शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

पदभरती करणे हा संस्थाचालकांचा अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:37 IST

शिक्षक भरती करणे हा संस्था संचालकांचा अधिकार आहे, हे संस्था संचालकांनी जाणून घेतले पाहिजे.

ठळक मुद्देसंस्था संचालकांची बैठक : विनोद गुडधे पाटील यांचे प्रतिपादन

आॅनलाईन लोकमतभंडारा : शिक्षक भरती करणे हा संस्था संचालकांचा अधिकार आहे, हे संस्था संचालकांनी जाणून घेतले पाहिजे. समायोजन प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयात निकाल महामंडळाच्या बाजूने लागला असून संस्था संचालकांनी समायोजन घेऊ नये, असे प्रतिपादन महामंडळाचे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था कार्याध्यक्ष विनोद गुडधे पाटील यांनी केले.राज्य सरकारच्या शिक्षण विषयक धोरण, पद भरती, चुकीच्या संच मान्यता, राजकीय दबावाखाली शिक्षणाधिकारी कार्यालयातुन होणारे गैरव्यवहार, अतिरिक्त कामाचा बोझा, आॅनलाईनचा शिक्षकांना होणार त्रास, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरती बंदीचा प्रश्न तसेच संस्था संचालकांच्या अडचणीवर सरकार दरबारी तोडगा काढण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य संस्था संचालक महामंडळ शाखा भंडाराच्या वतीने बैठकीचे आयोजन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ महासचिव रविंद्र फडणविस , विभागीय अध्यक्ष अनिल शिंदे, महासंघ सदस्य चंद्रकांत जवदंड, महासंघ शाखा भंडारा अध्यक्ष कैलाश नशिने, सचिव भाऊ गोस्वामी प्रामुख्याने उपस्थित होते.रवींद्र फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने डी एड, बी. एड. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे हे सिद्ध करण्यासाठी अभियोग्यता चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश जर डी. एड., बी. एड. ला घेतला तर मग त्याला निश्चितच शिक्षक व्हायचे आहे. मग ते उत्तीर्ण झाल्यावर या शिक्षक क्षेत्रात करिअर करायचंय आहे. म्हणून ही चुकीच्या पद्धतीने काढलेल्या अभियोग्यता चाचणीला आमचा विरोध आहे, असे असले तरी या अभियोग्यता चाचणीमध्ये विषयाचे ज्ञान किती आहे हे मात्र बघितले जाणार नाही. मग शासन असे थट्टा करून मराठी शाळांवर वारंवार अन्याय करीत असल्याची टीका त्यांनी केली.अभियोग्यता चाचणी संदर्भात महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून संस्था संचालकांना पद भरतीचे अधिकार मिळाले असून महामंडळाची परवानगी घेऊन जाहिराती काढाव्यात, असे महामंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल शिंदे बोलत होते.यावेळी कैलाश नशीने आणि भाऊ गोस्वामी यांनी मार्गदर्शन करून संस्था संचालकांना संघटित होण्याचे आवाहन केले. यावेळी हेमंत बांडेबुचे, आल्हाद लाखनीकर, दिगंबर मेश्राम, मंसाराम दहिवले, प्रभुदयाल चौधरी, अन्नाजी फटे, देवराम पवनकर, सुभाष खेडीकर, पुरुषोत्तम करेमोरे, बाबुराव फूले,चंद्रकांत दिवटे, अमोल हलमारे, दिलीप जयस्वाल, अनंत डुंभरे आदी मोठ्या संख्येने संस्था संचालक उपस्थित होते.बैठकीचे प्रस्ताविक निश्चय डोनाडकर यांनी केले. संचालन अजिंक्य भांडारकर व आभार प्रदर्शन आल्हाद लाखनीकर यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील बहुतांश संस्था संचालक प्रामुख्याने उपस्थित होते.