शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

कामगार कार्यालयासमोर काँग्रेसचे रास्तारोको आंदोलन

By युवराज गोमास | Updated: February 12, 2024 17:34 IST

कामगार अधिकारी व पोलिसांची धावपळ; कामगार हिताच्या सर्व मागण्या मान्य.

युवराज गोमासे, भंडारा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कार्यालयाकडून नोंदणी व किचनसेट वितरणादरम्यान सोयी सुविधा पुरविल्या जात नाही. कामगारांचे हाल केले जात आहे. त्यांना पाणी व अन्य मुलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप करीत काँग्रेसच्यावतीने कामगार कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे तासभर सुरू असलेल्या आंदोलनानंतर पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर कामगार अधिकाऱ्यांनी सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वान दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व भंडारा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष आजबले, भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन वंजारी, काँग्रेस नेते बालु ठवकर, आकाश ठवकर, विनित देशपांडे यांनी केले.

अचानक झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे कामगार अधिकाऱ्यांची तसेच पोलिस प्रशासनाची भंबेरी उडाली होती. याप्रसंगी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून मुलाबाळांसह पहाटेपासून रांगेत उभे असलेल्या कामगारांनी आपली व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडली. यावेळी काँग्रेस जिंदाबाद, असे नारे लावण्यात आले. आंदोलनादरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. भर रस्त्यावर कामगारांच्या लांबच लांब रांगा लागून असल्याने वाहतुकदारांना कमालीचा त्रास सहन करावा लागला.

आंदोलनावेळी सतिश सार्वे, राधे भोगाडे, गिरीश ठवकर, श्रीकांत बन्सोड, धनराज काकडे, स्पनिल आरिकर, विशवनाथ शहारे, पोमेश चिलमकर, गंगाराम शहारे, श्रिराम नान्हे, पकज सुखदेवे, हंसराज गजभिये व शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व कामगार उपस्थित होते.

मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन :

कामगारांची गैरसोय थांबविण्यासाठी साहित्य वाटप कार्यक्रम तालुका स्थानावर घेण्यात यावे. नोंदणी करण्यासाठी तालुका निहाय तारखा निश्चित करण्यात याव्यात. वाटप स्थानावर पिण्याच्या पाण्याची व नास्त्याची व्यवस्था करण्यात यावी. कार्ड बनविण्याची व्यवस्था तालुकास्तरावर करण्यात यावी. आदी मागण्या अधिकाऱ्यासमोर ठेवण्यात आल्या. संपूर्ण मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कामगार व काँग्रेसने विचारला अधिकाऱ्यांची जाब :

शासन निर्णयानुसार साहित्याचे वाटप तालुका स्थानावर करायचे होते. परंतु, ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे साहीत्यांचे वाटप तालुकास्तरावर न करता जिल्हास्तरावर का होत आहे? या वाटपाला अधिकाऱ्यांचे पाटबळ का ? शंभर किलोमीटर अंतरावरुन कामगारांना जिल्हास्तरावर यावे लागते. कामगारांना वेळ, पैसा, आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अपघात धोका सुद्धा आहे, याला जबाबदार कोण ? नोदणी आणि साहीत्य किटसाठी सर्वसामान्य जनतेला चार-चार दिवस ताटकळत उन्ह व पावसात का उभे रहावे लागत आहे. ठेकेदाराकडून कामगाराची होत असलेली आर्थिक लुट का थांबविली जात नाही, याबाबीचा जाब काँग्रेसच्यावतीने विचारला गेला.

टॅग्स :bhandara-acभंडाराcongressकाँग्रेसStrikeसंप