शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

प्रवासी निवारा बनला दारुड्यांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST

केशोरी : येथे परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा ऊन, पावसाच्या त्रासापासून बचाव होण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून प्रवासी ...

केशोरी : येथे परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा ऊन, पावसाच्या त्रासापासून बचाव होण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून प्रवासी निवारा तयार करण्यात आला आहे. मात्र रात्रीला या प्रवासी निवाऱ्याचा उपयोग दारुड्यांना होत असून, प्रवासी निवारा दारुड्यांचा अड्डा बनला आहे. निवाऱ्यात पडून असलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या याची साक्ष देत आहेत. यावरून गावात दारूशौकिनांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे, तर प्रवासी निवाऱ्यात दारू पिणाऱ्यांवर कोण कारवाई करणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

शासनाच्या राज्य रस्ते परिवहन महामंडळाने प्रवाशांचा ऊन व पावसापासून बचाव होण्यासाठी जिल्ह्यातील अनेक गावांत प्रवासी निवारे तयार केले. त्यानुसार येथे आमदार विकास निधीतून लाखो रुपये खर्च करून प्रवासी निवारा तयार करण्यात आला आहे.

या प्रवासी निवाऱ्याच्या शेजारी अतिक्रमण करून काही व्यावसायिकांनी हॉटेल व दुकाने लावली आहेत. याचाच फायदा घेत रात्रीला प्रवाशांपेक्षा गावातील दारुड्यांची मैफल या प्रवासी निवाऱ्यात रंगत आहे. प्रवासी निवाऱ्याच्या भिंतीजवळ जिकडे-तिकडे दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या असून, त्या दारुड्यांच्या पार्टीची साक्ष देत आहेत.

येथील रिकाम्या बाटल्या पाहून हा दारू पिण्याचा खेळ दररोज रात्री चालत असावा असे दिसून येत असून, तशी गावात चर्चा आहे. येथे बसून दारू पिणाऱ्यांवर वचक बसविणे गरजेचे आहे. अन्यथा तरुण मंडळी दारूच्या आहारी जाऊन आपल्या कुटुंबाची वाट लावल्याशिवाय राहणार नाही.

याचीच काहीशी प्रचिती सध्याची प्रवासी निवाऱ्याची गत बघून दिसून येत आहे. यामुळे आता पोलिसांनीही याकडे गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करण्याची गरज आहे.

दारुड्यांवर कारवाईची मागणी

संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या डिसेंबर १९९९ मधील गोळीबारकांडाचा उगम याच ठिकाणावरून झाला होता हे विशेष. त्यानंतर हे चित्र बघून गोळीबारकांडाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रवासी निवाऱ्यात बसून दारू पिणाऱ्यांवर कोण कारवाई करणार, असा प्रश्न निर्माण होतो. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी दखल घेऊन दारू पिणाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.