शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

प्रवासी निवारा बनला दारुड्यांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST

केशोरी : येथे परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा ऊन, पावसाच्या त्रासापासून बचाव होण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून प्रवासी ...

केशोरी : येथे परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा ऊन, पावसाच्या त्रासापासून बचाव होण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून प्रवासी निवारा तयार करण्यात आला आहे. मात्र रात्रीला या प्रवासी निवाऱ्याचा उपयोग दारुड्यांना होत असून, प्रवासी निवारा दारुड्यांचा अड्डा बनला आहे. निवाऱ्यात पडून असलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या याची साक्ष देत आहेत. यावरून गावात दारूशौकिनांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे, तर प्रवासी निवाऱ्यात दारू पिणाऱ्यांवर कोण कारवाई करणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

शासनाच्या राज्य रस्ते परिवहन महामंडळाने प्रवाशांचा ऊन व पावसापासून बचाव होण्यासाठी जिल्ह्यातील अनेक गावांत प्रवासी निवारे तयार केले. त्यानुसार येथे आमदार विकास निधीतून लाखो रुपये खर्च करून प्रवासी निवारा तयार करण्यात आला आहे.

या प्रवासी निवाऱ्याच्या शेजारी अतिक्रमण करून काही व्यावसायिकांनी हॉटेल व दुकाने लावली आहेत. याचाच फायदा घेत रात्रीला प्रवाशांपेक्षा गावातील दारुड्यांची मैफल या प्रवासी निवाऱ्यात रंगत आहे. प्रवासी निवाऱ्याच्या भिंतीजवळ जिकडे-तिकडे दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या असून, त्या दारुड्यांच्या पार्टीची साक्ष देत आहेत.

येथील रिकाम्या बाटल्या पाहून हा दारू पिण्याचा खेळ दररोज रात्री चालत असावा असे दिसून येत असून, तशी गावात चर्चा आहे. येथे बसून दारू पिणाऱ्यांवर वचक बसविणे गरजेचे आहे. अन्यथा तरुण मंडळी दारूच्या आहारी जाऊन आपल्या कुटुंबाची वाट लावल्याशिवाय राहणार नाही.

याचीच काहीशी प्रचिती सध्याची प्रवासी निवाऱ्याची गत बघून दिसून येत आहे. यामुळे आता पोलिसांनीही याकडे गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करण्याची गरज आहे.

दारुड्यांवर कारवाईची मागणी

संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या डिसेंबर १९९९ मधील गोळीबारकांडाचा उगम याच ठिकाणावरून झाला होता हे विशेष. त्यानंतर हे चित्र बघून गोळीबारकांडाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रवासी निवाऱ्यात बसून दारू पिणाऱ्यांवर कोण कारवाई करणार, असा प्रश्न निर्माण होतो. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी दखल घेऊन दारू पिणाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.