शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वैयक्तिक स्वच्छता ठेवून आजाराला दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 22:28 IST

प्रत्येक कुटूंब निरोगी जीवन जगायला हवे. कुटुूंबातील बालकांपासून तर ज्येष्ठांपर्यंतचे आरोग्य सुदृढ असायला हवे. तरच कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावला जाऊ शकतो. याकरिता प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता पाळून आजाराला हद्दपार करायला हवे,.......

ठळक मुद्देरमेश डोंगरे यांचे प्रतिपादन : सोनी येथे आरोग्य शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रत्येक कुटूंब निरोगी जीवन जगायला हवे. कुटुूंबातील बालकांपासून तर ज्येष्ठांपर्यंतचे आरोग्य सुदृढ असायला हवे. तरच कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावला जाऊ शकतो. याकरिता प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता पाळून आजाराला हद्दपार करायला हवे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केले. लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे आयुर्वेदिक दवाखान्यात पार पडलेल्या आरोग्य शिबिराप्रसंगी ते बोलत होते. तालुका आरोग्य विभागाचे वतीने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांची तर उदघाटक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, पंचायत समिती सभापती मंगलाताई बगमारे, गट विकास अधिकारी देविदास देवरे, पंचायत समिती सदस्य श्री ठाकरे, सरपचं सौ. कल्पना खंडाते, उपसरपंच हरीचंद्र धोटे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अविनाश कुथे, डॉ. निखील डोकरीमारे,डॉ. अनुजा बागडे, डॉ.जया थोटे, डॉ. मुंडले,नेत्र चिकित्सक श्री डूंबरे, तालुका वैदयकीय अधिकारी श्री संजीव नैतामे यांची उपस्थिती होती.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री रमेश डोंगरे म्हणाले, व्यसनमुक्त समाज ही काळाची गरज आहे. त्याकरिता लोकांनी स्वत: व्यसनापासून दूर राहावे. जेणेकरून मोठमोठया बिमारीपासून आपल्या शरीराला कुटूंबांना वाचविता येईल. आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करता येईल.व्यसनमुक्त समाजासोबतच हागणदारीमुक्त कुटुंब ही आवश्यक आहे. याकरिता स्वच्छतेला प्राधान्य दयायला पाहिजे.प्रत्येकाच्या अंगात स्वच्छता भिनली पाहिजे. आपला घर, परिसर व गाव स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. घर, परिसर व गावात स्वच्छता निर्माण झाली तर रोगराईपासून आपली सुटका होईल. आपल्या कुटुंंबाला चांगले जीवन जगता येईल, असे सांगितले.प्रत्येक गाव हागणदारीमुक्त झालेला आहे. कुटूंबांनी शौचालयाचे बांधकाम करून त्याचा वापर सुरू केलेला आहे. परंतु अशंत: काही ठिकाणी उघडयावर शौचालयाला जाण्याचे प्रमाण आहे. सदर चित्र बदलविण्यासाठी प्रत्येक कुटूंबांनी शौचालयाचा वापर करून आपल्या गावातून रोगराईला आळा घाला असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी केले.सोनी येथे आयोजित आरोग्य शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, गाव स्वच्छ आणि पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज आहे. याकरिता लोकसहभाग महत्वाचे आहे. हागणदारीमुक्त गावातील प्रत्येकांनी शौचालयाचा वापर करणे गरजेचे आहे. शौचालयाच्या वापरामुळे आपल्या कुटूंबांची सुरक्षा ठेवता येणार आहे. स्वच्छतेमुळेच आपल्या कुटूंबांला निरोगी आयूष्य जगता येणार आहे. त्यामुळे स्वच्छतेसाठी प्रत्येकांनी प्राधान्य दयायला हवा.सोबतच पर्यावरणाचे रक्षणासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. समाजाला व्यसनाधिनतेपासून दूर न्यायचे असे तर गावात दारूबंदी आवश्यक आहे. त्याकरिता महिलांनी पुढाकार घ्यावा. गावात ग्रामरक्षा दल स्थापन करून गावाची सुरक्षा करावी असे सांगितले.आठशे रूग्णांवर झाले विविध उपचारजिल्हा परिषदेचे अध्यक्ष डोंगरे यांचे पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या लाखांदूर तालुक्यातील सोनी येथील भव्य आरोग्य शिबिरात सुमारे आठशे रूग्णांवर उपचार करण्यात आले. यामध्ये सोनी, इंदूरा, चपराळ व अन्य गावातील रूग्णांचा समावेश आहे. अस्थिरोग तज्ञ डॉ. निखील डोकरीमारे, स्त्रिरोग तज्ञ डॉ. अनुजा बागडे, बालरोग तज्ञ डॉ.जया थोटे, दंतरोग चिकित्सक डॉ. मुंडले, नेत्र चिकित्सक श्री डूंबरे, तालुका वैदयकीय अधिकारी श्री संजीव नैतामे, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ. मेश्राम, डॉ. वानखेडे, व अन्य वैदयकीय अधिकारी, सर्व आरोग्य सेवक, सेविका यांच्या चमूने बिपी, शुगर, एचआयव्ही, मुखरोग, गरोदर मातांची तपासणी, दंत चिकित्सा, नेत्ररोग तपासणी, अस्थीरोग तपासणी व लहान बालकांची तपासणी करून सुमारे आठशे रूग्णांवर उपचार करण्यात आले. ग्रामस्तरावर आरोग्य सेवेला बळकट करण्यासाठी या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वैदयकीय चमूने सहकार्य केले.