शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पावसाची चाहूल; हंगामासाठी बळीराजा सज्ज

By admin | Updated: June 11, 2016 00:35 IST

मान्सून अगदी चार-पाच दिवसात दाखल होणार आहे. खरीप हंगामासाठी मशागतीची कामे आटोपून बळीराजा सज्ज झाला आहे.

भंडारा: मान्सून अगदी चार-पाच दिवसात दाखल होणार आहे. खरीप हंगामासाठी मशागतीची कामे आटोपून बळीराजा सज्ज झाला आहे. बी-बियाणे, खतांची जुळवाजुळवही अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा हवामान खात्याने पाऊस चांगला येईल, असा अंदाज वर्तविला आहे. आतापर्यंतची स्थितीही अनुकूल आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. तरीही मधेच कोणतेही विघ्न येऊ नये, पाऊस यंदातरी कोपू नये, यासाठी बळीराजा साकडे घालत आहे.यावर्षी कृषी विभागानेही पिकांची चांगली लागवड होऊन व हवामान खात्याचा अंदाज बघता उत्पादनही चांगले होईल, अशी शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने धान, सोयाबीन या प्रमुख पिकांची लागवड केली जाते. बियाणांची उपलब्धता कृषी विभागाने करून ठेवली आहे. खतांचीही टंचाई भासणार नाही, असा दावाही कृषी विभागाने केला आहे. वरकरणी सर्वच आलबेल असले तरी शेतकऱ्यांच्या मनात मात्र अजूनही धास्ती आहेच. निसर्गाचे रुप पालटताना शेतकऱ्यांनी अनेकदा पाहिले आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने खरिपाची पेरणी केली. हंगामाच्या प्रारंभी अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकरी मोठ्या आनंदात होते. मात्र त्यानंतर पावसाने लहरीपणा दाखविणे सुरू केला. जुलै, आॅगस्ट महिने म्हणजे खरे पावसाचे महिने म्हटले जाते. मात्र यावेळीही पावसाने आपली अवकृपाच दाखविली. सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस पडला. नदी-नाल्यांमध्येही पाहिजे तसा पाऊस पडू शकला नाही. यावर्षी शेतकरी आशेवर आहे. (नगर प्रतिनिधी)