शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

पावसाने पुन्हा केला शेतकऱ्यांचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 06:00 IST

दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातर्फे याबाबत सूचनाही देण्यात आली होती. वेधशाळेने वर्तविलेला अंदाज खरोखर ठरला. जिल्ह्यात कुठेही गारपीट पडली नसली तरी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले आहे.

ठळक मुद्देशेकडो क्विंटल धानपोती ओली : खरेदी केंद्रांवर सुविधांचा अभाव, भाजीपाला पिकांचेही नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आठ दिवसांच्या रजेनंतर पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. परिणामी विक्रीसाठी आणलेली शेकडो क्विंटल धान खरेदी केंद्रांवर ओली झाली. सरत्या वर्षातील शेवटच्या दिवशीही बरसलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. विशेष म्हणजे प्रती क्विंटल २५१० रुपये धानाला भाव मिळत असल्याने खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे.दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातर्फे याबाबत सूचनाही देण्यात आली होती. वेधशाळेने वर्तविलेला अंदाज खरोखर ठरला. जिल्ह्यात कुठेही गारपीट पडली नसली तरी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले आहे.लाखांदूर तालुक्यातील बारव्हा परिसरात अवकाळी पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेली धानपोतींवर आच्छादन घालण्यासाठी शेतकºयांची तारांबळ उडाली. एवढे करूनही धानपोती ओल्या झाल्या. शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळून प्रतीक्विंटल २५१० रुपये भाव मिळत असल्याने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.भंडारा शहरासह तालुक्यात सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. तालुक्यातील धान खरेदी केंद्रावरही शेतकऱ्यांची चांगलीच गोची झाली. खरेदी केंद्राकडे घेऊन जाणारे धानही ओले झाले. याशिवाय तुमसर, मोहाडी, जांब, लोहारा, बारव्हा, नाकाडोंगरी परिसर, मासळ, आंधळगाव, जवाहरनगर, पवनी, लाखनी शहर व साकोली शहरासह ग्रामीण भागात पाऊस बरसला. अचानकपणे आलेल्या पावसाने जिल्ह्यात मंगळवारी काही ठिकाणी भरलेल्या आठवडी बाजारावरही परिणाम झालाहुडहुडी वाढलीमागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असताना मंगळवारी सायंकाळी बरसलेल्या अवकाळी पावसाने वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. आधीच धुक्यामुळे थंडीत वाढ झाली असताना बरसलेल्या पाण्यामुळे अनेकांचे नियोजन कोलमडले आहे. या पावसाने थर्टीफस्टच्या नियोजनावरही पाणी फेरले आहे. दुसरीकडे वाढत्या थंडीमुळे उबदार कपड्यांची मागणी वाढली असून बाजारपेठेत शॉल, स्वेटर, मफलर व दुपट्टे विक्रीसाठी गर्दी होत असल्याचे दृष्य आहे.

टॅग्स :Rainपाऊस