शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
5
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
6
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
7
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
8
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
9
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
10
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
11
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
12
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
13
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
14
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
15
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
16
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
17
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
18
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
19
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
20
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?

पडलेल्या धानाला दिली उभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 05:00 IST

काही शेतकऱ्यांनी कसलीही पर्वा न करता पडलेला धान पीक उभे करुन त्याच्या जुड्या बांधण्याचे काम सुरु केले. हा प्रयोग गावात कधीच न केल्याने शेतकऱ्यांसाठी कुतुहलाचा विषय ठरला. काहींनी हसू केले. सर्व प्रथम या उपाययोजनेच्या कामाला सुरुवात येथील खुशाल काशीराम सोनटक्के, कुसुम माणिकराव खर्डेकर, मंजुळा गुलाब इटवले, रविकांता रमेश सावरकर, उत्तम धोंडू इटवले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली.

ठळक मुद्देपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्याची धडपड : शासनाने त्वरित मदत करण्याची बळीराजाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसासरा : परतीच्या पावसासह झालेल्या वादळाने सासरा व परिसरातील धानपीक पडले आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने कित्येकांचे धान पीक सडायला सुरुवात झाली. तर दुसरीकडे पाने गुंडाळणारी अडी व तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पीक वाचवण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी वाटेल ते उपाय करायला सुरुवात केली आहे. काहींनी भरमसाठ औषधांची फवारणी केली. मात्र यश मिळाले नाही. निसर्गाच्या अपकृपेने तोंडातील घास हिरावून घेण्याची परिस्थिती निमार्ण झाल्याने शेतकऱ्यांवर संकट निर्माण झाले असून आहे.वारंवार उद्भवणाऱ्या संकटांशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यातून सावरण्याचा मार्ग शोधणे अवघड झाले. हिम्मत हारलो तर आपल्याला काहीच मिळणार नाही.आपण लढलेच पाहिजे. स्वस्थ बसलो तर आपल्या पदरात निराशाशिवाय काहीच पडणार नाही. हातातून पीक निसटेल. यासाठी शेतकऱ्यांच्या मनात एक युक्ती सुचली.काही शेतकऱ्यांनी कसलीही पर्वा न करता पडलेला धान पीक उभे करुन त्याच्या जुड्या बांधण्याचे काम सुरु केले. हा प्रयोग गावात कधीच न केल्याने शेतकऱ्यांसाठी कुतुहलाचा विषय ठरला. काहींनी हसू केले. सर्व प्रथम या उपाययोजनेच्या कामाला सुरुवात येथील खुशाल काशीराम सोनटक्के, कुसुम माणिकराव खर्डेकर, मंजुळा गुलाब इटवले, रविकांता रमेश सावरकर, उत्तम धोंडू इटवले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली.प्रतिनिधीने या शेतकऱ्यांची भेट घेतली असता या प्रयोगाने नुकसान टळल्याचे दिसून आले. या प्रयोगाने खर्च जरी वाढला असला तरी सडणारे धानपीक वाचवता आले. आम्ही असा प्रयोग केल्याने आमच्या हाती थोड्याफार प्रमाणात तरी धान्य पडेल. शेतीत झालेला खर्च तरी काढता येईल असे काहींनी सांगितले. काहीच उपाय केला नसता तर आमच्या पदरात तणीसच पडले असते, अशा संतप्त प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.संकटांचा सामना करताना बळीराजा हतबलयावर्षी बळीराजावर सातत्याने संकटे सुरु आहेत. पूरात सावरत नाही. तोच परतीच्या पावसाने अनेक शेतातील धानपिक उद्ध्वस्त केले. मात्र त्यातही काही शेतकऱ्यांनी आपले पिक वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करीत आहेत. एकीकडे पीक वाचवण्याची कसरत तर दुसरी वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीचे बळीराजा त्रासला आहे. वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची शेतकऱ्याची मागणी होत आहे. अस्मानी, सुल्तानी संकटाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांची या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दया येत नसेल का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.माझ्या शेतातील धान पडला होता. त्याच्यावर पाणी तरंगत होते. याला उभे करुन वाचवण्याचा प्रयत्न केला. तर काहीना काहीतरी धान्य मिळेल अन्यथा हे धान पीक सडेल. कोणत्याही परिस्थितीत या निसाडा झालेल्या धानाची लोंबी बाहेर काढण्याची गरज होती. महिला मजूर कामाला लावून धान पीक उभे करुन त्यांच्या जुड्या बांधल्या. सध्या तरी मी केलेला प्रयोगाने मजूरीचा खर्च वाढला पण सडून पूर्णत: नष्ट होणाऱ्या पिकाला थोड्याफार प्रमाणात वाचवण्याचे समाधान मिळाले.-खुशाल सोनटके, शेतकरी

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती