शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

सुरबोडी गावाचे पुनर्वसन करा, अन्यथा घेऊ जलसमाधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 14:25 IST

ग्रामस्थ तटस्थ भूमिकेत : महसूल व पोलिस प्रशासन झाले अलर्ट

विशाल रणदिवे लोकमत न्यूज नेटवर्क अड्याळ : सुरबोडी गावाचे पुनर्वसन गत १३ वर्षांपासून रखडले आहेत. गावाचे पुनवर्सन करा, अन्यथा आम्ही ग्रामस्थ १९ डिसेंबरला जलसमाधी घेऊ, असा ठणठणीत इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांच्या या निर्णयानंतर महसूल व पोलिस प्रशासन अलर्ट झाल्याचेही दिसून येत आहे.

माहितीनुसार, २०११ ते २०२४ पर्यंत या तेरा वर्षांत सुरबोडी या गावाचे पुनवर्सन झाले नाही. पुनवर्सनासाठी ग्रामस्थांनी शासन-प्रशासनाचे अनेकदा दार ठोठावले. लोकप्रतिनिधी यांनाही गावातील समस्यांविषयी लिखित निवेदन दिले. मात्र, एवढे करूनही येथील ग्रामस्थ आपल्याच हक्काच्या घरात, गावात भीतीच्या वातावरणात जगत आहेत. 

गावाचे पुनर्वसन होत नसल्याने, गावात राहूनसुद्धा त्रास, भीती नित्यनेमाची होत असल्याने वैतागून गुरुवारी, १९ डिसेंबरला गोसेखुर्द जलाशयात जलसमाधी घेण्याचे ग्रामस्थांनी ठरविले आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, आ. नरेंद्र भोंडेकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा, पुनर्वसन विभाग भंडारा, पोलिस स्टेशन अड्याळ, तहसीलदार आदींना दिले आहे. 

विशेष बाब म्हणजे, आता जे काही आंदोलन सुरू होत आहे ते चिघळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. हिंस्त्र प्राण्यांचा हल्ल्यात गावातील अनेक जनावरांचा नाहक जीव गेला. कधी दूषित पाणी पिण्याची वेळ संपूर्ण ग्रामस्थांवर येते आहे. ग्रामस्थांसोबतच आदिवासी समाजातील समाज बांधवांच्या संपूर्ण शेतजमिनी अधिग्रहित झाले. पर्यायी शेतजमीन मिळाली नसल्याने ग्रामस्थांना रोजगारासाठी भटकावे लागत आहे. 

गावातील बरीच कुटुंबातील मंडळी उदरनिर्वाह करता गावाच्या बाहेर स्थलांतरित झाली आहेत. गावात वर्ग चौथीपर्यंतचे शिक्षण होत असून, उर्वरित शिक्षणाकरिता गावाच्या बाहेर गेल्याशिवाय विद्यार्थ्यांना पर्याय नाही. उपचाराकरिता गावात कुठलीही सुविधा नसून बाहेर गेल्याशिवाय काहीही पर्याय नाही. नवीन सौंदळ, खापरी पुनर्वसनात तलाठी साजा क्रमांक सहा मंडळ चिचाळ नवेगाव पाले येथे ४.१७ हेक्टर आर पडत जमीन शासकीय मालकीची असून, सुरबोडीच्या पुनर्वसनाकरिता वापर करता येऊ शकते, अशीही लेखी माहिती यावेळी ग्रामस्थांनी दिली. गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत सुरबोडी गावठाणाचा खास बाब म्हणून पुनर्वसन करण्यास्तव प्रस्ताव निर्माण होतो. त्याचा उपयोग मात्र आजपावेतो झाला नसल्याने शेवटी ग्रामस्थांनी जलसमाधी घेण्याचे ठरविले आहे.

विषारी श्वापदांचा धोका कायम गावाच्या तीनही बाजूला गोसेखुर्द धरण जलाशय असल्याने विषारी श्वापदांचा धोका कायम आहे. ग्रामस्थांवर हल्ला करून ठार करू शकतात. जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पुरावा देत गावाला पुनर्वसनाची गरज कशामुळे आहे, याचेही लेखी पत्र दिले होते. . त्यात सुरबोडी हे गाव सौंदळ खापरी गट ग्रामपंचायत येथे समाविष्ट आहे. सौंदळ व खापरी या गावाचे पुनर्वसन झालेला आहे. गावातील मुख्य विहिरीला दूषित पाणीपुरवठा होणे. घरांना ओलावा निर्माण होणे. या ओलाव्यामुळे आजपर्यंत अनेकांची घरी कोसळलेली आहेत.

टॅग्स :bhandara-acभंडारा