शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगाशी शिफारस म्हणजे कष्टकरी शेतकऱ्यांची थट्टा

By admin | Updated: December 6, 2015 00:37 IST

शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरून शेतमालाचे हमीभाव दर ठरविण्यात यावे ही स्वामीनाथन आयोगाची शिफारस..

राजेंद्र पटले यांचा आरोप : स्वामीनाथ आयोग लागू करातुमसर : शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरून शेतमालाचे हमीभाव दर ठरविण्यात यावे ही स्वामीनाथन आयोगाची शिफारस शासन दरबारी धुळखात पडली असताना नोकरदारवर्गाला अनुकुल सातव्या वेतन आगोगाची शिफारस म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच. सरकार करीत असल्याची घणाघाती टिका किसान गर्जनेचे राजेंद्र पटले यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.यावेळी ते म्हणाले, सातव्या वेतन आयोगाची शिफारस करण्यासाठी आणि देशाच्या अर्थ व्यवस्थेचा पाया असलेली शेती व शेतकरी यांचा सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळावी यात दुमत नाही. परंतु वेतनवाढीच्या शिफारशी बरोबर शेतकऱ्यांचा हिताचाही विचार होणे तितकेच गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. आजपर्यंत कर्मचाऱ्याला वेतन कमी मिळते म्हणून एकातरी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असे अखंड भारताच्या इतिहासात बघायला व ऐकायलाही मिळाले नाही. परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र उलट आहे. दररोज कुठे ना कुठे शेतकरी आत्महत्या करीत असून आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. तरी देखील सरकारला संपूर्णत: शेतकऱ्यांचा विसर पडला असल्याचे चित्र आहे. शेतीच्या प्रश्नांविषयी सरकारची अनास्था वाढली आहे. सरकार शेतकऱ्यांचा विचार करायलाच तयार नाही. हीच तरी खरी शोकांतिका आहे. सरकार मात्र शेतीमालाच्या हमी भाववाढीच्या शिफारस करणारा डॉ.स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाला धुळीत पडून ठेवले व कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीच्या आयोगाची शिफारस करीत आहे. हे सर्व थांबवून आधी शेतकऱ्याचे सरकारने हित जोपासले पाहिजे. तेव्हाच कुठे तरी भारत हा कृषी प्रधान देश म्हणून हरितक्रांती घेवून अस्तित्वात येईल व सुखी व समृद्ध भारत अशी ओळख निर्माण करेल असे त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)