी अधिकारी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावत आहेत. अशातच अनेक विभागांतील शासकीय, अधिकारी कर्मचारी यांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. मात्र अनेक दवाखान्यात फिरूनही बेड उपलब्ध होत नाही. पर्यायाने त्यांना उपचारासाठी जिल्हास्तरावर अथवा नागपूरला धावपळ करावी लागते. मात्र त्या ठिकाणीही बेड, ऑक्सिजन मिळवण्यासाठी कुटुंबीयांना मोठा संघर्ष करावा लागतो. अशातच अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटना टाळण्यासाठी कर्तव्य निभावणाऱ्या कृषी विभाग, महसूल, वनविभाग, पोलीस विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना कोविड रुग्णालयांमध्ये १० टक्के बेड आरक्षित ठेवावे, अशी मागणी जिल्ह्यातील शासकीय, अधिकारी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. याकडे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना संदर्भातील कर्तव्य निभावताना अनेक ठिकाणी लेखी आदेश न देता तोंडी कर्तव्याचे काही ठिकाणी सांगण्यात येत आहे. दुुर्दैवाने कोविड कर्तव्य बजावताना एखाद्या कर्मचार्‍याला जीव गमवावा लागला तर शासनाने जाहीर केलेली ५० लाख रुपयांची कोविड सुरक्षा विमा कवच रक्कम त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मिळणार नाही. त्यानंतर मदतीसाठी मोठा संघर्ष करावा लागतो. शासकीय कार्यालयाचे वारंवार उंबरठे झिजवूनही कुटुंबीयांना मदतीचा लाभ मिळत नाही, यासाठी कोविड कर्तव्य निभावणाऱ्या कर्मचाऱ्यांना लेखी आदेश देऊनच कर्तव्यावर पाठविण्यात यावे, अशीही मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. यापूर्वी कोरोना संकटात जीव धोक्यात घालून काम करताना जिल्ह्यातील ग्रामसेवक, कृषी कर्मचारी, रोजगारसेवक, पोलीस कर्मचारी यांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र त्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांना शासकीय मदतीसाठी मात्र अद्यापही प्रतीक्षा करावी लागत असल्याचे वास्तव आहे.

बॉक्स

सर्वाधिक मृत्यू कृषी कर्मचाऱ्यांचे

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्यापासून गेत वर्षभरापासून कृषी कर्मचारी आपले कर्तव्य निभावत आहेत. मात्र तरीदेखील कृषी कर्मचाऱ्यांना कोरोना लसीसाठी आजही प्रतीक्षाच करावी लागत आहे. एकीकडे शेतकऱ्यांना मार्गदर्शन, शासनाच्या विविध विभागांशी समन्वय ठेवून कर्तव्य निभावताना जिल्ह्यात आजपर्यंत ७ ते ८ कृषी कर्मचाऱ्यांना महिनाभरात आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. यामध्ये दोन कृषी पर्यवेक्षक, दोन कृषी सहायक तर एका वाहनचालकाचा, भंडारा तालुक्यातील एक अनुरेखक व तुमसर, मोहाडी तालुक्यातील एक कृषी पर्यवेक्षक, तर एका कृषी सहायकाचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वीच अवघ्या ३५ वर्षीय एका कृषी सहायकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मात्र तरी आजही सर्व कृषी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस मिळालेले नाही ही खऱ्या अर्थाने शोकांतिकाच म्हणावी लागेल.