शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

आरटीईच्या मुदतवाढीसाठी समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Updated: May 1, 2016 00:24 IST

शासनाने सन २०१६-१७ मध्ये या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षणाचा अधिकार कायदा अंतर्गत भंडारा जिल्ह्यात पहिल्या वर्गासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु केलेली आहे.

विद्यार्थी प्रवेशापासून वंचित : ३४८ प्रवेशस्थान रिक्तभंडारा : शासनाने सन २०१६-१७ मध्ये या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षणाचा अधिकार कायदा अंतर्गत भंडारा जिल्ह्यात पहिल्या वर्गासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु केलेली आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे गरीब व होतकरू मुले २५ टक्के प्रवेशापासून मुकणार की काय? अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय ३० एप्रिल तारीख जिल्हा परिषद भंडाराने प्रवेशासाठी घोषित केली आहे. त्या अंतर्गत शिक्षणाचा अधिकार (आर.टी.ई.) च्या मुदतवाढीसाठी आर.टी.ई. अ‍ॅक्शन समितीने निवेदन देत ही समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यातील ७९ विना अनुदानीत शासकीय मान्यताप्राप्त अशासकीय शाळेत पहिल्या वर्गासाठी ५३८ प्रवेशस्थान आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातून ६२० अर्ज आॅनलाईन भरण्यात आले आहेत. त्यापैकी अचूक १९० प्रवेश अर्ज मान्य झालेले आहेत. त्या अंतर्गत सद्यस्थितीत पहिल्या वर्गासाठी ३४८ प्रवेशस्थान रिक्त आहेत. मंगळवारपासून तलाठ्यांच्या बेमुदत संपामुळे पालकवर्ग आर.टी.ई. प्रवेशासाठी आवश्यक असलेले उत्पन्नाचा दाखला बनवू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आॅनलाईन प्रवेशाची अंतिम मुदत १५ दिवसांनी वाढविण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रवेशाची अंतिम मुदतवाढ नागपूर जिल्ह्यात करण्यात आली आहे. आर.टी.ई. अधिनियम अंतर्गत पहिल्या वर्गासाठी प्रवेश वय कमीत कमी पाच वर्ष आहे. परंतु जिल्ह्यातील शाळा साडेपाच ते साडेसहा वर्षांच्या मुलांनाच प्रवेश देत आहेत. त्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. भंडारा शहरातील काही शाळांमध्ये ही तफावत खुलेआम दिसून येत आहे. जिल्ह्यात प्रथम वर्गासाठी प्रवेश ५ ते ७ वर्षाच्या वयोगटातील मुलामुलींना देण्यात यावे अशी मागणी आहे. आर.टी. अधिनियम अंतर्गत पूर्व प्राथमिक म्हणजे नर्सरी व के.जी. साठी भंडारा जिल्हा सोडून सर्व जिल्ह्यामध्ये प्रवेश देण्यात येत आहे व या अधिनियमाचा जिल्ह्यात सर्रासपणे उल्लंघन सुरु आहे. हा प्रकार थांबवून नर्सरी व केजी मध्ये प्रवेश देण्यात यावा आणि ज्या शाळा या प्रवेशाला नाकारत आहेत त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समितीचे जिल्हा समन्वयक वकील सिद्धीकी यांनी केली आहे. या आशयाचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी आदींना देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)