शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

शेतीला हवा नियमित वीजपुरवठा

By admin | Updated: August 14, 2015 00:04 IST

खरीपाचं हंगाम सुरू झाला की, अघोषित भारनियमन सुरू होत असते. सद्या पाऊस दगा देत आहे.

मोहाडी : खरीपाचं हंगाम सुरू झाला की, अघोषित भारनियमन सुरू होत असते. सद्या पाऊस दगा देत आहे. धानाची रोवणी खोळंबली आहे. सिंचनाची व्यवस्था असणाऱ्यांना शेतकऱ्यांची धान रोवणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आता प्रश्न आहे विज जाण्याचा. विज कधी जाईल याचे वेळापत्रक नाही. दिवसातून दहा वेळा विजेचा लपंडाव सुरू राहत असल्याने रोवणीसाठी सिंचन कसा करावा हा प्रश्न उभा राहतो. विद्युत विभागाने पावसाळ्यात शेतकऱ्यांचीच जास्त जिरवायची ठरवलं आहे. ज्या खरीप हंगामात नियमित थ्री फेज वीज हवी तेव्हाच वीज दगा देण्याचा प्रकार दरवर्षीचाच आहे. वरचाही कोपतो अन् वीजही शेतकऱ्यांवर मेहरबान होत नाही. एका पावसामुळे, एका पाण्यामुळे, वीज नसल्याने खरीप पिकांना कुठेना कुठे दगा बसतो. ही बाब नित्याची झाली आहे. शेतकऱ्यांच्या अंगवळणी पडली आहे. कधी पेटून उठणारा शेतकरी राज्यकर्त्यांच्या बनेल ते करा या पायी खचून गेला आहे. खरीप पिकांच नुकसान दरवर्षीच होत असतो. त्याची कारणे वेगवेगळी आहेत. पण, त्यातला प्रमुख कारण विजेचा साथ शेतकऱ्यांच्या साथीला नसतो. विज राहत नाही म्हणून शेतकरी कर्जात राहून डिझेल एजंसीच्या सहायाने आपल्या धान पिकांना वाचविण्याची जीवघेणी कसरत करतो. धानपिक आले तरी उत्पादन खर्चानुसार भाव मिळत नाही. ही समस्या मुळ आहे. उन्हाळी धान लावणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा तिच आहे. उन्हाळी भातपिक काढण्यासाठी विजेचा त्रास सहन करीत कसातरी घरी धान येते. मात्र आधारभूत केंद्रात पाठविलेला धान खरेदी होत नाही. डोंगरगाव आधारभूत केंद्रावर शेतकऱ्यांचे उन्हाळी धान काही खरेदी केले नाही. दीड महिन्यापासून धान पाण्यात भीजत आहेत. टोकन दिले गेले पण धान खरेदी नाही ही व्यथा शेतकऱ्यांची राज्यकर्त्यांनी निर्माण केली आहे.विजेचे वाढलेले दर अन् शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन करण्यासाठी न मिळणारी सवलत हे दु:ख शेतकरी पचवित आहेत. उन्हाळ्यातही उन्हाळी पिक घेवू देत नाही अन् पावसाळ्यातही साथ न देणारी विज समस्या शेतकऱ्यांच्या अंगभर झाली आहे. त्यामुळे कर्जात मरणारा शेतकरी अतिशय व्यथीत आहे. हरदोली / झं. येथील शेतकऱ्यांने कर्जापायी विहरीत उडी घेवून दोन दिवसापुर्वी आत्महत्या केली. कर्जाची रेघ शेतकऱ्यांच्या कपाळावरून मिटत नाही तरी शासन शेतकऱ्यांसाठी योग्य ते करीत नाहीच ही भावना तयार झाली आहे. शेतकऱ्यांना खरीप पिक घेण्यासाठी सिंचन व्हावे यासाठी विजेची सवलत मिळावी किंबहूना शेतकऱ्यांना मोफत विज दिली जावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)