शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

वैयक्तिक स्वच्छता ठेवून आजाराला दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 10:28 PM

प्रत्येक कुटूंब निरोगी जीवन जगायला हवे. कुटुूंबातील बालकांपासून तर ज्येष्ठांपर्यंतचे आरोग्य सुदृढ असायला हवे. तरच कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावला जाऊ शकतो. याकरिता प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता पाळून आजाराला हद्दपार करायला हवे,.......

ठळक मुद्देरमेश डोंगरे यांचे प्रतिपादन : सोनी येथे आरोग्य शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रत्येक कुटूंब निरोगी जीवन जगायला हवे. कुटुूंबातील बालकांपासून तर ज्येष्ठांपर्यंतचे आरोग्य सुदृढ असायला हवे. तरच कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावला जाऊ शकतो. याकरिता प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता पाळून आजाराला हद्दपार करायला हवे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केले. लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे आयुर्वेदिक दवाखान्यात पार पडलेल्या आरोग्य शिबिराप्रसंगी ते बोलत होते. तालुका आरोग्य विभागाचे वतीने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांची तर उदघाटक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, पंचायत समिती सभापती मंगलाताई बगमारे, गट विकास अधिकारी देविदास देवरे, पंचायत समिती सदस्य श्री ठाकरे, सरपचं सौ. कल्पना खंडाते, उपसरपंच हरीचंद्र धोटे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अविनाश कुथे, डॉ. निखील डोकरीमारे,डॉ. अनुजा बागडे, डॉ.जया थोटे, डॉ. मुंडले,नेत्र चिकित्सक श्री डूंबरे, तालुका वैदयकीय अधिकारी श्री संजीव नैतामे यांची उपस्थिती होती.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री रमेश डोंगरे म्हणाले, व्यसनमुक्त समाज ही काळाची गरज आहे. त्याकरिता लोकांनी स्वत: व्यसनापासून दूर राहावे. जेणेकरून मोठमोठया बिमारीपासून आपल्या शरीराला कुटूंबांना वाचविता येईल. आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करता येईल.व्यसनमुक्त समाजासोबतच हागणदारीमुक्त कुटुंब ही आवश्यक आहे. याकरिता स्वच्छतेला प्राधान्य दयायला पाहिजे.प्रत्येकाच्या अंगात स्वच्छता भिनली पाहिजे. आपला घर, परिसर व गाव स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. घर, परिसर व गावात स्वच्छता निर्माण झाली तर रोगराईपासून आपली सुटका होईल. आपल्या कुटुंंबाला चांगले जीवन जगता येईल, असे सांगितले.प्रत्येक गाव हागणदारीमुक्त झालेला आहे. कुटूंबांनी शौचालयाचे बांधकाम करून त्याचा वापर सुरू केलेला आहे. परंतु अशंत: काही ठिकाणी उघडयावर शौचालयाला जाण्याचे प्रमाण आहे. सदर चित्र बदलविण्यासाठी प्रत्येक कुटूंबांनी शौचालयाचा वापर करून आपल्या गावातून रोगराईला आळा घाला असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी केले.सोनी येथे आयोजित आरोग्य शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, गाव स्वच्छ आणि पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज आहे. याकरिता लोकसहभाग महत्वाचे आहे. हागणदारीमुक्त गावातील प्रत्येकांनी शौचालयाचा वापर करणे गरजेचे आहे. शौचालयाच्या वापरामुळे आपल्या कुटूंबांची सुरक्षा ठेवता येणार आहे. स्वच्छतेमुळेच आपल्या कुटूंबांला निरोगी आयूष्य जगता येणार आहे. त्यामुळे स्वच्छतेसाठी प्रत्येकांनी प्राधान्य दयायला हवा.सोबतच पर्यावरणाचे रक्षणासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. समाजाला व्यसनाधिनतेपासून दूर न्यायचे असे तर गावात दारूबंदी आवश्यक आहे. त्याकरिता महिलांनी पुढाकार घ्यावा. गावात ग्रामरक्षा दल स्थापन करून गावाची सुरक्षा करावी असे सांगितले.आठशे रूग्णांवर झाले विविध उपचारजिल्हा परिषदेचे अध्यक्ष डोंगरे यांचे पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या लाखांदूर तालुक्यातील सोनी येथील भव्य आरोग्य शिबिरात सुमारे आठशे रूग्णांवर उपचार करण्यात आले. यामध्ये सोनी, इंदूरा, चपराळ व अन्य गावातील रूग्णांचा समावेश आहे. अस्थिरोग तज्ञ डॉ. निखील डोकरीमारे, स्त्रिरोग तज्ञ डॉ. अनुजा बागडे, बालरोग तज्ञ डॉ.जया थोटे, दंतरोग चिकित्सक डॉ. मुंडले, नेत्र चिकित्सक श्री डूंबरे, तालुका वैदयकीय अधिकारी श्री संजीव नैतामे, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ. मेश्राम, डॉ. वानखेडे, व अन्य वैदयकीय अधिकारी, सर्व आरोग्य सेवक, सेविका यांच्या चमूने बिपी, शुगर, एचआयव्ही, मुखरोग, गरोदर मातांची तपासणी, दंत चिकित्सा, नेत्ररोग तपासणी, अस्थीरोग तपासणी व लहान बालकांची तपासणी करून सुमारे आठशे रूग्णांवर उपचार करण्यात आले. ग्रामस्तरावर आरोग्य सेवेला बळकट करण्यासाठी या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वैदयकीय चमूने सहकार्य केले.