शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

सातव्या वेतन आयोगाशी शिफारस म्हणजे कष्टकरी शेतकऱ्यांची थट्टा

By admin | Updated: December 6, 2015 00:37 IST

शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरून शेतमालाचे हमीभाव दर ठरविण्यात यावे ही स्वामीनाथन आयोगाची शिफारस..

राजेंद्र पटले यांचा आरोप : स्वामीनाथ आयोग लागू करातुमसर : शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरून शेतमालाचे हमीभाव दर ठरविण्यात यावे ही स्वामीनाथन आयोगाची शिफारस शासन दरबारी धुळखात पडली असताना नोकरदारवर्गाला अनुकुल सातव्या वेतन आगोगाची शिफारस म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच. सरकार करीत असल्याची घणाघाती टिका किसान गर्जनेचे राजेंद्र पटले यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.यावेळी ते म्हणाले, सातव्या वेतन आयोगाची शिफारस करण्यासाठी आणि देशाच्या अर्थ व्यवस्थेचा पाया असलेली शेती व शेतकरी यांचा सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळावी यात दुमत नाही. परंतु वेतनवाढीच्या शिफारशी बरोबर शेतकऱ्यांचा हिताचाही विचार होणे तितकेच गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. आजपर्यंत कर्मचाऱ्याला वेतन कमी मिळते म्हणून एकातरी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असे अखंड भारताच्या इतिहासात बघायला व ऐकायलाही मिळाले नाही. परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र उलट आहे. दररोज कुठे ना कुठे शेतकरी आत्महत्या करीत असून आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. तरी देखील सरकारला संपूर्णत: शेतकऱ्यांचा विसर पडला असल्याचे चित्र आहे. शेतीच्या प्रश्नांविषयी सरकारची अनास्था वाढली आहे. सरकार शेतकऱ्यांचा विचार करायलाच तयार नाही. हीच तरी खरी शोकांतिका आहे. सरकार मात्र शेतीमालाच्या हमी भाववाढीच्या शिफारस करणारा डॉ.स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाला धुळीत पडून ठेवले व कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीच्या आयोगाची शिफारस करीत आहे. हे सर्व थांबवून आधी शेतकऱ्याचे सरकारने हित जोपासले पाहिजे. तेव्हाच कुठे तरी भारत हा कृषी प्रधान देश म्हणून हरितक्रांती घेवून अस्तित्वात येईल व सुखी व समृद्ध भारत अशी ओळख निर्माण करेल असे त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)