शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

कामगार कार्यालयासमोर काँग्रेसचे रास्तारोको आंदोलन

By युवराज गोमास | Updated: February 12, 2024 17:34 IST

कामगार अधिकारी व पोलिसांची धावपळ; कामगार हिताच्या सर्व मागण्या मान्य.

युवराज गोमासे, भंडारा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कार्यालयाकडून नोंदणी व किचनसेट वितरणादरम्यान सोयी सुविधा पुरविल्या जात नाही. कामगारांचे हाल केले जात आहे. त्यांना पाणी व अन्य मुलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप करीत काँग्रेसच्यावतीने कामगार कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे तासभर सुरू असलेल्या आंदोलनानंतर पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर कामगार अधिकाऱ्यांनी सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वान दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व भंडारा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष आजबले, भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन वंजारी, काँग्रेस नेते बालु ठवकर, आकाश ठवकर, विनित देशपांडे यांनी केले.

अचानक झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे कामगार अधिकाऱ्यांची तसेच पोलिस प्रशासनाची भंबेरी उडाली होती. याप्रसंगी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून मुलाबाळांसह पहाटेपासून रांगेत उभे असलेल्या कामगारांनी आपली व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडली. यावेळी काँग्रेस जिंदाबाद, असे नारे लावण्यात आले. आंदोलनादरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. भर रस्त्यावर कामगारांच्या लांबच लांब रांगा लागून असल्याने वाहतुकदारांना कमालीचा त्रास सहन करावा लागला.

आंदोलनावेळी सतिश सार्वे, राधे भोगाडे, गिरीश ठवकर, श्रीकांत बन्सोड, धनराज काकडे, स्पनिल आरिकर, विशवनाथ शहारे, पोमेश चिलमकर, गंगाराम शहारे, श्रिराम नान्हे, पकज सुखदेवे, हंसराज गजभिये व शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व कामगार उपस्थित होते.

मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन :

कामगारांची गैरसोय थांबविण्यासाठी साहित्य वाटप कार्यक्रम तालुका स्थानावर घेण्यात यावे. नोंदणी करण्यासाठी तालुका निहाय तारखा निश्चित करण्यात याव्यात. वाटप स्थानावर पिण्याच्या पाण्याची व नास्त्याची व्यवस्था करण्यात यावी. कार्ड बनविण्याची व्यवस्था तालुकास्तरावर करण्यात यावी. आदी मागण्या अधिकाऱ्यासमोर ठेवण्यात आल्या. संपूर्ण मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कामगार व काँग्रेसने विचारला अधिकाऱ्यांची जाब :

शासन निर्णयानुसार साहित्याचे वाटप तालुका स्थानावर करायचे होते. परंतु, ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे साहीत्यांचे वाटप तालुकास्तरावर न करता जिल्हास्तरावर का होत आहे? या वाटपाला अधिकाऱ्यांचे पाटबळ का ? शंभर किलोमीटर अंतरावरुन कामगारांना जिल्हास्तरावर यावे लागते. कामगारांना वेळ, पैसा, आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अपघात धोका सुद्धा आहे, याला जबाबदार कोण ? नोदणी आणि साहीत्य किटसाठी सर्वसामान्य जनतेला चार-चार दिवस ताटकळत उन्ह व पावसात का उभे रहावे लागत आहे. ठेकेदाराकडून कामगाराची होत असलेली आर्थिक लुट का थांबविली जात नाही, याबाबीचा जाब काँग्रेसच्यावतीने विचारला गेला.

टॅग्स :bhandara-acभंडाराcongressकाँग्रेसStrikeसंप