शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी शाळांच्या समस्या निकाली काढा

By admin | Updated: May 27, 2016 00:57 IST

खाजगी शैक्षणिक संस्थांच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमध्ये संच मान्यता ..

संस्था संचालकांची मागणी : शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनभंडारा : खाजगी शैक्षणिक संस्थांच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमध्ये संच मान्यता देताना मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून, त्यामुळे या शाळांमध्ये निर्माण झालेल्या समस्या निकाली काढण्यात याव्या, अशी मागणी भंडारा जिल्हा शैक्षणिक संस्था संचालक महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संस्था संचालकांनी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक के.झेड. शेंडे यांची भेट घेत बुधवार २५ मे रोजी निवेदन सादर केले.मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यातील शाळांना संच मान्यता प्रदान करण्यात आली, परंतु माध्यमिक शाळांना संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील तुकड्या तसेच विद्यार्थी संख्या ग्राह्य धरण्यात आली नाही. त्यामुळे या शाळांमधील पर्यवेक्षकांची पदे कमी झालीत. हा प्रकार नियमबाह्य असून, खाजगी शाळांमधील पर्यवेक्षकांची पदे पूर्ववत करण्यात यावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.खाजगी शाळांमध्ये शिक्षकांची पदे मंजूर करताना वर्ग ५ ते ८ मधील विद्यार्थी संख्या गृहित धरण्यात आली. मात्र नवीन नियमानुसार वर्ग ९ ते १० मिळून माध्यमिक शाळा गृहित धरली पाहिजे. शिक्षकांची पदे मंजूर करताना वर्ग ५ ते ८ आणि वर्ग ९ ते १० असे दोन घटक वेगळे करण्यात आले. शासन स्तरावर काढण्यात आलेल्या आदेशात वर्ग ९ ते १० ची वेगळी विद्यार्थी संख्या गृहित धरून शिक्षकांची पदे मंजूर करावी, असा कुठेही उल्लेख नाही. माध्यमिक शाळांसंदर्भात वर्ग ५ ते १० पर्यंतची विद्यार्थी संख्या गृहित धरल्यास शिक्षकांची पदे अतिरिक्त होणार नाहीत. परिणामी, याबाबत सुधारणा करण्याची मागणी संचालकांनी केली आहे.शाळांच्या संच मान्यतेबाबत शासनाच्या वतीने २८ आॅगस्ट २०१५ रोजी काढण्यात आलेल्या आदेशाविरोधात राज्यातील शिक्षक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात न्यायालयाने शासनाला नोटीसही बजावली आहे. त्यामुळे संच मान्यतेची अंमलबजावणी केली जावू नये.शिक्षणाचा अधिकार आरटीई कायद्यान्वये प्राथमिक शाळांना वर्ग ५ आणि माध्यमिक शाळांना वर्ग ८ जोडण्यासंदर्भात जि.प. च्या प्राथमिक शिक्षण विभागाने १२ एप्रिल रोजी पत्र काढले. त्यात वर्ग ५ करिता १ कि़मी. आणि वर्ग ८ करिता ३ कि़मी.ची अट घालण्यात आली. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जि.प. व नगरपरिषद शाळांना असे वर्ग जोडण्यासंदर्भात किमीची अर्थात अंतराची अट घालण्यात आली नाही. हा प्रकार आरटीई अ‍ॅक्टच्या विरोधात असून, खाजगी संस्था तसेच स्थानिक स्वराज्य संस्था या दोघांकरिता सारख्याच अटी असाव्या, अशी मागणी संचालकांनी केली आहे.अध्यादेशानुसार, पालकांनी त्यांच्या पाल्यांचा शाळा सोडण्याचा दाखला टीसी मागितल्यास तो त्यांना देण्यासंदर्भात आदेश जारी करावे, शाळांना २००८ च्या निकषावर ६५ टक्के वेतनेतर अनुदान देण्यात येते. २००८ चे निकष वगळून २०१५-१६ च्या अंकेक्षण निकषावर शाळांना पुढील वर्षापासून वेतनेतर अनुदान देण्यात यावे. शाळांना दर प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावयाचे असल्यास, नवीन प्रमाणपत्र घ्यावयाचे असल्यास किंवा द्यायचे असेल तर भाड्यापोटी मिळणारी १ टक्के रक्कम कार्यालयात भरण्याचे सांगण्यात येते. मात्र १ टक्के रक्कम देण्याचा कोणताच नियम नसून, सदर रक्कम घेण्यात येवू नये, असे आदेश काढण्यात यावे. २०१५-१६ चे संच मान्यता निकष शाळांना देण्यात आले असले तरी त्या आदेशावर कोणत्याच अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसल्याने हे निकष ग्राह्य धरावे की नाही, याबाबत संभ्रम असून अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनिशी हे निकष पाठविण्यात यावे.माध्यमिक शाळांमधील वर्ग तुकड्या आणि विद्यार्थी संख्या लक्षात घेवूनच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या निर्धारित केली जाते. परंतु, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संच मान्यतेमध्ये नोंद नाही. ती नोंद संच मान्यतेमध्े करण्यात यावी, अशा अनेक मागण्या संस्थत्त संचालकांनी केल्या आहेत. शिक्षणाधिकारी शेंडे यांना िनवेदन देताना शिष्टमंडळात भंडारा जिल्हा शैक्षणिक संस्था संचालक महामंडळाचे अध्यक्ष कैलास नशिने, सचिव भाऊ गोस्वामी, माजी आमदार अ‍ॅड. आनंदराव वंजारी, प्रमोद कान्हेकर यांच्यासह सभासद संचालकांचा समावेश होता. (प्रतिनिधी)