शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

धानपिकासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 23:55 IST

धानपिकाला पाण्याची नितांत गरज असून, पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी भंडारा विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाला दिला इशारा : माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धानपिकाला पाण्याची नितांत गरज असून, पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी भंडारा विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे.जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असून पावसाच्या लहरीपणामुळे सुरुवातीपासूनच रोवणीला विलंब झाला. अपुºया व अवेळी आलेल्या पावसामुळे सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत रोवणी सुरू होती, सध्यास्थितीत धानपिकाला पाण्याची अतिशय गरज असली तरी मागील काही दिवसापासून पाऊस पडला नसल्याने धानपिक वाळण्याच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्णावस्थेत असल्याने त्या प्रकल्पाचे पाणी शेतीला मिळत नाही.नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पाचे पाणी भंडारा व मोहाडी या दोन तालुक्यात येते. भंडारा तालुक्यातील शहापूर, खरबी, ठाणा, खात, वरठी, खोकरला, टवेपार, भोजापूर, गोपीवाडा खरबी, बेला, अशा ३७ गावातील शेतीला पेंच प्रकल्पाचे पाणी दिले जाते. परंतु धानपिकाला पाण्याची गरज असतांनाही पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले नाही. पेंच विभाग नागपूरकडे मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे.पेंच पाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यात असलेले कार्यालय बंद करून नागपूर जिल्ह्यात स्थानांतरित करण्यात आले, त्यामुळे शेतकºयांची अडचण झाली आहे. याकडे भंडारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असून शेतकºयांच्या समस्यांप्रती ते उदासीन असल्याचा आरोप नरेंद्र भोंडेकर यांनी केला आहे.निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी कर्जबाजारी होत असून नापिकीमुळे शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहे. त्यातच पाटबंधारे विभाग शेतकºयांना अडचणीत आणत आहे. अशास्थितीत शतकºयांचे हित लक्षात घेऊन धान पिकाला जीवनदान देण्यासाठी पेंच प्रकल्प अधिकाºयांनी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडावे, अशी मागणी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे.पेंच प्रकल्पाचे पाणी लवकरात लवकर सोडले नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही यावेळी नरेंद्र भोंडेकर यांनी पेंच प्रकल्प प्रशासन व जिल्हा प्रशासनाला दिला आहे .