शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

भाकपचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:50 IST

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डाव्या पक्षाच्या ‘संविधान बचाव व धर्मनिरपेक्षता दिन आणि महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या राज्यव्यापी ग्रामपंचायत स्तरीय आंदोलनाचा समापन’ यानिमित्ताने गुरुवारला भाकप कार्यालय साकोली येथून मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देसाकोली तहसीलदारांना निवेदन : आठवडाभरात मागण्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डाव्या पक्षाच्या ‘संविधान बचाव व धर्मनिरपेक्षता दिन आणि महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या राज्यव्यापी ग्रामपंचायत स्तरीय आंदोलनाचा समापन’ यानिमित्ताने गुरुवारला भाकप कार्यालय साकोली येथून मोर्चा काढण्यात आला.‘संविधान बचाव, देश बचाव धर्मनिरपेक्षता दिन जिंदाबाद’ आदी घोषणा देत मोर्चा तहसिल कार्यालयावर पोहचल्यावर मोर्च्याचे रुपांतर धरणे आंदोलनात करण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व शिवकुमार गणविर, शांताराम शेंडे, राजु बडोले, दिलीप उंदिरवाडे किशोर बारस्कर, केशव भेंडारकर, झाडु वासनीक, बाबुराव मेश्राम, शैलेश गणविर यांनी केले. धरणे आंदोलनासमोर नेत्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर एका शिष्टमंडळाद्वारे तहसीलदार अरविंद हिंगे यांना मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.निवेदनात, रोजगार हमी कायद्यांर्गत नमुना ४० चे अर्ज उपलब्ध करुन देणे, सर्व गरजुंना घरकुल देणे, प्रति रेशन कार्ड ३५ किलो रेशन, केरोसिन, साखर व इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणे, श्रावण बाळ, संजय निराधार योजनेचे अर्थसहाय्य दरमहा एक हजार रुपये व वयोमर्यादा ६० वर्ष करावी, उज्वला योजनेला सबसिडी द्यावी, वनाधिकार कायद्यांतर्गत विनाअट पट्टे देण्यांत यावे, साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयाची दुर्दशा सुधारावी, राष्ट्रीय महामार्ग व इतर मार्गावरील गतिरोधकांवर काळे पांढरे संकेत पट्टे करावे, साकोली नगर परिषदेचे उपाध्यक्षांच्या तिसरे अपत्याची हेतुपुर्वक नोंद केली नसल्याप्रकरणी उपाध्यक्ष व नगर परिषद अधिकाऱ्यांविरुध्द कारवाई करावी, आलेबेदर येथील काबिलकास्त जमीनी मुळ लाभार्थ्यांच्या ताब्यात द्यावी, नागझीरा रोडवरील भूखंड पाडुन विक्री होत असलेली काबिलकास्त जमीन सरकारजमा करुन सरकारी ताबा करावा, साकोली नगरीत मंजुर विकास कामे सुरु करावी, कृषीपंपाचे विनारिडींग बिल देऊ नये, रेतीअभावी बांधकाम बंद असल्यामुळे बांधकाम कामगारांवर उपासमारी आली तेव्हा रेतीघाट सुरु करावे आदी मागण्यांचा समावेश होता.मागण्यांबद्दल आठवडाभरात कारवाई करण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिले. मोर्चामध्ये जिल्ह्यातील भाकपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.