शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धानाच्या कोठारात पावसाने केला घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

आकाशात अचानक ढग जमा होऊन पाऊस कोसळत आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी कोंढा येथे दुपारी २ वाजता दरम्यान शनिवारला जोरदार पावसाच्या सरी आल्या. त्यामुळे शेतात पावसाचे पाणी साचले. यामुळे कापणी सुरु असलेले धान पीक प्रभावित झाले. कडपा पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, परतीच्या पावसाचा जोर अजून कमी झाला नाही.

ठळक मुद्देबळीराजा संकटात : अड्याळ, पालांदूर, कोंढा, दिघोरीतील धानपीक उद्ध्वस्त, पीक विमा देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या धान पिकावर परतीच्या पावसाने पाणी फेरले आहे. यामुळे बळीराजा पुरता संकटात सापडला आहे.कोंढा येथे नासाडीकोंढा-कोसरा : कोंढा परिसरात परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने धान पिकाला त्याचा फटका बसला आहे. अनेकांची धानपिकाची कापणी सुरु असून पावसामुळे धानाच्या कडपा पाण्यात सापडल्या. दररोज ढगाळ वातावरण दिसत आहे. आकाशात अचानक ढग जमा होऊन पाऊस कोसळत आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी कोंढा येथे दुपारी २ वाजता दरम्यान शनिवारला जोरदार पावसाच्या सरी आल्या. त्यामुळे शेतात पावसाचे पाणी साचले. यामुळे कापणी सुरु असलेले धान पीक प्रभावित झाले. कडपा पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, परतीच्या पावसाचा जोर अजून कमी झाला नाही. दररोज आकाशत ढग जमत आहेत. त्यामुळे केव्हाही पाऊस येण्याची शक्यता असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पहावयास मिळते आहे. आधीच यावर्षी अतिवृष्टी झाल्याने धानपिकास मोठा फटका बसला आहे. यातच कीडींचा प्रादूर्भाव यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. दिवाळी सारखा सण लोक साजरा करीत असताना परिसरात शेतकरी आपल्या शेतात जावून पावसाने ओलेचिंब झालेले धानाचा कडपा बाहेर काढत असल्याचे दृष्य दिसते आहे.धानाच्या कडपा भिजल्यापालांदूर चौ. : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले धानपीक भूईसपाट केले. बºयाच ठिकाणी कडपा ओला झाला आहे. ऐन दिवाळीत निसर्गाच्या दृष्टचक्राने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हिसकावला आहे. पीक विम्याचा लाभ व्हावा याकरिता प्रशासनासह शासनाने प्रामाणिकता दाखवावी अशी आर्त हाक बळीराजाने दिली आहे. दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने दुपारी जोरदार हजेरी लावली. यात धान जमीनदोस्त झाले. यामुळे धान अंकुर शक्य असल्याने नुकसान होणे ठरले आहे.पीक विम्याचा कडपा भिजल्यास नुकसान मिळणे शक्य आहे. मात्र तीन दिवस शासकीय सुटी असल्याने शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे होणार का? हा प्रश्न आहे. २४ तासात पंचनामे होणे गरजेचे असल्याचे पीक विमा तरतुदीत म्हटले आहे. यावर काय मार्ग काढावा याचा पीक विमा कंपनी कृषी विभाग, महसूल विभाग यांनी विचार करीत शेतकºयांना पीक विमा मंजूर करावा. शेतकऱ्यांच्या मदतीला लोकप्रतिनिधीनी प्राधान्य देत संकटकालीन स्थितीत सहकार्य करावे अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून उमटत आहे.लाखनी तालुक्यात नुकसानलाखनी : लाखनी परिसरात बरसलेल्या परतीच्या पावसाने धान उत्पादक शेतकºयांना दगा दिला. अवकाळी पावसाने शेतात कापून ठेवलेला धान व कापणीसाठी सज्ज असलेल्या धान पिकांची नासाडी झाली आहे. हातात आलेले पीक पाहुन शेतकरी सुखावला होता. तोंडात जाणारा घास हिरावून घ्यावा अशी परिस्थिती धान उत्पादक शेतकºयाची झाली आहे. दिवाळीच्या एक दिवस अगोदर पाऊस बरसल्याने आनंदात जाणारी दिवाळी सणावर पाणी फेरले. धान उत्पादक शेतकºयांचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेद्वारे मनोज पटले यांनी केली आहे.लाखनी तालुक्यात धानपिकाची नासाडी झालेल्या भागाची पाहणी करुन पिक विम्याची मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा घात केला. यासंदर्भात प्रशासनाने तात्काळ मौका पंचनामा करण्याची गरज निर्माण झाली आहे.काढलेले धान सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळपवनी तालुक्यातील अड्याळ परिसरात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना मोठ्या संकटांत टाकले आहे. कापलेले धान ओले चिंब झाल्याने त्यावर सुचेल तो उपाय शेतकरी करताना दिसत आहे. अड्याळजवळील नेरला गावातील एक शेतकरी व सोबत मुलीची मदत घेत बैलांच्या सहाय्याने धान चुरणा करताना दिसत होते. ओले धान लवकर वाढावे, यासाठी हा पर्याय करण्याचे कारण यावेळी शेतकºयांनी सांगितले. शेतकरी मोठ्या आशेने पीक घेतो. मात्र निरनिराळ्या कारणाने बळीराजाला तोंडघशी पडावे लागते. कधी एका पाण्याने तर कधी रोगराईने तर कधी सर्व बरोबर असताना सुध्दा निसर्गाच्या लहरीपणा मुळे शेतकºयाच्या पदरात नेहमीच निराशा पडते. ऐन दिवाळीच्या सणाला आनंदाच्या क्षणाला शेतकरी मात्र शेतातील ओले झालेले पीक मोठ्या दु:खाने धान पीक सुरक्षित ठिकाणी नेण्यात मग्न आहे. दरवेळी अड्याळ व परिसरातील असंख्य गावातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात आज हाहाकार दिसतं आहे. नेमके कारण म्हणजे परतीचा बरसलेला आलेला पाऊस यामुळे काहीच्या शेतातील धानपीक जमीनदोस्त झाले तर कुणाचे कापलेले धान पीक पाण्यात भिजले यासाठी प्रत्येक शेतकरी आज आपल्या शेतात दिसत आहे. युध्द स्तरावर शेतकरी राबताना दिसत आहे आणि यासाठी घरातील लहान मुलेही कामाला लागली आहे.शासन स्तरावर तालुका प्रशासनाने तात्काळ पाहणी करावे अशी मागणी शेतकरी करत असले तरी पिक पाहणी झाल्यावरही त्याचा उपयोग शेतकऱ्यांना तात्काळ होत नसेल तर त्या पीक पाहणीचा उपयोग तरी काय असाही सवाल यावेळी काही शेतकरी बांधव करताना दिसतात. नवनियुक्त आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी अड्याळ व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस