शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पडलेल्या धानाला दिली उभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 05:00 IST

काही शेतकऱ्यांनी कसलीही पर्वा न करता पडलेला धान पीक उभे करुन त्याच्या जुड्या बांधण्याचे काम सुरु केले. हा प्रयोग गावात कधीच न केल्याने शेतकऱ्यांसाठी कुतुहलाचा विषय ठरला. काहींनी हसू केले. सर्व प्रथम या उपाययोजनेच्या कामाला सुरुवात येथील खुशाल काशीराम सोनटक्के, कुसुम माणिकराव खर्डेकर, मंजुळा गुलाब इटवले, रविकांता रमेश सावरकर, उत्तम धोंडू इटवले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली.

ठळक मुद्देपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्याची धडपड : शासनाने त्वरित मदत करण्याची बळीराजाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसासरा : परतीच्या पावसासह झालेल्या वादळाने सासरा व परिसरातील धानपीक पडले आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने कित्येकांचे धान पीक सडायला सुरुवात झाली. तर दुसरीकडे पाने गुंडाळणारी अडी व तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पीक वाचवण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी वाटेल ते उपाय करायला सुरुवात केली आहे. काहींनी भरमसाठ औषधांची फवारणी केली. मात्र यश मिळाले नाही. निसर्गाच्या अपकृपेने तोंडातील घास हिरावून घेण्याची परिस्थिती निमार्ण झाल्याने शेतकऱ्यांवर संकट निर्माण झाले असून आहे.वारंवार उद्भवणाऱ्या संकटांशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यातून सावरण्याचा मार्ग शोधणे अवघड झाले. हिम्मत हारलो तर आपल्याला काहीच मिळणार नाही.आपण लढलेच पाहिजे. स्वस्थ बसलो तर आपल्या पदरात निराशाशिवाय काहीच पडणार नाही. हातातून पीक निसटेल. यासाठी शेतकऱ्यांच्या मनात एक युक्ती सुचली.काही शेतकऱ्यांनी कसलीही पर्वा न करता पडलेला धान पीक उभे करुन त्याच्या जुड्या बांधण्याचे काम सुरु केले. हा प्रयोग गावात कधीच न केल्याने शेतकऱ्यांसाठी कुतुहलाचा विषय ठरला. काहींनी हसू केले. सर्व प्रथम या उपाययोजनेच्या कामाला सुरुवात येथील खुशाल काशीराम सोनटक्के, कुसुम माणिकराव खर्डेकर, मंजुळा गुलाब इटवले, रविकांता रमेश सावरकर, उत्तम धोंडू इटवले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली.प्रतिनिधीने या शेतकऱ्यांची भेट घेतली असता या प्रयोगाने नुकसान टळल्याचे दिसून आले. या प्रयोगाने खर्च जरी वाढला असला तरी सडणारे धानपीक वाचवता आले. आम्ही असा प्रयोग केल्याने आमच्या हाती थोड्याफार प्रमाणात तरी धान्य पडेल. शेतीत झालेला खर्च तरी काढता येईल असे काहींनी सांगितले. काहीच उपाय केला नसता तर आमच्या पदरात तणीसच पडले असते, अशा संतप्त प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.संकटांचा सामना करताना बळीराजा हतबलयावर्षी बळीराजावर सातत्याने संकटे सुरु आहेत. पूरात सावरत नाही. तोच परतीच्या पावसाने अनेक शेतातील धानपिक उद्ध्वस्त केले. मात्र त्यातही काही शेतकऱ्यांनी आपले पिक वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करीत आहेत. एकीकडे पीक वाचवण्याची कसरत तर दुसरी वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीचे बळीराजा त्रासला आहे. वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची शेतकऱ्याची मागणी होत आहे. अस्मानी, सुल्तानी संकटाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांची या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दया येत नसेल का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.माझ्या शेतातील धान पडला होता. त्याच्यावर पाणी तरंगत होते. याला उभे करुन वाचवण्याचा प्रयत्न केला. तर काहीना काहीतरी धान्य मिळेल अन्यथा हे धान पीक सडेल. कोणत्याही परिस्थितीत या निसाडा झालेल्या धानाची लोंबी बाहेर काढण्याची गरज होती. महिला मजूर कामाला लावून धान पीक उभे करुन त्यांच्या जुड्या बांधल्या. सध्या तरी मी केलेला प्रयोगाने मजूरीचा खर्च वाढला पण सडून पूर्णत: नष्ट होणाऱ्या पिकाला थोड्याफार प्रमाणात वाचवण्याचे समाधान मिळाले.-खुशाल सोनटके, शेतकरी

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती