शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक पाणीपुरवठा ‘रामभरोसे’

By admin | Updated: September 28, 2015 00:49 IST

जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत शहापूर प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून आठ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो.

जवाहरनगर : जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत शहापूर प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून आठ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा बंद राहत असल्याने नळ जोळणीधारकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने बेला येथे शहापूर प्रादेशिक पाणी पुरवठाचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. याकरिता वैनगंगा नदी पात्रालगत जलस्त्रोत निर्माण केलेले आहे. यापूर्वी ही योजना जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने चालविण्यात येत होती. दोन वर्षापूर्वी ही योजना बेला ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत करण्यात आली. त्यासंबधी सन २०१४-१५ दरम्यान बेला ग्रामपंचायतीशी जिल्हा परिषदेने चालविण्यासाठी करारनामा केला होता. मात्र, सन २०१५-१६ दरम्यानचा करारनामा जिल्हा परिषदेने केलेला नाही. मागील पाण्याची थकबाकी शिल्लक असल्याची ओरड आहे. बेला जलशुद्धीकरण योजनेत आठ गावांचा समावेश आहे. यात बेला, भोजापूर, उमरी, फुलमोगरा, शहापूर, गोपीवाडा, ठाणा, परसोडी, मुजबी यांचा समावेश आहे. या पाणीपुरवठा योजनेचे देखभाल दुरुस्तीचे काम बेला ग्रामपंचायतीकडे आहे. आठवड्यातून तीन ते चार दिवस पाणी पुरवठा करण्यात येतो. तो ही अत्यल्प प्रमाणात आणि सदर ग्रामपंचायतीला पूर्ण टाकीचे पाण्याची थकबाकी पठाविली जाते.ठाणा ग्रामपंचायतीने सुमारे चाळीस हजार रुपये थकबाकी भरून पाणीपुरवठा सुरु करण्याची विनंती केली होती. मात्र एक आठवड्यापर्यंत पाणीपुरवठा करण्यात आलेला नव्हता. पुन्हा या महिन्यात ४० हजाराची पाण्याचे मागणी बील ग्रामपंचायतीमध्ये धडकले. आधीच सणवार असताना गावातील पाणीपुरवठा बंद असतो. तर उर्वरीत दिवशी दोन ते तीन घागर पाणी मिळते. अशी परिस्थिती असताना नळधारक कसे पैसे देणार अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांमध्ये उमटत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत बेला यांच्याशी सन २०१५-१६ करिता करारनामा झालेला नाही. उलट बेला ग्रामपंचायतीचे जिल्हा परिषदेवर देखभाल दुरुस्तीचे बील थकीत आहे. लोकप्रतिनिधींचे उदासीन धोरण व संबंधित अधिकाऱ्यांचे हेकेखोर धोरण यामध्ये सामान्य नळधारक जनता भरडली जात आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. अन्यथा पाण्यासाठी उग्ररुप धारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)