शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

जिल्ह्यात पाऊस बेपत्ता, रोवणीची कामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:43 IST

जिल्ह्यात गत दोन आठवड्यापासून पाऊस बेपत्ता झाला असून चिंतातूर शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ १९ टक्केच पावसाची नोंद झाली असून गतवर्षी याच काळात ३३ टक्के पाऊस पडला होता. निम्म्यापेक्षा अधिक रोवणीही झाली होती. मात्र यंदा आतापर्यंत केवळ ५ टक्केच रोवणी आटोपली असून शेतातील पऱ्हे वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे : वार्षिक सरासरीच्या केवळ १९ टक्के पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत दोन आठवड्यापासून पाऊस बेपत्ता झाला असून चिंतातूर शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ १९ टक्केच पावसाची नोंद झाली असून गतवर्षी याच काळात ३३ टक्के पाऊस पडला होता. निम्म्यापेक्षा अधिक रोवणीही झाली होती. मात्र यंदा आतापर्यंत केवळ ५ टक्केच रोवणी आटोपली असून शेतातील पऱ्हे वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत.भंडारा हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. भाताच्या शेतीसाठी मुबलक पावसाची गरज असते. भंडारा जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान १३३०.२ मिमी आहे. तर १ जून ते १६ जुलै पर्यंत जिल्ह्यात सरासरी ४२३ मिमी पाऊस कोसळतो. मात्र यंदा वरुण राजा शेतकºयांवर कोपल्याचे दिसत आहे. रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेले. आद्रा नक्षत्रात पाऊस कोसळला. परंतु तो रोवणीयोग्यच नव्हता. जिल्ह्यात १ जून ते १६ जुलै या कालावधीत २५४.२ मिमी पाऊस कोसळला. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ १९ टक्के तर सद्य कालावधीच्या ६० टक्के आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत ४४४.९ मिमी पाऊस कोसळला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात अर्ध्या अधिक रोवणीची कामे आटोपली होती. परंतु यंदा रोवणीयोग्य पाऊसच झाला नाही. धानाच्या बांध्यात पाणीच साचले नाही. शेतात असलेले पऱ्हे पिवळे पडत आहे. या पºह्यांना वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली. परंतु अपुऱ्या विजेअभावी त्यांनाही सिंचन करणे कठीण जात आहे.जिल्ह्यात २ लाख ३ हजार ६१६ हेक्टर क्षेत्रावर खरीपाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ८० हजार १२५ हेक्टर क्षेत्र केवळ भाताचे आहे. परंतु पुरेसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यात केवळ ५ टक्के रोवणी आटोपली आहे. हवामान खाते दररोज नवनवीन हवामानाचा अंदाज वर्तवित आहे. परंतु प्रत्येक दिवस स्वच्छ सूर्यप्रकाशाचा निघत आहे. शेतकरी आकाशाकडे नजरा लावून बसले आहेत. परंतु पाऊस पडण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. अपुऱ्या पावसाने धान शेती तर धोक्यात आलीच त्यासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे.रोवणी झालेल्या शेताला भेगाकरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी पालोरा परिसरात रोवणी झालेल्या शेतात भेगा पडल्या आहेत. जलसाठ्यात वेगाने घट होत असून पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. १५ दिवसापासून पाऊस कोसळला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. पऱ्हे पिवळे पडून कोमेजत आहेत. सिंचनाची साधने असणाऱ्या शेतकऱ्यांनी विहिर, नाले व तलावाच्या माध्यमातून रोवणी केली. मात्र आता पावसाअभावी रोवणी पूर्णत: ठप्प झाली आहे. शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट बेचैन करीत आहे. रोवणी झालेल्या शेतात तडे पडले असून शेतकºयांच्या डोळ्यात पाणी येत आहे.