शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

भाकपचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:50 IST

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डाव्या पक्षाच्या ‘संविधान बचाव व धर्मनिरपेक्षता दिन आणि महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या राज्यव्यापी ग्रामपंचायत स्तरीय आंदोलनाचा समापन’ यानिमित्ताने गुरुवारला भाकप कार्यालय साकोली येथून मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देसाकोली तहसीलदारांना निवेदन : आठवडाभरात मागण्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डाव्या पक्षाच्या ‘संविधान बचाव व धर्मनिरपेक्षता दिन आणि महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या राज्यव्यापी ग्रामपंचायत स्तरीय आंदोलनाचा समापन’ यानिमित्ताने गुरुवारला भाकप कार्यालय साकोली येथून मोर्चा काढण्यात आला.‘संविधान बचाव, देश बचाव धर्मनिरपेक्षता दिन जिंदाबाद’ आदी घोषणा देत मोर्चा तहसिल कार्यालयावर पोहचल्यावर मोर्च्याचे रुपांतर धरणे आंदोलनात करण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व शिवकुमार गणविर, शांताराम शेंडे, राजु बडोले, दिलीप उंदिरवाडे किशोर बारस्कर, केशव भेंडारकर, झाडु वासनीक, बाबुराव मेश्राम, शैलेश गणविर यांनी केले. धरणे आंदोलनासमोर नेत्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर एका शिष्टमंडळाद्वारे तहसीलदार अरविंद हिंगे यांना मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.निवेदनात, रोजगार हमी कायद्यांर्गत नमुना ४० चे अर्ज उपलब्ध करुन देणे, सर्व गरजुंना घरकुल देणे, प्रति रेशन कार्ड ३५ किलो रेशन, केरोसिन, साखर व इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणे, श्रावण बाळ, संजय निराधार योजनेचे अर्थसहाय्य दरमहा एक हजार रुपये व वयोमर्यादा ६० वर्ष करावी, उज्वला योजनेला सबसिडी द्यावी, वनाधिकार कायद्यांतर्गत विनाअट पट्टे देण्यांत यावे, साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयाची दुर्दशा सुधारावी, राष्ट्रीय महामार्ग व इतर मार्गावरील गतिरोधकांवर काळे पांढरे संकेत पट्टे करावे, साकोली नगर परिषदेचे उपाध्यक्षांच्या तिसरे अपत्याची हेतुपुर्वक नोंद केली नसल्याप्रकरणी उपाध्यक्ष व नगर परिषद अधिकाऱ्यांविरुध्द कारवाई करावी, आलेबेदर येथील काबिलकास्त जमीनी मुळ लाभार्थ्यांच्या ताब्यात द्यावी, नागझीरा रोडवरील भूखंड पाडुन विक्री होत असलेली काबिलकास्त जमीन सरकारजमा करुन सरकारी ताबा करावा, साकोली नगरीत मंजुर विकास कामे सुरु करावी, कृषीपंपाचे विनारिडींग बिल देऊ नये, रेतीअभावी बांधकाम बंद असल्यामुळे बांधकाम कामगारांवर उपासमारी आली तेव्हा रेतीघाट सुरु करावे आदी मागण्यांचा समावेश होता.मागण्यांबद्दल आठवडाभरात कारवाई करण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिले. मोर्चामध्ये जिल्ह्यातील भाकपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.