शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 01:04 IST

भाजप- सेना युती सरकारने मागील पाच वर्षात लोकाभिमुख योजना राबविल्या आहेत. या योजनांचा खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळाला पाहिजे. यासाठी लाभार्थ्यांपर्यंत या योजना पोहचवा, असे जाहिर आवाहन हजारो भाजप कार्यकर्त्यांना आमदार चरण वाघमारे यांनी केले.

ठळक मुद्देचरण वाघमारे : तुमसर येथे संकल्प सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाजप- सेना युती सरकारने मागील पाच वर्षात लोकाभिमुख योजना राबविल्या आहेत. या योजनांचा खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळाला पाहिजे. यासाठी लाभार्थ्यांपर्यंत या योजना पोहचवा, असे जाहिर आवाहन हजारो भाजप कार्यकर्त्यांना आमदार चरण वाघमारे यांनी केले.तुमसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात तुमसर-मोहाडी विधानसभाक्षेत्रातील नागरिकांना योजनाची माहिती व लाभ देण्याअंतर्गत मार्गदर्शन करण्यासाठी संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार वाघमारे बोलत होते.यावेळी मंचावर माजी खासदार शिशुपाल पटले, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, डॉ. युवराज जमईवार, माजी सभापती गिता कापगते, बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, मुन्ना पुंडे, बाबु ठवकर, अनिल जिभकाटे, राजेश पटले, संदिप ताले, डॉ. हरेंद्र रहांगडाले, निशिकांत इलमे, डॉ. अशोक पटले आदी मान्यवर उपस्थित होते.वाघमारे म्हणाले, यापुर्वीच्या राज्य शासनाने कधी सर्वसामान्य मानसांचा विचार केला नाही. भारतीय जनता पक्षाचे संस्थापक पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या संकल्पनेतून एकात्म मानववादाचा विचार शेवटचा घटकापर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी सदैव प्रयत्न केले. हाच संकल्प मनाशी बाळगून मुख्यमंत्री फडणवीस कार्य करीत आहेत. मागील पाच वर्षाचा कार्यकाळात शेतकरी कर्जमाफी, सुवर्ण कर्जमाफी, जलयुक्त शिवार, पिक विमा योजना, वर्ग दोन ची शेतजमीन वर्ग १ करण्याचा निर्णय, सरळसेवा भरती, सेवा हमी कायदा, महिलांना संरक्षण, अशा अनेक योजना राज्य शासनाने राबविल्या आहेत. परंतु त्या योजना खºया अर्थाने लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्त्यांची आहे, असेही ते म्हणाले. यावेळी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पावर जोरदार टिका केली. गीता कापगते यांनी महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. युवराज जमईवार यांनी तर आभार अशोक पटले यांनी मानले.

टॅग्स :government schemeसरकारी योजना