शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने पुन्हा केला शेतकऱ्यांचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 06:00 IST

दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातर्फे याबाबत सूचनाही देण्यात आली होती. वेधशाळेने वर्तविलेला अंदाज खरोखर ठरला. जिल्ह्यात कुठेही गारपीट पडली नसली तरी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले आहे.

ठळक मुद्देशेकडो क्विंटल धानपोती ओली : खरेदी केंद्रांवर सुविधांचा अभाव, भाजीपाला पिकांचेही नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आठ दिवसांच्या रजेनंतर पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. परिणामी विक्रीसाठी आणलेली शेकडो क्विंटल धान खरेदी केंद्रांवर ओली झाली. सरत्या वर्षातील शेवटच्या दिवशीही बरसलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. विशेष म्हणजे प्रती क्विंटल २५१० रुपये धानाला भाव मिळत असल्याने खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे.दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातर्फे याबाबत सूचनाही देण्यात आली होती. वेधशाळेने वर्तविलेला अंदाज खरोखर ठरला. जिल्ह्यात कुठेही गारपीट पडली नसली तरी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले आहे.लाखांदूर तालुक्यातील बारव्हा परिसरात अवकाळी पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेली धानपोतींवर आच्छादन घालण्यासाठी शेतकºयांची तारांबळ उडाली. एवढे करूनही धानपोती ओल्या झाल्या. शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळून प्रतीक्विंटल २५१० रुपये भाव मिळत असल्याने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.भंडारा शहरासह तालुक्यात सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. तालुक्यातील धान खरेदी केंद्रावरही शेतकऱ्यांची चांगलीच गोची झाली. खरेदी केंद्राकडे घेऊन जाणारे धानही ओले झाले. याशिवाय तुमसर, मोहाडी, जांब, लोहारा, बारव्हा, नाकाडोंगरी परिसर, मासळ, आंधळगाव, जवाहरनगर, पवनी, लाखनी शहर व साकोली शहरासह ग्रामीण भागात पाऊस बरसला. अचानकपणे आलेल्या पावसाने जिल्ह्यात मंगळवारी काही ठिकाणी भरलेल्या आठवडी बाजारावरही परिणाम झालाहुडहुडी वाढलीमागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असताना मंगळवारी सायंकाळी बरसलेल्या अवकाळी पावसाने वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. आधीच धुक्यामुळे थंडीत वाढ झाली असताना बरसलेल्या पाण्यामुळे अनेकांचे नियोजन कोलमडले आहे. या पावसाने थर्टीफस्टच्या नियोजनावरही पाणी फेरले आहे. दुसरीकडे वाढत्या थंडीमुळे उबदार कपड्यांची मागणी वाढली असून बाजारपेठेत शॉल, स्वेटर, मफलर व दुपट्टे विक्रीसाठी गर्दी होत असल्याचे दृष्य आहे.

टॅग्स :Rainपाऊस