शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

कामगार कार्यालयासमोर काँग्रेसचे रास्तारोको आंदोलन

By युवराज गोमास | Updated: February 12, 2024 17:34 IST

कामगार अधिकारी व पोलिसांची धावपळ; कामगार हिताच्या सर्व मागण्या मान्य.

युवराज गोमासे, भंडारा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कार्यालयाकडून नोंदणी व किचनसेट वितरणादरम्यान सोयी सुविधा पुरविल्या जात नाही. कामगारांचे हाल केले जात आहे. त्यांना पाणी व अन्य मुलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप करीत काँग्रेसच्यावतीने कामगार कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे तासभर सुरू असलेल्या आंदोलनानंतर पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर कामगार अधिकाऱ्यांनी सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वान दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व भंडारा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष आजबले, भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन वंजारी, काँग्रेस नेते बालु ठवकर, आकाश ठवकर, विनित देशपांडे यांनी केले.

अचानक झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे कामगार अधिकाऱ्यांची तसेच पोलिस प्रशासनाची भंबेरी उडाली होती. याप्रसंगी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून मुलाबाळांसह पहाटेपासून रांगेत उभे असलेल्या कामगारांनी आपली व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडली. यावेळी काँग्रेस जिंदाबाद, असे नारे लावण्यात आले. आंदोलनादरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. भर रस्त्यावर कामगारांच्या लांबच लांब रांगा लागून असल्याने वाहतुकदारांना कमालीचा त्रास सहन करावा लागला.

आंदोलनावेळी सतिश सार्वे, राधे भोगाडे, गिरीश ठवकर, श्रीकांत बन्सोड, धनराज काकडे, स्पनिल आरिकर, विशवनाथ शहारे, पोमेश चिलमकर, गंगाराम शहारे, श्रिराम नान्हे, पकज सुखदेवे, हंसराज गजभिये व शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व कामगार उपस्थित होते.

मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन :

कामगारांची गैरसोय थांबविण्यासाठी साहित्य वाटप कार्यक्रम तालुका स्थानावर घेण्यात यावे. नोंदणी करण्यासाठी तालुका निहाय तारखा निश्चित करण्यात याव्यात. वाटप स्थानावर पिण्याच्या पाण्याची व नास्त्याची व्यवस्था करण्यात यावी. कार्ड बनविण्याची व्यवस्था तालुकास्तरावर करण्यात यावी. आदी मागण्या अधिकाऱ्यासमोर ठेवण्यात आल्या. संपूर्ण मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कामगार व काँग्रेसने विचारला अधिकाऱ्यांची जाब :

शासन निर्णयानुसार साहित्याचे वाटप तालुका स्थानावर करायचे होते. परंतु, ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे साहीत्यांचे वाटप तालुकास्तरावर न करता जिल्हास्तरावर का होत आहे? या वाटपाला अधिकाऱ्यांचे पाटबळ का ? शंभर किलोमीटर अंतरावरुन कामगारांना जिल्हास्तरावर यावे लागते. कामगारांना वेळ, पैसा, आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अपघात धोका सुद्धा आहे, याला जबाबदार कोण ? नोदणी आणि साहीत्य किटसाठी सर्वसामान्य जनतेला चार-चार दिवस ताटकळत उन्ह व पावसात का उभे रहावे लागत आहे. ठेकेदाराकडून कामगाराची होत असलेली आर्थिक लुट का थांबविली जात नाही, याबाबीचा जाब काँग्रेसच्यावतीने विचारला गेला.

टॅग्स :bhandara-acभंडाराcongressकाँग्रेसStrikeसंप