शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खूूप वाचा, खूप लिहा आणि आनंदी रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 23:41 IST

निस्पृहपणे एखादी गोष्ट केल्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो. ग्रंथाचे वाचन हा कुठल्याही आनंदापेक्षा वेगळाच असून ग्रंथासारखा मित्र नाही.

ठळक मुद्देसुहास दिवसे : ग्रंथोत्सवाचा ग्रंथ दिंडीने शुभारंभ

आॅनलाईन लोकमतभंडारा : निस्पृहपणे एखादी गोष्ट केल्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो. ग्रंथाचे वाचन हा कुठल्याही आनंदापेक्षा वेगळाच असून ग्रंथासारखा मित्र नाही. परंतु आजच्या आधुनिक जगात हा आनंद हरपला आहे. शिक्षकांनी मुलांच्या मनात वाचनाप्रती आवड निर्माण करावी. खुप वाचा, खुप लिहा आणि आनंदी रहा, असा सल्ला जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी विद्यार्थ्यांना दिला.उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय सचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई व ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २८ व २९ नोव्हेंबर रोजी जकातदार विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय भंडारा येथे जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या उदघाटनपर भाषणात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर होते. प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, ग्रंथालय सहाय्यक संचालक मिनाक्षी कांबळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खिजेंद्र बोपचे, उपशिक्षणाधिकारी उमाकांत दुबे, मुख्याध्यापिका मंदा चोले प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, मी पण पूर्वी लेखक, प्रकाशक होतो पण आज वाचक आहे. त्यामुळे मला या क्षेत्रातील मोठा अनुभव आहे. मी स्वत: दररोज ग्रंथाचे ४० पाने वाचल्याशिवाय झोपत नाही, असेही ते म्हणाले. पुस्तक व चित्रपट यांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. ईलेक्टानिक्स साहित्यामुळे मुलांमध्ये वाचनाची संस्कृती लोप पावली असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांनी दैनंदिन वृत्तपत्र वाचावे तसेच दररोज काही तरी लिहीण्याचा प्रयत्न करावा.‘का अशी जपते तूही गोंधळीचा वारसा, तोच माझा चेहरा तोच माझा आरसा’ अशा काव्यमय पक्तींने ज्येष्ठ कवी व सखे सजनी कार प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी भाषणास सुरुवात करुन उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले, सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या सारख्या थोर समाजसुधारकांची चारित्र्ये, ग्रंथ संपदा वाचा. समाजाचे प्रतिबींब साहित्यातून घडत असते.ग्रंथाचे वाचन करा. अंधश्रध्देच्या आहारी जावू नका, शाळा, ग्रंथालय हीच मंदिरे आहेत. ग्रंथालय मंदिर झाली पाहिजे म्हणून ग्रथांची पूजा करा. यावेळी मिनाश्री कांबळे म्हणाल्या की, ग्रंथाच्या वाचनाने उत्तुंग व्यक्तिमत्व घडण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी वेळेचे भान ठेवून अवांतर वाचन व टि.व्ही बघावे. शालेय पुस्तकातून ज्ञान संपादित करावे. वाचाल तर वाचाल, असे आवाहन त्यांनी केले. ग्रंथोत्सवाचे आयोजन ग्रंथालय चळवळीस चालना देण्यासाठीच आहे, असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविकातून जिल्हा ग्रंथालय अधिकारी खिजेंद्र बोपचे ग्रंथोत्सव आयोजनाबाबत माहिती विषद केली. संचालन प्रा. आरती देशपांडे यांनी तर जकातदार विद्यालयाच्या विद्यार्थींनी समूहगान सादर केले. सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाचा शुभारंभ जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम यांचे हस्ते झाला. ही ग्रंथदिडी जकातदार शाळा, गांधी चौक ते परत जकातदार शाळा येथे समारोप झाला.