शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बाहेरुन आलेल्या २१५४ व्यक्तींची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

भंडारा जिल्ह्यातून अनेकजण पुणे-मुंबई यासह इतर महानगरात नोकरी आणि कामाच्या निमित्ताने गेले होते. ती मंडळी आता गावाकडे परतू लागली आहे. कोरोना संसर्गामुळे गावकऱ्यांत अशा व्यक्तींबद्दल गैरसमज निर्माण होत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींचा शोध आशा वर्कर, तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवकांच्या मदतीने घेतला जात आहे. त्यांची आरोग्य केंद्रात तपासणी करून हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जात आहे.

ठळक मुद्देएम.जे. प्रदीपचंद्रन : सर्व व्यक्ती गृह विलगीकरण कक्षात, महानगर आणि विदेशातून येणाऱ्यांवर करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महानगरातून जिल्ह्यात आतापर्यंत २१५४ व्यक्ती दाखल झाल्या असून त्या सर्वांची नोंदणी करण्यात आली आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील आणि ग्रामसेवकांकडून दररोज महानगरातून येणाऱ्यांची माहिती घेतली जात आहे. या सर्वांचे गृह विलगीकरण करण्यात आले असून दररोज तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.भंडारा जिल्ह्यातून अनेकजण पुणे-मुंबई यासह इतर महानगरात नोकरी आणि कामाच्या निमित्ताने गेले होते. ती मंडळी आता गावाकडे परतू लागली आहे. कोरोना संसर्गामुळे गावकऱ्यांत अशा व्यक्तींबद्दल गैरसमज निर्माण होत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींचा शोध आशा वर्कर, तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवकांच्या मदतीने घेतला जात आहे. त्यांची आरोग्य केंद्रात तपासणी करून हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जात आहे. भंडारा जिल्ह्यात २१५४ लोकांची नोंदणी करण्यात आली असून या सर्वांना घरीच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील झाल्याने महानगरातून येणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. परंतु महानगरातून दाखल झालेल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रशासनाची करडी नजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.आपातकालीन स्थितीसाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. गरज भासल्या सर्व वसतिगृह रुग्णांसाठी ताब्यात घेतली जातील. तसेच खासगी डॉक्टरांची सेवाही अधिग्रहीत केली जाईल. सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्याचा विचार झाला होता. परंतु ६० वर्षावरील ही मंडळी असल्याने सध्या त्यांना रुग्णांच्या उपचारासाठी बोलावले जाणार नसल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी नागरिकांनी घराबाहेर न निघता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. विनाकारण घराबाहेर निघणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.भटक्यांचे सर्वेक्षणभंडारा शहरात विविध व्यवसायाच्या निमित्ताने आलेले भटके व्यक्ती, निराधार व्यक्ती, भिकारी अशांचे लवकरच तहसीलदारांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाईल. शहरातील अशा व्यक्तींना वाऱ्यावर सोडून देऊ शकत नाही. या सर्वांची व्यवस्था एखाद्या वसतिगृहात करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.मॉक ड्रिलला घाबरू नकाजिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा तत्पर आहे की नाही याची मॉक ड्रील द्वारे तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी तेथे जनरेटरचा वायर निघाल्याचे दिसून आले. तसेच ऑक्सीजनही लिक असल्याचे पुढे आले. आरोग्य सुविधेतील त्रृट्या दूर करण्यासाठी मॉक ड्रील घेण्यात आला. आता लवकरच मॉक ड्रील घेतला जाणार असून कोरोनाचा रुग्ण आल्यावर आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने हाताळते याची चाचपणी केली जाणार आहे. त्यासाठी शहरातून अ‍ॅम्बुलन्स आणि इतर वाहने धावतील. रुग्णालयात डॉक्टर विशिष्ट कीट सह सुसज्ज राहतील. हा प्रकार केवळ आरोग्य यंत्रणेची तपासणी करण्यासाठी आहे. नागरिकांनी अशी मॉक ड्रील झाल्यास अफवा पसरवू नये आणि घाबरून जाऊ नये असे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी सांगितले.जीवनावश्यक वस्तू सुरळीतभंडारा जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा साठा योग्य प्रमाणात असून त्याचे वितरणही सुरळीतपणे सुरु आहे. नागरिकांनी किराणा दुकानातून व इतर ठिकाणाहून साहित्य खरेदी करताना गर्दी करू नये. विशिष्ट अंतर ठेवूनच खरेदी करावी. आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तू खरेदी करून साठा करू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollectorजिल्हाधिकारी