शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

कव्हरेजअभावी भ्रमणध्वनी ठरताहेत शोभेची वास्तू

By admin | Updated: April 25, 2015 00:52 IST

भारत संचार निगम देशभरात दूरध्वनी व भ्रमणध्वनीचे जाळे विणण्याचा प्रयत्न करून प्रत्येक नागरिकांपर्यंत त्याचा फायदा व्हावा,

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : बीएसएनएल विरोधात ग्राहकांमध्ये आक्रोश भंडारा : भारत संचार निगम देशभरात दूरध्वनी व भ्रमणध्वनीचे जाळे विणण्याचा प्रयत्न करून प्रत्येक नागरिकांपर्यंत त्याचा फायदा व्हावा, यासाठी धडपड करीत आहे. मात्र भंडारा तालुक्यातील राजेगाव एमआयडीसी परिसरात असलेल्या निगमच्या वतीने कव्हरेज देण्याच्या सेवेत त्रृटी निर्माण होत असल्याने भ्रमणध्वनीसेवा निकामी ठरत आहे. याकडे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकांमध्ये असंतोष व्यक्त केल्या जात आहे. कव्हरेज वाढविण्यात यावे, अशी मागणी खुटसावरी, टेकेपार, पिंपळगाव, माडगी परिसरातील नागरिकांनी केली आहे.भारत संचार निगम लिमिटेड शाखा एमआयडीसी राजेगाव येथे कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. कार्यालय परिसरातील गावांना दूरध्वनी व भ्रमणध्वनी सेवेचा लाभ मिळावा, असा उद्देश निगमचा आहे. मात्र लाखो रूपये खर्चून खुटसावरी या गावासाठी १० वर्षापुर्वी केबल घालण्यात आले होते. एक-दोन वर्ष दुरध्वनीसेवा सुरळीत होती. मात्र त्यानंतर अनेकदा तांत्रिक बिघाड येत असल्यामुळे ग्राहकांचा हिरमोड झाला. लाखो रूपये खर्चून या गावातील ग्राहकांसाठी बीएसएनएलने दूरध्वनी ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या गावात सद्यस्थितीत एकही दुरध्वनीधारक नाही. भारत देशात खुटसावरी हे 'दूरध्वनीमुक्त गाव' अशी ख्याती परिसरात आहे. दूरध्वनीसेवा अयशस्वी झाल्यानंतर नागरिकांचा कल भ्रमणध्वनी सेवेकडे गेला. खुटसावरी गावातील अनेकांनी भ्रमणध्वनी खरेदी करून बीएसएनएलचे सीम वापरले. मात्र कव्हरेजअभावी भ्रमणध्वनीसेवा ठप्प झाली. परिणामी अनेक ग्राहकांनी खाजगी कंपन्यांचे सीम वापरणे सुरू केले आहे. अनेकांजवळ आजही बीएसएनएलचे सीम असून सेवाप्राप्तीसाठी स्लॅब, झाड, टेकडीचा आसरा घेवून सेवेचा आनंद घेत आहेत. कव्हरेज का मिळत नाही, याचा शोध घेण्याचा थोडासा प्रयत्नही अधिकाऱ्यांनी केल्याचे दिसत नाही. कर्मचाऱ्यांच्या उदासिनतेमुळे अवघ्या दोन कि़मी. अंतरावर असलेल्या खुटसावरी गावात कव्हरेज का मिळत नाही, याचा शोध घेण्याची अधिकाऱ्यांना गरज आहे. खुटसावरी परिसरात माडगी, टेकेपार, पिंपळगाव या गावात निगमची सेवा पुर्णत: ठप्प असते. अनेकदा त्यांना लाखनी गाठून संदेशवहन करावे लागते. एकीकडे केंद्रशासन बीएसएनएलची सुविधा नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध उपाययोजना करून ग्राहकांना खुश करण्याचा प्रयत्न करीत असला तरी प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत ही सेवा मिळते काय, याकडे केंद्रासह राज्य शासनाने देखील लक्ष देण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)कार्यालय कुलूप बंदएमआयडीसी परिसरात असलेले संचार निगम कार्यालय नेहमीच बंद असते. त्यामुळे तक्रार करायची कुणाकडे, असा प्रश्न आहे.