शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

पावसाने पुन्हा केला शेतकऱ्यांचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 06:00 IST

दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातर्फे याबाबत सूचनाही देण्यात आली होती. वेधशाळेने वर्तविलेला अंदाज खरोखर ठरला. जिल्ह्यात कुठेही गारपीट पडली नसली तरी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले आहे.

ठळक मुद्देशेकडो क्विंटल धानपोती ओली : खरेदी केंद्रांवर सुविधांचा अभाव, भाजीपाला पिकांचेही नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आठ दिवसांच्या रजेनंतर पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. परिणामी विक्रीसाठी आणलेली शेकडो क्विंटल धान खरेदी केंद्रांवर ओली झाली. सरत्या वर्षातील शेवटच्या दिवशीही बरसलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. विशेष म्हणजे प्रती क्विंटल २५१० रुपये धानाला भाव मिळत असल्याने खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे.दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातर्फे याबाबत सूचनाही देण्यात आली होती. वेधशाळेने वर्तविलेला अंदाज खरोखर ठरला. जिल्ह्यात कुठेही गारपीट पडली नसली तरी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले आहे.लाखांदूर तालुक्यातील बारव्हा परिसरात अवकाळी पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेली धानपोतींवर आच्छादन घालण्यासाठी शेतकºयांची तारांबळ उडाली. एवढे करूनही धानपोती ओल्या झाल्या. शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळून प्रतीक्विंटल २५१० रुपये भाव मिळत असल्याने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.भंडारा शहरासह तालुक्यात सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. तालुक्यातील धान खरेदी केंद्रावरही शेतकऱ्यांची चांगलीच गोची झाली. खरेदी केंद्राकडे घेऊन जाणारे धानही ओले झाले. याशिवाय तुमसर, मोहाडी, जांब, लोहारा, बारव्हा, नाकाडोंगरी परिसर, मासळ, आंधळगाव, जवाहरनगर, पवनी, लाखनी शहर व साकोली शहरासह ग्रामीण भागात पाऊस बरसला. अचानकपणे आलेल्या पावसाने जिल्ह्यात मंगळवारी काही ठिकाणी भरलेल्या आठवडी बाजारावरही परिणाम झालाहुडहुडी वाढलीमागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असताना मंगळवारी सायंकाळी बरसलेल्या अवकाळी पावसाने वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. आधीच धुक्यामुळे थंडीत वाढ झाली असताना बरसलेल्या पाण्यामुळे अनेकांचे नियोजन कोलमडले आहे. या पावसाने थर्टीफस्टच्या नियोजनावरही पाणी फेरले आहे. दुसरीकडे वाढत्या थंडीमुळे उबदार कपड्यांची मागणी वाढली असून बाजारपेठेत शॉल, स्वेटर, मफलर व दुपट्टे विक्रीसाठी गर्दी होत असल्याचे दृष्य आहे.

टॅग्स :Rainपाऊस