शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन वाहन कर्मचारी भरती करा

By admin | Updated: May 30, 2016 00:59 IST

नगरपालिका कार्यक्षेत्रात दोन वॉर्डातील घरांना आग लागून मोठे नुकसान झाल्यानंतर पालिका पदाधिकारी एकवटले...

पवनी : नगरपालिका कार्यक्षेत्रात दोन वॉर्डातील घरांना आग लागून मोठे नुकसान झाल्यानंतर पालिका पदाधिकारी एकवटले व कर्मचाऱ्यांअभावी अग्निशमन वाहन लोकांना संकटसमयी कामात येत नाही याची जाणीव झाल्याने चार वर्षानंतर पहिल्यांदाच जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन सादर केले. जिल्हा निवड समिती मार्फत कर्मचारी त्वरीत भरा अथवा कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्तीस मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.महाराष्ट्र अग्नी सुरक्षा अभियान अंतर्गत नगरपालिकेला अग्निशमन वाहन देण्यात आले व कर्मचारी भरतीसंदर्भात निर्देश देण्यात आले. सहायक अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक हे वर्ग ३ चे पद जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भरावयाचे, वाहन चालक कम आॅपरेटर हे वर्ग ३ चे पद जिल्हा निवड समिती मार्फत भरावयाचे तर फायरमन हे वर्ग ४ चे पद नगरपालिका सर्वसाधारण सभेच्या परवानगीने भरावयाचे असे निर्देश देण्यात आलेले आहेत. परंतु गेल्या चार वर्षात कर्मचारी कोणी व कसे भरावयाचे यावर मंथन होत राहिले. पालिका प्रशासनाने सोयीचा अर्थ काढला व अग्निशमन वाहन कर्मचारी नसल्याने तसेच पडून राहिले. फायरमन हे वर्ग ४ चे पद सर्वसाधारण सभेने भरण्याऐवजी राजकारणापायी समिती नेमण्यात आली. त्यावरही वादंग झाले व पद भरावयाचे तसेच राहिले.नवतपात १५ दिवसात मोठ्या मोठ्या घरांना आग लागली. लाखोंची संपत्ती जळून खाक झाली. घटनास्थळी नागरिक पालिका पदाधिकाऱ्यांना वाटेल ते बोलले. त्याचा परिणाम म्हणून जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना पालिका पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ भेटले. निवेदन देऊन कर्मचारी भरतीसाठी पाठपुरावा करण्यात आला. निवेदनावर न.प. अध्यक्ष रजनी मोटघरे, उपाध्यक्ष विजय ठक्कर, नगरसेवक नरेश बावनकर, तुलसी वंजारी, धर्मेंद्र नंदरधने, भास्कर उरकुडकर, सुरेखा जनबंधू, पुष्पा भुरे, माया खापर्डे, वनिता काटेखाये यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)