शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मध विक्री करणारे परप्रांतीय उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा फटका सर्वसामान्य व गरीबांना अधिक बसला आहे. लोकांना गोड मध विक्री करून उदरनिर्वाह करणारे सुमारे ३५ जणांचे बिºहाड देव्हाडी येथे रेल्वे ट्रॅकजवळ झोपड्यात वास्तव्याला आहे. यात आठ महियांच्या चिमुकले ते ५ वर्षापर्यंत लहान मुलांचा समावेश आहे. मागील सहा महिन्यापुर्वी ते देव्हाडी येथे आले होते. मुंबई-हावडा रेल्वे ट्रॅकशेजारीच त्यांनी प्लॉस्टिक युक्त कापडाच्या सहा झोपड्या तयार केल्या.

ठळक मुद्देझोपड्यात वास्तव्य : जीवनावश्यक वस्तूंचे वितरण गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गत सहा महिन्यापासून देव्हाडी परिसरात मध विक्री करणाऱ्यांचे बिऱ्हाड थाटले आहे. लॉकडाऊनमध्ये त्यांचेवर उपासमारीचे संकट आहे. मुंबई-हावडा रेल्वे ट्रॅकजवळ त्यांनी सहा कापडी झोपड्या तयार केल्या. त्यात त्यांचे वास्तव्य आहे. दुपारी जवळील झाडाच्या सावलीत दिवस घालवितात. रात्री कापडी झोपडीत घालवितात. रेल्वे वाहतूक सुरू नसल्याने ते मुळ बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यात परतू शकले नाही.कोरोना विषाणूचा फटका सर्वसामान्य व गरीबांना अधिक बसला आहे. लोकांना गोड मध विक्री करून उदरनिर्वाह करणारे सुमारे ३५ जणांचे बिºहाड देव्हाडी येथे रेल्वे ट्रॅकजवळ झोपड्यात वास्तव्याला आहे. यात आठ महियांच्या चिमुकले ते ५ वर्षापर्यंत लहान मुलांचा समावेश आहे. मागील सहा महिन्यापुर्वी ते देव्हाडी येथे आले होते. मुंबई-हावडा रेल्वे ट्रॅकशेजारीच त्यांनी प्लॉस्टिक युक्त कापडाच्या सहा झोपड्या तयार केल्या. शेतशिवारात फिरून ते मध गोळा करतात. नंतर ते मध गावात व शहरात विक्री करतात. मध गोळा करण्यात त्यांचा हातखंडा आहे. पुरूषांना महिला या कामात मदत करतात. अचानक आलेल्या कोरोना संकटात सर्व व्यवहार बंद होईल याची त्यांना माहिती नव्हती, अशी माहिती त्यांनी सांगितली. या कुटुंबांकडे तालुका प्रशासनाने लक्ष देऊन त्यांना धान्य पुरवठा करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.लहान मुले-महिलांचा समावेश३५ जणांचा त्यात समावेश असून चार कुटुंबांचा त्यात समावेश आहे. यात ८ महिन्याच्या बाळाचा ते ५ वर्षीय मुली-मुलांचा समावेश आहे. रणरणत्या उन्हाचा त्रास होतो म्हणून सकाळी १० ते दुपारी ४पर्यंंत सर्व कुटुंबाचे जवळच्या झाडाखाली ते आसरा घेतात.गावाला परत जाणारचारही कुटुंब बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. गरीबामुळे त्यांना स्थलांतरीत जीवन जगावे लागत आहे. महिन्यापुर्वी देव्हाडी येथे ते आले. लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा आपल्या गावाकडे जाणार असल्याचे येथील राजेश महतो यांनी लोकमतला सांगितले.अन्नधान्याचा पुरवठालॉकडाऊनमध्ये तुमसर तहसील कार्यालयाकडून ६० किलोग्रॅम अन्नधान्य या कुटुंबाला सहा ते सात दिवसापुर्वी देण्यात आला. सध्या त्यांचेजवळील अन्नधान्य संपले आहे. पुन्हा त्यांना अन्नधान्यांची पुरवठा करून तात्पुरती निवासी व्यवस्था जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत करण्याची गरज आहे.मध विक्री करणाऱ्याकुटुंबांना सहा दिवसापुर्वी अन्नधान्यांचा पुरवठा करण्यात आला होता. पुन्हा त्यांना तात्काळ धान्याचा पुरवठा क रण्यात येईल. अन्य अडचणी सुद्धा दूर करू.-गजेंद्र बालपांडे, तहसीलदार तुमसरलॉकडाऊनमुळे मध गोळा करणाऱ्या चार कुटुंबासमोर संकट उभे आहे. येथील चिमुकल्यांना सुरक्षित जागी हलविणे गरजेचे आहे. अवकाळी पावसात त्यांना ओलेचिंब व्हावे लागते. उन्हाचा तडाखा बसत आहे.-देवसिंग सव्वालाखे,जिल्हा परिषद माजी सदस्य देव्हाडी

टॅग्स :Socialसामाजिक