शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाऊस बेपत्ता, रोवणीची कामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:43 IST

जिल्ह्यात गत दोन आठवड्यापासून पाऊस बेपत्ता झाला असून चिंतातूर शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ १९ टक्केच पावसाची नोंद झाली असून गतवर्षी याच काळात ३३ टक्के पाऊस पडला होता. निम्म्यापेक्षा अधिक रोवणीही झाली होती. मात्र यंदा आतापर्यंत केवळ ५ टक्केच रोवणी आटोपली असून शेतातील पऱ्हे वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे : वार्षिक सरासरीच्या केवळ १९ टक्के पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत दोन आठवड्यापासून पाऊस बेपत्ता झाला असून चिंतातूर शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ १९ टक्केच पावसाची नोंद झाली असून गतवर्षी याच काळात ३३ टक्के पाऊस पडला होता. निम्म्यापेक्षा अधिक रोवणीही झाली होती. मात्र यंदा आतापर्यंत केवळ ५ टक्केच रोवणी आटोपली असून शेतातील पऱ्हे वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत.भंडारा हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. भाताच्या शेतीसाठी मुबलक पावसाची गरज असते. भंडारा जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान १३३०.२ मिमी आहे. तर १ जून ते १६ जुलै पर्यंत जिल्ह्यात सरासरी ४२३ मिमी पाऊस कोसळतो. मात्र यंदा वरुण राजा शेतकºयांवर कोपल्याचे दिसत आहे. रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेले. आद्रा नक्षत्रात पाऊस कोसळला. परंतु तो रोवणीयोग्यच नव्हता. जिल्ह्यात १ जून ते १६ जुलै या कालावधीत २५४.२ मिमी पाऊस कोसळला. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ १९ टक्के तर सद्य कालावधीच्या ६० टक्के आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत ४४४.९ मिमी पाऊस कोसळला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात अर्ध्या अधिक रोवणीची कामे आटोपली होती. परंतु यंदा रोवणीयोग्य पाऊसच झाला नाही. धानाच्या बांध्यात पाणीच साचले नाही. शेतात असलेले पऱ्हे पिवळे पडत आहे. या पºह्यांना वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली. परंतु अपुऱ्या विजेअभावी त्यांनाही सिंचन करणे कठीण जात आहे.जिल्ह्यात २ लाख ३ हजार ६१६ हेक्टर क्षेत्रावर खरीपाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ८० हजार १२५ हेक्टर क्षेत्र केवळ भाताचे आहे. परंतु पुरेसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यात केवळ ५ टक्के रोवणी आटोपली आहे. हवामान खाते दररोज नवनवीन हवामानाचा अंदाज वर्तवित आहे. परंतु प्रत्येक दिवस स्वच्छ सूर्यप्रकाशाचा निघत आहे. शेतकरी आकाशाकडे नजरा लावून बसले आहेत. परंतु पाऊस पडण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. अपुऱ्या पावसाने धान शेती तर धोक्यात आलीच त्यासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे.रोवणी झालेल्या शेताला भेगाकरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी पालोरा परिसरात रोवणी झालेल्या शेतात भेगा पडल्या आहेत. जलसाठ्यात वेगाने घट होत असून पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. १५ दिवसापासून पाऊस कोसळला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. पऱ्हे पिवळे पडून कोमेजत आहेत. सिंचनाची साधने असणाऱ्या शेतकऱ्यांनी विहिर, नाले व तलावाच्या माध्यमातून रोवणी केली. मात्र आता पावसाअभावी रोवणी पूर्णत: ठप्प झाली आहे. शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट बेचैन करीत आहे. रोवणी झालेल्या शेतात तडे पडले असून शेतकºयांच्या डोळ्यात पाणी येत आहे.