शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतीला हवा नियमित वीजपुरवठा

By admin | Updated: August 14, 2015 00:04 IST

खरीपाचं हंगाम सुरू झाला की, अघोषित भारनियमन सुरू होत असते. सद्या पाऊस दगा देत आहे.

मोहाडी : खरीपाचं हंगाम सुरू झाला की, अघोषित भारनियमन सुरू होत असते. सद्या पाऊस दगा देत आहे. धानाची रोवणी खोळंबली आहे. सिंचनाची व्यवस्था असणाऱ्यांना शेतकऱ्यांची धान रोवणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आता प्रश्न आहे विज जाण्याचा. विज कधी जाईल याचे वेळापत्रक नाही. दिवसातून दहा वेळा विजेचा लपंडाव सुरू राहत असल्याने रोवणीसाठी सिंचन कसा करावा हा प्रश्न उभा राहतो. विद्युत विभागाने पावसाळ्यात शेतकऱ्यांचीच जास्त जिरवायची ठरवलं आहे. ज्या खरीप हंगामात नियमित थ्री फेज वीज हवी तेव्हाच वीज दगा देण्याचा प्रकार दरवर्षीचाच आहे. वरचाही कोपतो अन् वीजही शेतकऱ्यांवर मेहरबान होत नाही. एका पावसामुळे, एका पाण्यामुळे, वीज नसल्याने खरीप पिकांना कुठेना कुठे दगा बसतो. ही बाब नित्याची झाली आहे. शेतकऱ्यांच्या अंगवळणी पडली आहे. कधी पेटून उठणारा शेतकरी राज्यकर्त्यांच्या बनेल ते करा या पायी खचून गेला आहे. खरीप पिकांच नुकसान दरवर्षीच होत असतो. त्याची कारणे वेगवेगळी आहेत. पण, त्यातला प्रमुख कारण विजेचा साथ शेतकऱ्यांच्या साथीला नसतो. विज राहत नाही म्हणून शेतकरी कर्जात राहून डिझेल एजंसीच्या सहायाने आपल्या धान पिकांना वाचविण्याची जीवघेणी कसरत करतो. धानपिक आले तरी उत्पादन खर्चानुसार भाव मिळत नाही. ही समस्या मुळ आहे. उन्हाळी धान लावणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा तिच आहे. उन्हाळी भातपिक काढण्यासाठी विजेचा त्रास सहन करीत कसातरी घरी धान येते. मात्र आधारभूत केंद्रात पाठविलेला धान खरेदी होत नाही. डोंगरगाव आधारभूत केंद्रावर शेतकऱ्यांचे उन्हाळी धान काही खरेदी केले नाही. दीड महिन्यापासून धान पाण्यात भीजत आहेत. टोकन दिले गेले पण धान खरेदी नाही ही व्यथा शेतकऱ्यांची राज्यकर्त्यांनी निर्माण केली आहे.विजेचे वाढलेले दर अन् शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन करण्यासाठी न मिळणारी सवलत हे दु:ख शेतकरी पचवित आहेत. उन्हाळ्यातही उन्हाळी पिक घेवू देत नाही अन् पावसाळ्यातही साथ न देणारी विज समस्या शेतकऱ्यांच्या अंगभर झाली आहे. त्यामुळे कर्जात मरणारा शेतकरी अतिशय व्यथीत आहे. हरदोली / झं. येथील शेतकऱ्यांने कर्जापायी विहरीत उडी घेवून दोन दिवसापुर्वी आत्महत्या केली. कर्जाची रेघ शेतकऱ्यांच्या कपाळावरून मिटत नाही तरी शासन शेतकऱ्यांसाठी योग्य ते करीत नाहीच ही भावना तयार झाली आहे. शेतकऱ्यांना खरीप पिक घेण्यासाठी सिंचन व्हावे यासाठी विजेची सवलत मिळावी किंबहूना शेतकऱ्यांना मोफत विज दिली जावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)